शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 06:28 IST

Olympics 2036: भारताने २०३६ साली ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना या संबंधीचे आशय पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले आहे.

नवी दिल्ली - भारताने २०३६ साली ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना या संबंधीचे आशय पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) १ ऑक्टोबरलाच आयओसीला पत्र दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सर्वप्रथम २०३६ साली ऑलिम्पिक यजमानपदाची इच्छा व्यक्त केली होती. पुढील वर्षी आयओसीची निवडणूक पार पडणार असून, त्याआधी ऑलिम्पिक यजमानपदाचा निर्णय घेतला जाणार नाही. २०३६ सालच्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारतासह सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्तान यांचाही समावेश आहे. भारताने आशय पत्र दिल्याने आता यजमान निवडण्याच्या प्रक्रियेत भारत अनौपचारिक संवादापासून निरंतर संवादाच्या सत्रात पोहचला आहे. यामध्ये संभाव्य यजमानांसह आयओसीच्या वतीने विविध प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन होते.

विशेष म्हणजे, भारताच्या यजमानपदाला आयओसीचे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाक यांचाही पाठिंबा आहे. भारताने याआधी २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा दिल्ली येथे पार पडली होती. परंतु, ऑलिम्पिक पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन अहमदाबादमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी जर भारताला यजमानपद मिळाले, तर या ऑलिम्पिक पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये योग, खो-खो आणि कबड्डी या देशी खेळांचा समावेश करण्याबाबत भारताकडून जोरदार प्रयत्न होतील.

टॅग्स :Indiaभारत