शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभ आजपासून; भारतीय खेळाडूंना ऐतिहासिक कामगिरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 08:19 IST

कोरोनाची दहशत कायम असताना टोकियो ऑलिम्पिकचा महाकुंभ आज शुक्रवारपासून सुरू होत आहे.

टोकियो : कोरोनाची दहशत कायम असताना टोकियो ऑलिम्पिकचा महाकुंभ आज शुक्रवारपासून सुरू होत आहे. वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेल्या या ऑलिम्पिकची नोंद मात्र २०२० अशीच होईल, हे विशेष. खेळाडूंमध्ये उत्साह आणि स्फूर्ती असली तरी प्रेक्षकांची साथ मिळणार नसल्याने मनात शंका आणि तणाव कायम आहे. तरीही ‘आशेचा किरण’ ठरणाऱ्या क्रीडाविश्वातील सर्वांत मोठ्या आयोजनात भारतीय खेळाडू स्वत:च्या लौकिकाची ऐतिहासिक यशोगाथा लिहितील, अशी देशवासीयांना अपेक्षा आहे.

कुस्ती, नेमबाजी, मुष्टियुद्ध या खेळात पदकांची आशा आहे. जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक टोकियोत हजारो खेळाडू, सपोर्ट स्टाफ, आणि अधिकाऱ्यांची मांदियाळी भरली असल्याने प्रत्येक दिवशी हजारावर कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यातील मोजकी प्रकरणे खेळाशी संबंधित असली तरी भय कायम आहे. ऑलिम्पिक भावनेचे प्रतीक असलेला प्रेक्षकांचा उत्साह येथे पहायला मिळत नाही. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये केवळ सकारात्मक गोष्टींवर फोकस असावा असा आयओसीचा प्रयत्न आहे. शुक्रवारच्या उद्‌घाटनानंतर ८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या ऑलिम्पिकला अधिकृत सुरुवात होणार आहे. भारताचा विचार केल्यास १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने आतापर्यंत २९ पदके जिंकली.१९०० ला पहिल्यांदा सहभाग नोंदविला. तेव्हापासून वैयक्तिक सुवर्ण केवळ नेमबाज अभिनव बिंद्राच्या नावावर आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने हे पदक जिंकले होते. यंदा १२७ खेळाडू सहभागी झाले असून त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली, पण त्यात एकही सुवर्ण नव्हते.

भारताचे २० खेळाडू, ६ अधिकारी सहभागी होणार

- ऑलिम्पिक उद्‌घाटन सोहळ्यात केवळ २० खेळाडू सहभागी होणार आहेत. दुसऱ्या दिवशी ज्यांची स्पर्धा आहे, अशांना आधीच सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले. 

- २० खेळाडू आणि सहा अधिकारी असे २६ जण भारतीय पथकात असतील. कोरोनाच्या संकटापासून वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयओए महासचिव राजीव मेहता यांनी दिली. 

- भारतीय पथकात १२७ खेळाडूंसह एकूण २२८ जणांचा समावेश आहे. नेमबाजांच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा असल्याने ते सोहळ्यात उपस्थित राहणार नाहीत. 

- मेरी कोमसह भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हा सोहळ्यात ध्वजवाहक असेल.  

- जे खेळाडू सहभागी होणार आहेत, त्यात मनिका बत्रा आणि अचंता शरथ कमलसह टेटेचे चार खेळाडू, नौकायानचे चार खेळाडू, तलवारबाज भवानीदेवी, जिम्नॅस्ट प्रणती नायक आणि जलतरणपटू  साजन प्रकाश, मुष्टियोद्धे सिमरनजीत कौर, लवलीना बोरगोहेन, पूजा रानी, अमित पंघाल, मनीष कौशिक, आशिष कुमार आणि सतीश कुमार यांचा समावेश असेल.

युगांडाचा बेपत्ता भारोत्तोलनपटू भारताच्या ट्रॅकसूटमध्ये आढळला

- युगांडाचा ऑलिम्पिकमधून बेपत्ता झालेला भारोत्तोलनपटू ज्युलियस सेकिटोलेंको हा नरिता विमानतळावर भारताचा ट्रॅकसूट घालून आढळल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक पथकातील अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्युलियस ऑलिम्पिकचा सराव करताना पळून गेला होता. चार दिवसानंतर शोध घेत त्याची मायदेशी रवानगी करण्यात आली होती.

- एका वाहिनीने दाखविलेल्या वृत्तात २० वर्षांचा ज्युलियस नरिता विमानतळावर लाल रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसला. या सूटच्या मागे ‘इंडिया’ असे लिहिले आहे. भारतीय खेळाडूंनी २०१८ च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुलदरम्यान अशा प्रकारची किट घातली होती. 

- आयओए महासचिव राजीव मेहता यांनी यावर स्पष्टीकरण देत हा टोकियो ऑलिम्पिकचा अधिकृत ड्रेस नाही, असे म्हटले आहे.

- वृत्तसंस्थेशी बोलताना मेहता म्हणाले,‘हा रंग ऑलिम्पिकमध्ये भारताची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती देखील वापरत नाही.’

ऑलिम्पिकमध्ये आज भारत: 

- पहाटे ५.३० तिरंदाजी: महिला वैयक्तिक फेरी, दीपिका कुमारी. 

- सकाळी ९.३०: पुरुष वैयक्तिक फेरी अतानू दास, प्रवीण जाधव, तरुणदीप राय.

पदकांच्या दावेदारांवर असेल नजर

भारतासाठी यंदा १५ नेमबाज पदकांचे दावेदार आहेत. १९ वर्षांची मनू, २० वर्षांची इलावेनिल, १८ वर्षांचा दिव्यांश पंवार आणि २० वर्षांचा ऐश्वर्य प्रताप यांच्या कामगिरीकडे नजर असेल. भारोत्तोलनात ४९ किलो गटात मीराबाई चानू तर तलवारबाजीत सी. ए. भवानी देवी या देखील पदाकांच्या शर्यतीत आहेत. तिरंदाजीत नंबर वन असलेली दीपिका कुमारी हिच्या नेतृत्वाखालील तिरंदाजी पथकाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

मुष्टियुद्धात अमित पंघाल, एम. सी. मेरीकोम, आशियाडचा माजी विजेता विकास कृष्ण हे ‘गोल्डन पंच’ची नोंद करू शकतात. दुसरीकडे सात मल्लांपैकी बजरंग पुनिया, विनेश फोगाट, दीपक पुनिया, रवी दहिया हे मोक्याच्या क्षणी पदक मिळवून देतील, अशी आशा आहे.मागच्या चार दशकापासून ऑलिम्पिक पदकाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला व पुरुष हॉकी संघाकडून उत्कृष्ट कामगिरी अपेक्षित आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने आठवे आणि अखेरचे सुवर्ण पदक १९८० ला जिंकले होते. टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि मनिका बत्रा कमाल करू शकतील. ॲथ्लेटिक्समध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि गोळाफेकपटू तेजिंदरसिंग तूर हे मिल्खासिंग यांचे पदकाचे स्वप्न पूर्ण करतील का,असा देशवासीयांना प्रश्न पडला आहे.

बॅडमिंटनमध्ये सिंधूने रियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या रौप्य पदकाचा रंग सुवर्णमय करेल का, याची उत्सुकता असून अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. अश्वारोहणपटू फौवाद मिर्झा तर जलतरणात साजन प्रकाश, श्रीहरी नटराज हे देखील नशिब अजमावणार आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेले नैराश्य, भीती आणि त्रास या गोष्टी मागे टाकून आनंद देणारी कामगिरी घडावी, अशी कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Indiaभारत