शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुवर्णपदक हेच आमचे लक्ष्य - स्क्वॅशपटू महेश मानगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 07:20 IST

२०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही स्क्वॅशचे सांघिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.

अभिजित देशमुखथेट जकार्ता येथून२०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही स्क्वॅशचे सांघिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. आम्ही यंदाही उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित झाले असले, तरी आमचे लक्ष्य सुवर्णपदकच आहे, असे भारतीय पुरुष संघाचा स्क्वॅशपटू महेश मानगावकर याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महेशने पुढे म्हटले, ‘मी, सौरव घोषाल, हरिंदरपाल गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतसुद्धा होतो; त्यामुळे आमचा संघ मजबूत आणि अनुभवी आहे. रमीत टंडनसुद्धा उत्तम खेळत आहे. आम्हाला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची परिस्थिती माहीत आहे. सिंगापूर, कतार, इंडोनेशिया, थायलंड यासारख्या संघांचा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली; त्यामुळे प्रदर्शन योग्य मार्गावर आहे.’यंदाची स्पर्धा खडतर असल्याचे सांगताना महेश म्हणाला, ‘मागच्या आशियाई क्रीडा स्पर्धांपेक्षा या वेळी स्पर्धा कठीण आहे. हाँगकाँगला या स्पर्धेमध्ये शीर्षस्थान लाभले आहे. त्यांनी आपला सर्वाेत्तम संघ पाठविला आहे. त्यांचे दोन खेळाडू जागतिक क्रमवारीत २०मध्ये आहेत. त्यामुळे आव्हान हाँगकाँगचे आहे. मलेशियाचे खेळाडू चांगल्या बहरात आहेत.’

त्याचप्रमाणे, ‘आम्ही वर्षभर वैयक्तिक स्पर्धा खेळतो; पण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय संघासोबत खेळण्याची खूप उत्सुकता असते. यावेळी प्रत्येक खेळाडूवर थोडा दबाव नक्कीच असतो, कारण आपल्या संघाचे सदस्य आपल्यावर अवलंबून असतात. त्याचवेळी संघसहकारी प्रोत्साहन देऊन आत्मविश्वाही वाढवतात. मी मूळचा मुंबईचा असलो, तरी प्रशिक्षण नेदरलँड्समध्ये करतो. आशियाई स्पर्धेसाठी खूप चांगली तयारी झाली आहे. स्क्वॅशमध्ये गती आणि प्रतिक्षेप सर्वांत महत्त्वाचे आहे. फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. माझे वैयक्तिक प्रशिक्षक सेबास्टियन वैनीक यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहे,’ असेही महेशने सांगितले.भारताच्या पुरुष स्क्वाश संघामध्ये महेश माणगावकर मोलाचे योगदान दिले आहे. भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असलेला महेश मूळचा मुंबईचा असून तो नेदरलँड्सला सराव करतो.‘मलेशियाला हरवणे असंभव नाही’मलेशिया जरी फॉर्ममध्ये असला, तरी उपांत्य फेरीत त्याला हरवण्यास आम्ही सक्षम आहोत. शेवटच्या साखळी सामन्यात हाँगकाँगविरुद्ध आम्ही थोडे कमी पडलो. हाँगकाँगच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मला गती कायम राखता आली नाही. तरी, मी एक सेट जिंकला; पण सामना जिंकू शकले नाही, याची खंत आहे. सुयांना कुरुविलाने आपल्या करिअरचा सर्वाेत्तम खेळ करून १-१ अशी बरोबरी साधली. जोशना चिनाप्पाचा आज दिवस नव्हता. ती सरळ सेटमध्ये पराभूत झाली. असे सहजासहजी कधी होत नाही. उपांत्य फेरीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू, असे स्क्वॅशपटू दीपिका पालिकल- कार्तिक हिने सांगितले.चांगला खेळ झाला नाहीआम्ही चांगले खेळलो नाही. दुसरा गोल आम्ही स्वीकारायला नको होता. पेनल्टीमध्ये कुठलाही संघ जिंकू शकतो. मलेशियाने सामना जिंकला नाही; आम्ही हा सामना गमावला. आम्ही खूप चुका केल्या. आम्ही साधी हॉकी खेळलो नाही आणि आमच्याकडे बॉलचा ताबा खूप होता; परंतु आपल्या खेळाडूंना त्याचा फायदा उचलता आला नाही, असे भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंद्रसिंगने सांगितले.६५ पदके मिळवू : रणधीरसिंगभारताची सर्वोत्तम कामगिरी २०१०मध्ये ६५ पदकांची होती. आतापर्यंतच्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरून नक्कीच आपण ६५चा आकडा पार करू, असे माजी आॅलिम्पियन व आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे सदस्य रणधीरसिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बºयाच खेळांत आपले पदक नक्की झाले आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत समाविष्ट झालेले खेळ वुशू, कुराश, ब्रिज यांमध्ये आपल्या खेळाडूंनी पदके जिंकल्यामुळे आपल्या पदकतालिकेत खूप फरक पडला आहे. अविश्वसनीय कामगिरी या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी बजावली आहे. तरुण खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतीय क्रीडाक्षेत्राला नक्कीच चांगले दिवस येतील, असा विश्वास मला वाटतो. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा