शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सिंधू, श्रीकांत यांना अव्वल मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:08 IST

आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत यांना बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीमध्ये ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात दुसºया फेरीमध्ये फाकलँड आयलँडच्या जोई मौरिसविरुद्ध करणार आहे.

गोल्ड कोस्ट - आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत यांना बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीमध्ये ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात दुसºया फेरीमध्ये फाकलँड आयलँडच्या जोई मौरिसविरुद्ध करणार आहे. या दोन्ही खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.२०१० ची चॅम्पियन व जागतिक क्रमावरीतील माजी नंबर वन खेळाडू सायना नेहवालला दुसरे मानांकन देण्यात आले असून, दुसºया फेरीत तिची गाठ एल्सी डिव्हिलियर्ससोबत पडणार आहे. भारताच्या रुतविका शिवानी गाडे हिला आठवे मानांकन देण्यात आले आहे. तिची लढत दुसºया फेरीत घानाच्या अतिपाका ग्रेस गहा व सेशेल्सची अह वान ज्युलियट यांच्या दरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूसोबत होईल. रुतविकाला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. तिला उपांत्यपूर्व फेरीत २०१४ ग्लास्गो स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या ख्रिस्टी गिलमोरसोबत खेळावे लागू शकते.गेल्या मोसमात चार स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणारा श्रीकांत पुरुष एकेरीत आपल्या मोहिमेची सुरुवात फिजीच्या लियाम फोंगविरुद्ध करेल. उपांत्य फेरीत त्याची गाठ २०१० च्या स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या राजीव ओसेफसोबत पडू शकते.गेल्या महिन्यात आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाºया एच. एस. प्रणयला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. त्याला दुसºया फेरीत मॉरिशसचा पॉल ख्रिस्टोफर जीन व सेशेल्सचा स्टीव्ह मालकोजेन यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत खेळावे लागेल. उपांत्य फेरीत त्याची गाठ तीनदा आॅलिम्पिक रौप्यपदक पटकावणाºया ली चोंग वेईसोबत पडू शकते. त्याला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.पुरुष दुहेरीमध्ये चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रंकीरेड्डी ही भारतीय जोडी धक्कादायक निकाल नोंदवण्यास सक्षम आहे. इंडोनेशिया मास्टर्समध्ये उपांत्य फेरी गाठणाºया या जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा व सिक्की रेड्डी या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे तर सात्विकसाईराज व अश्विनी पोनप्पा ही जोडीही स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. महिला दुहेरीमध्ये सिक्की व अश्विनी या जोडीला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. ही जोडी पदकाची दावेदार मानल्या जात आहे. अश्विनी यापूर्वी ज्वाला गुट्टाच्या साथीने सुवर्ण व रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे.बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात बुधवारला मिश्र सांघिक स्पर्धेने होणार आहे. त्यात मलेशिया, इंग्लंड आणि भारत पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.नव्या सर्व्हिस नियमांचा प्रयोग नाहीराष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंना दिलासा देणारी बातमी आहे. आयोजकांनी बीडब्ल्यूएफच्या प्रायोगिक सर्व्हिस नियमांची अंमलबजावणी लांबणीवर टाकली आहे.नव्या सर्व्हिस नियमांतर्गत शटल जमिनीच्या दीड मीटर उंचीवर असायला हवे. हा प्रयोग मार्चमध्ये आॅल इंग्लंड स्पर्धेदरम्यान करण्यात आला होता. भारतीय खेळाडूंशिवाय डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन आणि दोन वेळेचा चॅम्पियन चीनचा लीन डॅन यांच्यासारख्या स्टार्सने नव्या नियमास विरोध दर्शविला होता. राष्टÑकुल स्पर्धा जुन्याच नियमानुसार होणार आहे. यात सर्व्हिसच्या वेळी शटलची उंची कमरेच्या बरोबरीनुसार व्हायला हवी.पी. व्ही. सिंधूने आॅल इंग्लंडसारख्या मोठ्या स्पर्धेत नव्या नियमांचा प्रयोग केल्याबद्दल बीडब्ल्यूएफला धारेवर धरले होते. खेळाडूंना नव्या नियमांची पुरेशी ओळख होणे तसेच अनुभव येण्यासाठी वेळ द्यायला हवा, असे सिंधूचे मत होते. राष्टÑकुल स्पर्धेत बॅडमिंटनला ५ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.भारतीयांचे आव्हान असेल - चोंग वेईगोल्डकोस्ट : यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल. यावेळी पुरुष एकेरी गटामध्ये भारतीय खेळाडूंचे मुख्य आव्हान असेल,’ असे मत राष्ट्रकुल स्पर्धेत चार सुवर्ण पदक पटकावलेला मलेशियाचा दिग्गज बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने व्यक्त केले.चोंग वेई म्हणाला की, ‘यंदा सर्वात मोठे आव्हान भारताकडून मिळेल. श्रीकांत आणि प्रणॉय चांगल्या लयीत असून सुवर्ण पदकाचे दावेदारही आहेत.’ जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेला श्रीकांत आणि १२व्या स्थानी असलेल्या प्रणॉय यांनी गेल्या वर्षी शानदार कामगिरी करताना दिग्गज खेळाडूंना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे दोघांनाही यंदा सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.याआधी २०१४ साली भारताच्या पी. कश्यप याने पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. चोंग वेई याने २००६ साली पुरुष एकेरी आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर २०१० साली नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने दोन्ही गटात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. दरम्यान, २०१४ साली ग्लास्गो स्पर्धेत चोंग वेई सहभागी झाला नव्हता, मात्र आता ती कसर यंदा भरुन काढण्यासाठ तो पूर्णपणे सज्ज झाला आहे. (वृत्तसंस्था)सायनाच्या धमकीनंतर आयओए नरमलेगोल्ड कोस्ट : भारतीय आॅलिम्पिक महासंघाला (आयओए) मंगळवारी सायना नेहवालचे वडील हरवीर सिंग यांचे अधिकृत मान्यता कार्ड (एक्रिडेशन) तयार करण्याची मागणी मान्य करावी लागली. कारण सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली होती.राष्ट्रकुल स्पर्धा २०१० च्या सुवर्णपदक विजेत्या सायनाने गोल्ड कोस्टमध्ये उपस्थित आयओएच्या एका वरीष्ठ पदाधिकाºयाला पत्र लिहिले होते. त्यात तिने लिहिले की, जर माझ्या वडिलांना ‘एक अधिकार’ म्हणून मंजुरी मिळाली नाही तर मी या स्पर्धेत सहभागी होणार नाही.सायनाने आयओएला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘मी तुम्हाला संदेश पाठविला आणि तुमच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही फोन रिसिव्ह केला नाही, पण माझ्या वडिलांबाबत मोठा मुद्दा बनविण्यात आला. जर एक अधिकारी म्हणून त्यांचे एक्रिडेशन तयार होत नसेल तर मी सामना खेळणार नाही.’आयओएच्या एका अधिकाºयाने याप्रकरणी सायना नेहवालने पत्र लिहिले असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे.आयओएचे वरीष्ठ अधिकारी म्हणाले, ‘खेळाडूंची मदत करणे आमचे कर्तव्य आहे. त्यांनी पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. होय, सायनाने वरीष्ठ अधिकाºयांना पत्र लिहिले, पण आम्ही याला मुद्दा बनवू इच्छित नाही. आम्ही त्यावर तोडगा काढला आहे. आम्ही पत्रातील भाषेवर टिप्पणी करू इच्छित नाही.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८BadmintonBadmintonIndiaभारत