शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गल्लीत 'नावं' ठेवली, पण दिल्लीत नाव काढलं; शिक्षण, नोकरी अन् खेळ यासाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:00 IST

परिसरातील  लोकही खेळाला नावं ठेवत. पुढे सातवीत असताना मी राष्ट्रीय स्तरावर खेळले तेव्हा कुटुंबाला विश्वास वाटला आणि त्यांची भक्कम साथ मिळाली. 

खो- खो म्हणजे काय तर गल्लीत खेळला जाणारा खेळ.. ना ग्लॅमर, ना व्यासपीठ यामुळे या खेळाला लोक नावं ठेवत असत. आमच्या शाळेच्या मैदानात खो-खो खेळला जायचा. एकदा शाळेच्या धावण्याच्या शर्यतीत मी पहिली आले आणि क्रीडा प्रशिक्षक करवंदे सरांनी मला खो-खोच्या सरावाला येण्याचे सांगितले; पण घरच्यांनी प्रचंड विरोध केला. प्रशिक्षक घरी आले. त्यांनी वारंवार पालकांची समजूत काढली. एक दिवस ही खो-खोमध्ये काहीतरी करीलच असा शब्द सरांनी घरच्यांना दिला. इयत्ता पाचवीपासून मी खो-खो खेळायला सुरुवात केली.

खेळाच्या सरावामुळे मी दमून जायचे. अभ्यासाला वेळ मिळत नसे. त्यामुळे आई-वडिलांचा विरोध होता. या खेळात करिअर नाही. चांगला अभ्यास करून करिअर घडव, असा त्यांचा आग्रह होता. परिसरातील  लोकही खेळाला नावं ठेवत. पुढे सातवीत असताना मी राष्ट्रीय स्तरावर खेळले तेव्हा कुटुंबाला विश्वास वाटला आणि त्यांची भक्कम साथ मिळाली. 

आत्मविश्वास अन् चिकाटी 

प्रारंभी विरोध असतानाही मी थांबले नाही. स्वतःवर विश्वास ठेवला. संधीची वाट पाहत सलग पंधरा वर्षे खेळत राहिले. 

मातीपासून मॅटपर्यंत...

मातीपासून मॅटपर्यंतच्या प्रवासात २४ राष्ट्रीय, २ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. भारतीय खो-खो महिला संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचून दिल्लीत झालेल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत जगज्जेतेपद मिळवले. मुलींनीसाठी क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, पालकांनी पाठिंबा आणि योग्य प्रशिक्षक द्यावे.

शिक्षण, नोकरी अन् खेळबीड जिल्ह्यातील कळमआंबा (ता. केज) हे  आमचे मूळ गाव असले तरी बालपण आणि शिक्षण पुण्यात झाले. सध्या मुंबईतील आयकर विभागात मी कर सहायक आहे. क्रीडा कोट्यातून नोकरी मिळाली. शिक्षण, नोकरी आणि खेळ याचा समतोल साधण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला.  

(संकलन : महेश घोराळे)

टॅग्स :Kho-Khoखो-खो