शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

टीम इंडियाने ‘जमिनीवर’ यावे : सचिन

By admin | Updated: February 18, 2015 01:56 IST

प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो, म्हणून त्यांनी जमिनीवर येवून वास्तवाचे भान ठेवावे, असा सल्ला सचिन तेंडुलकर याने दिला आहे.

नवी दिल्ली : वर्ल्डकपमधील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय मिळविल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असला तरी त्यांना फाजील आत्मविश्वास नडू शकतो; कारण येत्या रविवारी होणाऱ्या लढतीत टीम इंडियाला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहे़ चोकर्स नावाने प्रसिद्ध हा संघ केव्हाही प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो, म्हणून त्यांनी जमिनीवर येवून वास्तवाचे भान ठेवावे, असा सल्ला सचिन तेंडुलकर याने दिला आहे.सचिन म्हणाला, ‘‘बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला विजय मिळवायचा असेल, तर सलामीवीर फलंदाजांनी मजबूत सुरुवात करून देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर या संघाविरुद्ध एकेरी आणि दुहेरी धावा काढताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल़ कारण क्षेत्ररक्षणात या संघाला तोड नाही़ वर्ल्डकपच्या जेतेपदाचे दावेदार संघात आफ्रिकेचा समावेश आहे़ त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल़’’ मास्टर ब्लास्टर म्हणाला, ‘‘पाकिस्तानच्या तुलनेत आफ्रिका संघ अधिक मजबूत आहे़ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात या तीनही विभागांत संघ इतर संघांच्या तुलनेत पुढे आहे़ विशेषत: वेगवान गोलंदाज डेल स्टेनसमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी राहील़ या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मावर सर्वांची नजर राहील’’़ टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर कुण्या एका खेळाडूवर अवलंबून न राहता खेळाडूंनी सांघिक कामगिरी करणे गरजेचे आहे़ असे झाल्यास टीम इंडियाला विजयापासून कुणीच रोखू शकत नाही, असेही सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे़ (वृत्तसंस्था)भारतीय संघ अडीच महिन्यांपासून आॅस्ट्रेलियामध्ये आहे़ कर्णधार या नात्याने खेळाडू तंदुरुस्त राहावेत, अशी माझी इच्छा आहे़ त्यामुळे पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयानंतर आम्ही मंगळवारी सराव न करता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला़ एक दिवस मिळालेल्या विश्रांतीमुळे नक्कीच खेळाडू नव्या उत्साहाने मैदानात उतरून विजयी अभियान कायम राखतील, असा विश्वास आहे़- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार टीम इंडियाभारत आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम : लक्ष्मण च्वर्ल्डकपमध्ये २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजू वरचढ मानली जात असली तरी भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही़व्ही़एस़ लक्ष्मण याने टीम इंडिया आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम आहे, असे म्हटले आहे़च्लक्ष्मण म्हणाला, की आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी आणि वन-डे मालिकेत भारताला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नव्हता; मात्र पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघात नवीन उत्साह संचारला आहे़ याच बळावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करील़च्गत अडीच महिन्यांपासून भारतीय संघ आॅस्ट्रेलियात आहे़ त्यामुळे येथील वातावरणाची टीम इंडियाला सवय झाली आहे, तसेच वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची आता भारतीय फलंदाजांना सवय झाली आहे़ त्यामुळे भारतीय संघ आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, इमरान ताहिर यांचा सहज सामना करू शकतो, असेही लक्ष्मण याने सांगितले़