शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

शोभा डे तुम्हाला हे माहित आहे का ?

By admin | Updated: August 9, 2016 17:35 IST

रिओला जा, सेल्फी काढा, रिकाम्या हाताने परत या, हा सर्व पैशांचा अपव्यय आहे या वादग्रस्त विधानातून शोभा डे यांनी आपल्या अपूर्ण ज्ञानाची प्रचिती दिली आहे.

दीनानाथ परब

मुंबई, दि. ९ - रिओला जा, सेल्फी काढा, रिकाम्या हाताने परत या, हा सर्व पैशांचा अपव्यय आहे या वादग्रस्त टि्वटमधून शोभा डे यांनी आपल्या अपूर्ण ज्ञानाची प्रचिती दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी खेळाडू काय कष्ट घेतात, किती वर्ष मेहनत घेतात याची डे यांना जराही कल्पना नाही.  डे स्वत: प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी स्पोटर्सवर लेख लिहीण्यासाठी क्रिकेट व्यतिरिक्त भारतीय क्रीडा क्षेत्राचा अभ्यास करावा त्यावेळी त्यांना सेल्फी काढा, रिकाम्या हाताने परत या शब्दांचा अर्थ समजेल. 
 
ऑलिम्पिकच्या पहिल्या तीन दिवसात भारतीय गोटातून कोणतीही सुखावणारी बातमी न मिळाल्यामुळे देशवासीयांची निराशा झाली आहे हे खर असलं तरी त्यासाठी सर्वस्वी खेळाडूंना जबाबदार धरण चुकीचं आहे. 
 
आणखी वाचा 
 
 
कारण ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये कुठलाही क्रीडापटू आपल्यातील सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी, मेडल जिंकण्यासाठी सहभागी होत असतो. ऑलिम्पिकला किती भारतीय खेळाडूंचे पथक गेले आहे ? ते कुठल्या खेळांमध्ये सहभागी होणार आहे हे शोभा डे यांना ठाऊकही नसेल. आता भारतीय खेळाडूंच्या पराभवाच्या बातम्या येत असल्यामुळे शोभा डे यांना जाग आली आहे.
 
या खेळाडूंनी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी काय कष्ट घेतले, किती आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेतला, प्रतिकुल परिस्थितीशी झगडताना कुठल्या अडथळयांचा सामना करावा लागला हे शोभा डे यांना माहितही नसेल. फक्त पदक मिळाले नाही म्हणून आता डें चा पारा चढला आहे. आज जे देश पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. 
 
उदहारणार्थ चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशातील क्रीडाक्षेत्रासाठीच्या पायाभूत सोयी-सुविधांची डे यांनी जाऊन पाहणी करावी त्यातुलनेत भारतीय क्रीडापटूंना काय मिळते याचा विचार करावा. आज ऑलिम्पिकपर्यंतची मजल मारणारे भारतीय खेळाडू सामान्य घरातून आले आहेत. आपली खेळाची आवड जपून देशासाठी पदक मिळवण्याच्या त्यांच्या जिद्दीला खरतर डे सारख्या व्यक्तींनी सलाम करायला हवा. 
 
कारण अनेकदा खेळाचा खर्च भागवताना संपूर्ण कुटुंबाची ओढाताण होते. प्रायोजक मिळवण्यासाठी अनेकांचे उंबरे झिजवावे लागतात तेव्हा कुठे ऑलिम्पिकपर्यंत मजल मारता येते. चीन, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशात असे होत नाही तिथे शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्रासाठीच्या उत्तम दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. तिथल्या मातीत क्रीडा संस्कृती रुजलेली आहे. 
 
भारतात अशी क्रीडा संस्कृती अजून रुजायची आहे. फक्त ऑलिम्पिक आले कि, आपल्याला पदक दिसतात. आपल्या क्रीडा क्षेत्राच्या दुरावस्थेवर वृत्तवाहिन्यांवर तासतासभर चर्चा होतात. त्याआधी आपण क्रिकेटच्या प्रेमात, क्रिकेटच्या विक्रमात  हरवलेलो असतो.