शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

महागणपतीच्या साक्षीने 'महाराष्ट्र श्री'चा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:10 IST

ग्रामिण भागातील युवकांना आकर्षित करण्यासाठी टिटवाळ्यात स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र श्रीचा थरार आजवर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे या शहरी भागातच अधिक पाहायला मिळालाय. पण शरीरसौष्ठवाची आणि फिटनेसची केझ आता दिवसेंदिवस ग्रामिण भागातही झपाट्याने वाढतेय. ग्रामिण भागातील युवकांमध्ये शरीरसौष्ठवाची केझ वाढावी, त्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी 15 व्या महाराष्ट्र श्रीच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे. महागणपतीच्या साक्षीने  महाराष्ट्र श्रीचा सोहळा स्पर्धा त्याच जोशात जललेषात आणि त्याच दिमाखात येत्या 5आणि 6 मार्चला होणार आहे.

नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे राहणारे आणि टिटवाळ्यात खेळांच्या भव्य स्पर्धा आयोजनाचा जललेष साजरे करणारे नगरसेवक आणि आयोजक संतोष तरे यांनी शहरी भागाप्रमाणे ग्रामिण भागातही महाराष्ट्र श्री स्पर्धा भव्यदिव्य प्रमाणात होऊ शकते, हे दाखवून देण्यासाठीच त्यांनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी शरीरसौष्ठवपटूंना दिल्या जाणाऱया उत्तम सुविधा टिटवाळ्यातही उपलब्ध केल्या आहेत. तब्बल दोनशे खेळाडूंच्या निवासासह दोन दिवस त्यांना त्यांचा आवडता खुराकही दिला जाणार असल्याचे तरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या महाराष्ट्र श्रीचा थाट यंदाही तसाच असेल. स्पर्धा राज्य अजिंक्यपद असली तरी या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी लिलया पार पाडणाऱया महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने होणार आहे. या स्पर्धेतही खेळाडूंनाच प्राथमिकता देण्यात आल्dयाचे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांनी सांगितले. 6 मार्चला महाराष्ट्र श्रीचा अंतिम सामना रंगणार असून विजेत्याला गतवर्षीप्रमाणे दीड लाखाचा रोख पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर उपविजेत्याला 75 हजारांचे रोख इनाम देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. एकंदर दहा गटात स्पर्धा रंगणार असून सहा खेळाडूंवर 15, 12, 8, 6, 5 आणि 3 हजार अशा रोख पुरस्कारांची उधळण केली जाईल.

महिलांची ताकद वाढणार

महिलांसाठी फिजीक स्पोर्टस् आणि शरीरसौष्ठव असे दोन्ही गट या स्पर्धेत खेळविले जाणार आहेत. मिस मुंबई स्पर्धेतच सात खेळाडूंच्या सहभागामुळे मिस महाराष्ट्रसाठी महिलांचा आकडा वाढणार हे निश्चित होते. त्यानूसार या स्पर्धेत तब्बल 20 पेक्षा  अधिक महिला ऍथलीट खेळणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे यांनी दिली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही सहापेक्षा अधिक पीळदार सौंदर्य मंचावर अवतरणार असल्याचे सांगून स्पर्धा जोरदार होणार असल्याचे संकेत दिले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारातही महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचा अंतिम आकडा 50 च्या आसपास असेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

 

महाराष्ट्र श्रीत सुनीतसमोर कडवे आव्हान

सलग पाचवेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणाऱया सुनीत जाधवला जेतेपदाचा षटकार ठोकणे फार आव्हानात्मक असेल. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका राज्यस्तरीय स्पर्धेतच त्याची चाहूल लागली आहे. गेल्या चार वर्षात आजवर एकाही स्थानिक स्पर्धेत फक्त विजयासाठीच उतरत असलेल्या सुनीतला धक्का बसला आहे. नवी मुंबईत झालेल्या या स्पर्धेत 85 किलो वजनीगटात सुनीत जाधवसह सागर माळी आणि महेंद्र चव्हाणसारखे तगडे खेळाडू उतरले होते. हा गटच अंतिम सामन्यासारखा होता. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरलेल्dया सागर माळीने सनसनाटी निर्माण केली. त्याने या गटाचे विजेतेपद सुनीत जाधव आणि महेंद्र चव्हाणला धक्का देत मिळविले. सर्वात आश्चर्याचे म्हणजे गटविजेता निवडताना सुनीत जाधवऐवजी सागर माळी आणि महेंद्र चव्हाणची कंपेरिझन घेण्यात आली. सागरने गटविजेतेपद जिंकत आपले जेतेपदही निश्चित केले तर महेंद्र दुसरा आला. सुनीतची धक्कादायकरित्या तिसऱया क्रमांकावर घसरण झाली. या अनपेक्षित निकालामुळे महाराष्ट्र श्रीची चुरस निश्चितच वाढली आहे. या स्पर्धेसाठी महेंद्र पगडे आणि अनिल बिलावा हे  जबरदस्त तयारीतले खेळाडूही उतरत असल्यामुळे सुनीत जेतेपदाचा सिक्सर मारतो की बोल्ड होतो, हे पुढच्या आठवड्यातच कळेल.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश सावंत (9867209971), सुनील शेगडे ( 9223348568) आणि सागर मोरे (9960522168) यांच्याशी संपर्प साधावा असे आवाहन शरीरसौष्ठव संघटेनेचे उपाध्यक्ष मदन कडू यांनी केले आहे.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMaharashtraमहाराष्ट्र