शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

मुंबईचा पृथ्वी ‘शो’

By admin | Updated: January 6, 2017 01:16 IST

१७ वर्षीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणात झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेत विक्रमी ४६व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

राजकोट : १७ वर्षीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणात झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेत विक्रमी ४६व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या डावात पृथ्वीने १७५ चेंडूत १२० धावांची जबरदस्त खेळी केली. या जोरावर मुंबईने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात अखेरच्या दिवशी २५१ धावांचे लक्ष्य गाठले. संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात मोलाचे योगदाने दिलेल्या पृथ्वीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.तीन वर्षांपूर्वी मुंबईत शालेय क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने ५४६ धावांची विक्रमी खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनीच पृथ्वीने ही विक्रमी खेळी केल्याने त्याची तुलना तेंडुलकरशी होत होती. तर, आता रणजी पदार्पणात शतक केले असल्याने पुन्हा एकदा सचिनच्या आठवणी ताजा झाल्या आहेत. दरम्यान, १० जानेवारीपासून इंदोर येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईपुढे गुजरातचे कडवे आव्हान असेल.तमिळनाडूने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव ६ बाद ३५६ धावांवर घोषित करून मुंबईला विजयासाठी २५१ धावांचे आव्हान दिले. परंतु, पृथ्वीच्या शानदार खेळीपुढे हे आव्हान सहजपणे पार करताना मुंबईने स्पर्धा इतिहासात ४६व्यांदा अंतिम फेरी गाठली. पाचव्या दिवशी बिनबाद ५ धावांवरून सुरुवात करताना पृथ्वी - प्रफुल वाघेला यांनी संघाला ९० धावांची सलामी दिली. वाघेला ६७ चेंडूत ३६ धावा काढून परतला. यानंतर पृथ्वीने अनुभवी श्रेयश अय्यरसह (४०) संघाला सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. तर, तिसऱ्या विकेटसह सुर्यकुमार यादवसह (३४) शानदार ५७ धावांची भागीदारी करुन पृथ्वीने मुंबईला विजयासमीप नेले. मुंबईच्या विजयामध्ये निर्णायक कामगिरी केलेल्या पृथ्वीने दुसऱ्या डावात एकुण ३ अर्धशतकी भागीदारी केल्या. त्याने २७२ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडताना १७५ चेंडूत १३ चौकार एका षटकारासह १२० धावा चोपल्या. दखल घेण्याची बाब म्हणजे वैयक्तिक ९९ धावांवर असताना पृथ्वीला विजय शंकरच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. याचा पुरेपूर फायदा घेताना त्याने पदार्पणात शतक झळकावले. अखेर, मुंबईला विजयासाठी केवळ १० धावांची आवश्यकता असताना पृथ्वी फिरकी गोलंदाज औशिक श्रीनिवासच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटला झेल देऊन परतला. श्रीनिवासने सर्वाधिक २ बळी घेतले. तर, बाबा अपराजित आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तमिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ३०५.मुंबई (पहिला डाव) : १५०.३ षटकांत सर्वबाद ४११ धावा.तमिळनाडू (दुसरा डाव) : ७८ षटकांत ६ बाद ३५६ धावा - घोषित.मुंबई (दुसरा डाव) : ६२.१ षटकात ४ बाद २५१ धावा (पृथ्वी शॉ १२०, श्रेयश अय्यर ४०; औशिक श्रीनिवास २३-७-७३-२)पृथ्वीचे शतक रिझवींना अर्पण...पृथ्वीच्या खेळीचा गर्व आहे. त्याने झळकावलेले शतक आम्ही रिझवी शिक्षण संस्थेचे दिवंगत सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अबीस रिझवी यांना अर्पण करीत आहोत. त्याचे पदार्पण शानदार ठरले. आता त्याला मागे वळून पाहायचे नाही. पहिल्या डावात तो स्वत:च्या चुकीने बाद झाला. तेव्हा पृथ्वीने पुढच्यावेळी संधी मिळाल्यास ही चूक सुधारण्याचे आश्वासन दिले आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले, असे पृथ्वीचे शालेय प्रशिक्षक राजू पाठक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.९९ धावांवर जीवदान!या सामन्यात पृथ्वीला नशिबाने चांगलीच साथ दिली. वैयक्तिक ९९ धावांवर खेळत असताना पृथ्वीने फिरकीपटू विजय शंकरच्या गोलंदाजीवर शॉर्ट थर्ड मॅनला झेल दिला. परंतु, पंचानी हा चेंडू नोबॉल ठरविल्यानंतर पृथ्वीने मिळालेली संधी साधताना रणजी पदार्पणात शतक झळकावले. यासह त्याने रणजी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकर व अजिंक्य रहाणे यांसारख्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळविले.