शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

संजीवनीने जिंकले कांस्य, भारतीय महिला संघानेही पटकावले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:37 AM

महाराष्ट्राची सुकन्या आणि भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिने चीन येथे सुरु असलेल्या १४व्या आशियाई क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ किमी शर्यतीमध्ये कांस्य पदकाची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकविला.

गुइयांग : महाराष्ट्राची सुकन्या आणि भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिने चीन येथे सुरु असलेल्या १४व्या आशियाई क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ किमी शर्यतीमध्ये कांस्य पदकाची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकविला. विशेष म्हणजे याच शर्यतीच्या सांघिक गटातही भारतीय संघाने कांस्य पदकाची कमाई करत आपली छाप पाडली.२० वर्षीय संजीवनीने २८ मिनिट १९ सेकंदाची वेळ देत शर्यत पूर्ण केली आणि कांस्य पदकावर नाव कोरले. चीनच्या ली डॅन हिने २८ मिनिट ३ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर कब्जा केला. तसेच, जपानच्या अ‍ॅबी युकारी हिने २८ मिनिट ६ सेकंदासह रौप्य पदक पटकावले.याच शर्यतीमध्ये सांघिक गटात भारतीय संघाला कांस्य पदक जिंकण्यात यश आले. चार धावपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघामध्ये संजीवनीसह स्वाती गाढवे, जुम्मा खातून आणि ललिता बाबर यांचा सहभाग होता. प्रत्येक संघातील तीन धावटूंची वैयक्तिक शर्यतीतील सर्वोत्तम वेळ लक्षात घेऊन सांघिक पदक निश्चित करण्यात आले. यानुसार भारताने कांस्य पटकावले.स्वातीने ३८ मिनिट १८ सेकंदाची वेळ देत ११वे स्थान पटकावले. तसेच, खातूनला ३२ मिनिट १४ सेकंदाच्या वेळेसह १४व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याचवेळी, भारताची स्टार धावपटू आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेजच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या ललिता बाबरला मात्र आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आली नाही.ललिताने ३२ मिनिट ५३ सेकंदाची वेळ नोंदवली आणि यासह ती १५ धावपटूंचा सहभाग असलेल्या या शर्यतीत तळाच्या स्थानी राहिली. मात्र, संजीवनी जाधवच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय संघाला पोडियम स्थान पटकावण्यात यश आले. (वृत्तसंस्था)>पुरुषांचे पदक थोडक्यात हुकलेपुरुषांच्या १२ किमी क्रॉस कंट्री शर्यतीमध्ये भारतीय संघाचे पदक थोडक्यात हुकले. या शर्यतीमध्ये भारताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.जपानने एकहाती वर्चस्व राखत सुवर्ण पटकावले असून चीन व इराण यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरले.भारतीय संघामध्ये शंकर क्षेत्री (९वा), प्रदीप चौधरी (११वा), अर्जुन कुमार (१४वा) आणि रती सैनी (१५वा) यांचा समावेश होता. पुरुषांच्या शर्यतीमध्ये एकूण २४ धावपटूंचा सहभाग होता.>पुनरागमन अपयशी... लग्नानंतर तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या ललिता बाबरला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. आशियाई स्पर्धा माझे मुख्य लक्ष्य असून यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा माझा विचार असल्याचे मत काही दिवसांपूर्वी ललिताने व्यक्त केले होते. मात्र, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर आता तिला आणखी मेहनत घ्यावी लागेल.