शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

टीम इंडियाने ‘जमिनीवर’ यावे : सचिन

By admin | Updated: February 18, 2015 01:56 IST

प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो, म्हणून त्यांनी जमिनीवर येवून वास्तवाचे भान ठेवावे, असा सल्ला सचिन तेंडुलकर याने दिला आहे.

नवी दिल्ली : वर्ल्डकपमधील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय मिळविल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असला तरी त्यांना फाजील आत्मविश्वास नडू शकतो; कारण येत्या रविवारी होणाऱ्या लढतीत टीम इंडियाला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहे़ चोकर्स नावाने प्रसिद्ध हा संघ केव्हाही प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो, म्हणून त्यांनी जमिनीवर येवून वास्तवाचे भान ठेवावे, असा सल्ला सचिन तेंडुलकर याने दिला आहे.सचिन म्हणाला, ‘‘बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला विजय मिळवायचा असेल, तर सलामीवीर फलंदाजांनी मजबूत सुरुवात करून देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर या संघाविरुद्ध एकेरी आणि दुहेरी धावा काढताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल़ कारण क्षेत्ररक्षणात या संघाला तोड नाही़ वर्ल्डकपच्या जेतेपदाचे दावेदार संघात आफ्रिकेचा समावेश आहे़ त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल़’’ मास्टर ब्लास्टर म्हणाला, ‘‘पाकिस्तानच्या तुलनेत आफ्रिका संघ अधिक मजबूत आहे़ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात या तीनही विभागांत संघ इतर संघांच्या तुलनेत पुढे आहे़ विशेषत: वेगवान गोलंदाज डेल स्टेनसमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी राहील़ या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मावर सर्वांची नजर राहील’’़ टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर कुण्या एका खेळाडूवर अवलंबून न राहता खेळाडूंनी सांघिक कामगिरी करणे गरजेचे आहे़ असे झाल्यास टीम इंडियाला विजयापासून कुणीच रोखू शकत नाही, असेही सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे़ (वृत्तसंस्था)भारतीय संघ अडीच महिन्यांपासून आॅस्ट्रेलियामध्ये आहे़ कर्णधार या नात्याने खेळाडू तंदुरुस्त राहावेत, अशी माझी इच्छा आहे़ त्यामुळे पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयानंतर आम्ही मंगळवारी सराव न करता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला़ एक दिवस मिळालेल्या विश्रांतीमुळे नक्कीच खेळाडू नव्या उत्साहाने मैदानात उतरून विजयी अभियान कायम राखतील, असा विश्वास आहे़- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार टीम इंडियाभारत आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम : लक्ष्मण च्वर्ल्डकपमध्ये २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजू वरचढ मानली जात असली तरी भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही़व्ही़एस़ लक्ष्मण याने टीम इंडिया आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम आहे, असे म्हटले आहे़च्लक्ष्मण म्हणाला, की आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी आणि वन-डे मालिकेत भारताला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नव्हता; मात्र पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघात नवीन उत्साह संचारला आहे़ याच बळावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करील़च्गत अडीच महिन्यांपासून भारतीय संघ आॅस्ट्रेलियात आहे़ त्यामुळे येथील वातावरणाची टीम इंडियाला सवय झाली आहे, तसेच वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची आता भारतीय फलंदाजांना सवय झाली आहे़ त्यामुळे भारतीय संघ आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, इमरान ताहिर यांचा सहज सामना करू शकतो, असेही लक्ष्मण याने सांगितले़