शहरं
Join us  
Trending Stories
1
जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
4
Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन
5
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
6
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
7
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
8
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
9
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
10
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
11
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
12
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
13
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
14
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
15
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
16
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
17
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
18
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
19
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
20
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

वर्ल्डकपमधील भारत-पाक सामन्याला विरोध

By admin | Updated: February 28, 2016 01:03 IST

टी-२० विश्वचषकात धर्मशाला स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत होणार आहे. या सामन्याला पठाणकोट हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनी विरोध

शिमला : टी-२० विश्वचषकात धर्मशाला स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत होणार आहे. या सामन्याला पठाणकोट हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनी विरोध केला आहे. हा सामना १९ मार्च रोजी होईल. हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह म्हणाले, की सैन्यदलाचे माजी अधिकारी आणि शहिदांच्या कुटुंबीयांनी या सामन्याला विरोध केला आहे. पाकिस्तानविरोधात होणाऱ्या सामन्याला नागरिकांचा विरोध आहे. मात्र, अन्य सामन्यांना नागिरकांकडून विरोध होत नाही.पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या दोन सैनिकांचे नातेवाईक कांगडा जिल्ह्यात राहतात. त्यांच्या नातेवाइकांनी धर्मशाला स्टेडियममध्ये पाकिस्तानी संघाच्या येण्याला विरोध केला आहे. सिंह म्हणाले की, ‘‘विरोधी पक्षानेदेखील या सामन्याला विरोध केला आहे. हा सामना धर्मशाला येथे आयोजित न करण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकार दोन्ही संघांना पूर्ण समर्थन देण्यासाठी कटिबद्ध आहे.’’परिवहनमंत्री जी. एस. बाली यांनी हा सामना अन्य राज्यात आयोजित करण्यासाठी १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. बाली म्हणाले, ‘‘हा सामना इतर राज्यात आयोजित केला नाही, तर जिल्ह्यात त्याला विरोध केला जाईल.’’ तसेच, मोठ्या संख्येने आमदार आणि भाजप नेत्यांनी धर्मशाला स्टेडियमच्या बाहेर शहीद पार्कमध्ये धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)