शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

चुकीच्या काळात खेळल्याची खंत: अंजू बॉबी जॉर्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींची केली प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 10:15 IST

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या अंजू बॉबी जॉर्जने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. 

नवी दिल्ली : ‘देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक कौतुकास्पद कार्य केले असून, याचा सकारात्मक परिणाम आपल्याला गेल्या काही वर्षांत पाहण्यास मिळाला. त्यामुळे मला मी चुकीच्या काळात खेळल्याची खंत आहे,’ असे व्यक्त होत जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या अंजू बॉबी जॉर्जने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी नाताळनिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान लांब उडीतील या दिग्गज खेळाडूने म्हटले की, ‘खेळाडू म्हणून मी जवळपास २५ वर्षे मैदानावर घाम गाळला आणि या दरम्यान अनेक बदल पाहिले. २० वर्षांपूर्वी जेव्हा मी देशाला पहिले जागतिक पदक मिळवून दिले होते, तेव्हा मला माझ्या विभागाकडूनही बढती मिळाली नव्हती, पण आज नीरज चोप्राच्या पदक विजयानंतरचे अनेक बदल मी पाहतेय. ज्या प्रकारे आपण जल्लोष करतोय, त्याचा मला हेवा वाटतो. कारण मी चुकीच्या काळात खेळत होती.’

अंजूने पुढे म्हटले की, ‘महिला सशक्तीकरण आता केवळ एक शब्द म्हणून राहिला नाही. प्रत्येक भारतीय मुलगी स्वप्न पाहू लागली असून, त्यांना आपली स्वप्न साकार होण्याचा विश्वासही मिळू लागला आहे.’