शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली खरोखरचा मिस्टर ३६०

By admin | Updated: May 22, 2016 02:34 IST

आयपीएलचे सुरुवातीचे आठ पर्व उल्लेखनीय ठरले, पण माझ्या मते आयपीएलचे नववे पर्व आतापर्यंतचे सर्वोत्तम पर्व ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे सहभागी सर्व आठ संघांदरम्यान संघर्षपूर्ण लढती खेळल्या गेल्या.

एबी डिव्हिलियर्स लिहितो़ आयपीएलचे सुरुवातीचे आठ पर्व उल्लेखनीय ठरले, पण माझ्या मते आयपीएलचे नववे पर्व आतापर्यंतचे सर्वोत्तम पर्व ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे सहभागी सर्व आठ संघांदरम्यान संघर्षपूर्ण लढती खेळल्या गेल्या. आम्ही बाद फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर असतानाही सहा संघ प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. रायझिंग पुणे सुपरजायंट््स व किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांनाही आगेकूच करण्याची संधी मिळाली होती. एका व्यावसायिक लीग स्पर्धेत यापेक्षा अधिक काय विचार करता येईल. निकालाची अनिश्चितता या स्पर्धेची विशेषता असून, त्यामुळे चाहते या स्पर्धेकडे आकर्षित झाले आहेत. दुसऱ्या बाबीचा विचार करता ही लीग टी-२० क्रिकेटचा विकास करण्यासाठी चांगले व्यासपीठ आहे. येथे प्रशिक्षक व कर्णधार फलंदाज व गोलंदाजांसाठी वेगवेगळ्या रणनीती तयार करीत असतात. या सर्व बाबी खेळाच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. या लीगमुळे खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे. तिसरे कारण युवा व प्रतिभावान खेळाडूंची कामगिरी. सनराझर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानचा आघाडीच्या गोलंदाजांमध्ये समावेश आहे. फिज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोलंदाजाने आतापर्यंत या स्पर्धेत ४९ षटके गोलंदाजी केली असून, त्याने केवळ प्रतिषटक ६.६१ धावा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माझा सहकारी व दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्रिस मॉरिसने ४१ षटके गोलंदाजी करताना केवळ ६.७५च्या सरासरीने धावा दिल्या. स्पर्धा संस्मरणीय ठरण्यासाठी चौथी व सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीची अनन्यसाधारण फलंदाजी. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आमच्या अखेरच्या साखळी लढतीपूर्वी त्याने १३ डावांमध्ये ८६.५०च्या सरासरीने ८६५ धावा फटकावल्या आहेत. खेळाच्या इतिहासात कुठल्याही फलंदाजासाठी हा सर्वोत्तम फॉर्मपैकी एक आहे. तो केवळ आयपीएलमध्येच फॉर्मात आहे असे नसून यंदा जानेवारी महिन्यापासून त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे, हे विसरता येणार नाही. त्याने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांत १९९ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर टी-२० आशिया कप स्पर्धेत चार सामन्यांत १५४ आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच लढतीत २७३ धावा फटकावल्या. आतातर ही सर्व कामगिरी आयपीएलसाठी वॉर्म असल्याचे भासत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने फटकावलेल्या बऱ्याच धावांचा मी साक्षीदार आहे. विशेषत: नॉन स्ट्रायकर एन्डवर उभे राहून मी त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला आहे. अचूक टायमिंग व अचूक प्लेसमेंटच्या आधारावर तो मैदानात चौफेर शानदार फटकेबाजी करतो, ते बघून आश्चर्य वाटते. त्यामुळे विराट कोहलीच खरा मिस्टर ३६० आहे. आतापर्यंतच्या सर्वोत्तम आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडू... विराट. (टीसीएम)