शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईचा पृथ्वी ‘शो’

By admin | Updated: January 6, 2017 01:16 IST

१७ वर्षीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणात झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेत विक्रमी ४६व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

राजकोट : १७ वर्षीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणात झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेत विक्रमी ४६व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या डावात पृथ्वीने १७५ चेंडूत १२० धावांची जबरदस्त खेळी केली. या जोरावर मुंबईने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात अखेरच्या दिवशी २५१ धावांचे लक्ष्य गाठले. संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात मोलाचे योगदाने दिलेल्या पृथ्वीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.तीन वर्षांपूर्वी मुंबईत शालेय क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने ५४६ धावांची विक्रमी खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनीच पृथ्वीने ही विक्रमी खेळी केल्याने त्याची तुलना तेंडुलकरशी होत होती. तर, आता रणजी पदार्पणात शतक केले असल्याने पुन्हा एकदा सचिनच्या आठवणी ताजा झाल्या आहेत. दरम्यान, १० जानेवारीपासून इंदोर येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईपुढे गुजरातचे कडवे आव्हान असेल.तमिळनाडूने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव ६ बाद ३५६ धावांवर घोषित करून मुंबईला विजयासाठी २५१ धावांचे आव्हान दिले. परंतु, पृथ्वीच्या शानदार खेळीपुढे हे आव्हान सहजपणे पार करताना मुंबईने स्पर्धा इतिहासात ४६व्यांदा अंतिम फेरी गाठली. पाचव्या दिवशी बिनबाद ५ धावांवरून सुरुवात करताना पृथ्वी - प्रफुल वाघेला यांनी संघाला ९० धावांची सलामी दिली. वाघेला ६७ चेंडूत ३६ धावा काढून परतला. यानंतर पृथ्वीने अनुभवी श्रेयश अय्यरसह (४०) संघाला सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. तर, तिसऱ्या विकेटसह सुर्यकुमार यादवसह (३४) शानदार ५७ धावांची भागीदारी करुन पृथ्वीने मुंबईला विजयासमीप नेले. मुंबईच्या विजयामध्ये निर्णायक कामगिरी केलेल्या पृथ्वीने दुसऱ्या डावात एकुण ३ अर्धशतकी भागीदारी केल्या. त्याने २७२ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडताना १७५ चेंडूत १३ चौकार एका षटकारासह १२० धावा चोपल्या. दखल घेण्याची बाब म्हणजे वैयक्तिक ९९ धावांवर असताना पृथ्वीला विजय शंकरच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. याचा पुरेपूर फायदा घेताना त्याने पदार्पणात शतक झळकावले. अखेर, मुंबईला विजयासाठी केवळ १० धावांची आवश्यकता असताना पृथ्वी फिरकी गोलंदाज औशिक श्रीनिवासच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटला झेल देऊन परतला. श्रीनिवासने सर्वाधिक २ बळी घेतले. तर, बाबा अपराजित आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तमिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ३०५.मुंबई (पहिला डाव) : १५०.३ षटकांत सर्वबाद ४११ धावा.तमिळनाडू (दुसरा डाव) : ७८ षटकांत ६ बाद ३५६ धावा - घोषित.मुंबई (दुसरा डाव) : ६२.१ षटकात ४ बाद २५१ धावा (पृथ्वी शॉ १२०, श्रेयश अय्यर ४०; औशिक श्रीनिवास २३-७-७३-२)पृथ्वीचे शतक रिझवींना अर्पण...पृथ्वीच्या खेळीचा गर्व आहे. त्याने झळकावलेले शतक आम्ही रिझवी शिक्षण संस्थेचे दिवंगत सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अबीस रिझवी यांना अर्पण करीत आहोत. त्याचे पदार्पण शानदार ठरले. आता त्याला मागे वळून पाहायचे नाही. पहिल्या डावात तो स्वत:च्या चुकीने बाद झाला. तेव्हा पृथ्वीने पुढच्यावेळी संधी मिळाल्यास ही चूक सुधारण्याचे आश्वासन दिले आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले, असे पृथ्वीचे शालेय प्रशिक्षक राजू पाठक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.९९ धावांवर जीवदान!या सामन्यात पृथ्वीला नशिबाने चांगलीच साथ दिली. वैयक्तिक ९९ धावांवर खेळत असताना पृथ्वीने फिरकीपटू विजय शंकरच्या गोलंदाजीवर शॉर्ट थर्ड मॅनला झेल दिला. परंतु, पंचानी हा चेंडू नोबॉल ठरविल्यानंतर पृथ्वीने मिळालेली संधी साधताना रणजी पदार्पणात शतक झळकावले. यासह त्याने रणजी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकर व अजिंक्य रहाणे यांसारख्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळविले.