शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

India vs Pakistan Hockey Asia Cup 2022 : ५० मिनिटे राखलेली आघाडी भारताने क्षणात गमावली, पाकिस्तानने अखेरच्या मिनिटाला बरोबरी मिळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:47 IST

India vs Pakistan Men's Hockey Asia Cup: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत झाला.

India vs Pakistan  Men's Hockey Asia Cup: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत झाला. दक्षिण कोरियाने आशिया चषक सर्वाधिक चार ( १९९४, १९९९, २००९ व २०१३) वेळा जिंकला आहे. भारत ( २००३, २००७ व २०१७) आणि पाकिस्तान ( १९८२, १९८५ व १९८९) यांनी प्रत्येकी तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. आजच्या लढतीआधी भारत-पाकिस्तान यांच्यातली जय-पराजयाची आकडेवारी ही २८-२५ अशी राहिली आहे आणि पाच सामने ड्रॉ राहिले आहेत. आजचा सामना चुरशीचा झाला. ८व्या मिनिटाला भारताने घेतलेली आघाडी पुढील ५० मिनिटे टिकून राहिली होती, परंतु पाकिस्तानकडून अखेरच्या मिनिटाला बरोबरीचा गोल झाला.  पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीच्या पाच मिनिटांत दोन्ही संघांना २-२ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु गोल करण्यात दोघंही अपयशी ठरले. भारतीय संघात बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. ज्युनियर वर्ल्ड कप विजेत्या संघातील १० खेळाडू या स्पर्धेतून सीनियर संघात पदार्पण करत आहेत. पाकिस्तानविरुद्ध या नव्या दमाच्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली आणि चेंडूवर ताबा राखताना पाकिस्तानला बॅकफूटवर ठेवले. ८व्या मिनिटाला सेलवम कार्थीने पेनल्टी कॉर्नवर गोल केला आणि सीनियर संघाकडून पदार्पण दणक्यात केले. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये १-० ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानकडून पहिल्याच मिनिटाला आक्रमण झाले. पाकिस्तानी खेळाडू चेंडू सर्कलमध्ये घेऊन पोहोचले होते, परंतु अखेरच्या क्षणाला त्यांना रोखले गेले. पाकिस्तानचा संघ चेंडूवर ताबा राखून सावध खेळावर भर देताना दिसला. त्यांच्या या रणनीतीला भारतीय खेळाडूंनी लाँग पास देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला. २०व्या मिनिटाला पाकिस्तानच्या खेळाडूंनी बरोबरीचा गोल केलाच होता, परंतु गोलरक्षक सुरज करकेरा आडवा आला. त्यानंतरही अफराजला गोल करण्याची संधी होती, परंतु त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला.

२१व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला अन् यावेळेस पाकिस्तानचा गोलरक्षक अकमल हुसैन याने चेंडू अडवला. २८व्या मिनिटाला भारतीय गोलरक्षकाने सुरेख बचाव केला. पण, त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्यांच्यातच समन्वयाचा अभाव दिसला आणि चेंडूवरील ताबा त्यांनी गमावला. भारताने पहिल्या हाफमध्ये १-० अशी आघाडी कायम राखली. भारताने पहिल्या ३० मिनिटांत ४ ऑन टार्गेट प्रयत्न केले, तर ४ पैकी १ कॉर्नरवर गोल करण्यात यश मिळवले. 

दुसऱ्या हाफमध्ये पहिल्याच मिनिटाला पाकिस्तानने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. छोटे पण अचूक पास करत पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना दडपणात ठेवले. त्याच जोरावर ३३व्या मिनिटाला अब्दुल राणा गोलजाळीच्या समोर जाऊन पोहोचला होता, परंतु करकेराने पुन्हा एकदा सुरेख बचाव केला. ३८व्या मिनिटाला पाकिस्तानी गोलीने भारताचा दुसरा गोल अडवला, परंतु कॉर्नर मिळवण्यापासून त्यांना रोखू शकला नाही. पण, पाकिस्तानी गोली मजबूत भिंतीसारखा उभा राहिला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या वर्तुळावर सातत्याने आक्रमण केले. ४१व्या मिनिटाला पुन्हा पाकिस्तानने संधी गमावली. भारतालाही सातत्याने कॉर्नर मिळूनही आघाडी अधिक मजबूत करता येत नव्हती. 

चौथ्या क्वार्टरमध्ये करकेराने आणखी एक अप्रतिम बचाव केला. अखेरच्या क्षणाला गोल करण्यात अपयश येताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंची चिडचिड झालेली दिसली. पण, ५८व्या मिनिटाला अब्दुल राणाने गोल केला. हा सामना १-१असा बरोबरीत सुटला.  

टॅग्स :HockeyहॉकीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान