शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 06:28 IST

Olympics 2036: भारताने २०३६ साली ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना या संबंधीचे आशय पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले आहे.

नवी दिल्ली - भारताने २०३६ साली ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना या संबंधीचे आशय पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) १ ऑक्टोबरलाच आयओसीला पत्र दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सर्वप्रथम २०३६ साली ऑलिम्पिक यजमानपदाची इच्छा व्यक्त केली होती. पुढील वर्षी आयओसीची निवडणूक पार पडणार असून, त्याआधी ऑलिम्पिक यजमानपदाचा निर्णय घेतला जाणार नाही. २०३६ सालच्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारतासह सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्तान यांचाही समावेश आहे. भारताने आशय पत्र दिल्याने आता यजमान निवडण्याच्या प्रक्रियेत भारत अनौपचारिक संवादापासून निरंतर संवादाच्या सत्रात पोहचला आहे. यामध्ये संभाव्य यजमानांसह आयओसीच्या वतीने विविध प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन होते.

विशेष म्हणजे, भारताच्या यजमानपदाला आयओसीचे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाक यांचाही पाठिंबा आहे. भारताने याआधी २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा दिल्ली येथे पार पडली होती. परंतु, ऑलिम्पिक पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन अहमदाबादमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी जर भारताला यजमानपद मिळाले, तर या ऑलिम्पिक पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये योग, खो-खो आणि कबड्डी या देशी खेळांचा समावेश करण्याबाबत भारताकडून जोरदार प्रयत्न होतील.

टॅग्स :Indiaभारत