शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लिंगायत महामोर्चामुळे ‘लोकमत’ महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला! लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:53 IST

लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणा-या राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणा-या लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणाºया राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणाºया लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आता ही महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीस होईल.‘लोकमत’तर्फे आतापर्यंत नाशिक व औरंगाबादला महामॅरेथॉन झाली. नागपूरला ११ फेब्रुवारीस होणार आहे. तत्पूर्वी ही महामॅरेथॉन कोल्हापुरात २८ जानेवारीस सकाळी सहा वाजता होणार होती. ३, ५, १० व २१ किलोमीटर गटांत ही मॅरेथॉन होणार असून, त्याची जय्यत तयारीही पूर्ण झाली आहे. विजेत्यांना रोख बक्षिसासह पदक दिली जातील. ही मॅरेथॉन पोलीस परेड ग्राऊंडपासून सुरू होऊन कावळा नाका, विद्यापीठ, शाहू नाका व तेथून परत त्याचमार्गे पोलीस परेड ग्राऊंडवर समाप्त होणार होती.दरम्यान, लिंगायत धर्माला संविधानिक ‘स्वतंत्र धर्म’ मान्यता मिळावी, अल्पसंख्याक दर्जा मिळावा व जनगणना अर्जात लिंगायत नोंदीसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे २८ जानेवारीलाच येथील दसरा चौकातून सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मुख्यत: महाराष्ट्रातून व कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने लिंगायत बांधव येणार आहेत; परंतु महामॅरेथॉनसाठी सकाळी सहा वाजल्यापासून मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे लिंगायत बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी मॅरेथॉन पुढे ढकलावी, अशी विनंती लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी ‘लोकमत’ व्यवस्थापनाकडे केली. त्या समाजाच्या भावनांची दखल घेऊन ‘लोकमत’ने महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.कोल्हापुरातील महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला होणार असल्याने खेळाडूंना अधिक चांगल्या सोयी व पोषक वातावरण उपलब्ध होईल. महामोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेता गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय धावपटूंच्या हिताचाच असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रातून व्यक्त होत आहे.‘लोकमत’ने जपलीसामाजिक बांधिलकी...‘लोकमत’ने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली असून समाजहितांच्या उपक्रमांना भरभरुन पाठिंबा दिला आहे. लिंगायत बांधवांच्या मोर्चाप्रती भावना लक्षात घेऊन ‘महामॅरेथॉन’चे आयोजन पुढे ढकलले. मोर्चात सहभागी होणाºया बांधवांचे हित जोपासल्याबद्दल ‘लोकमत’च्या पुढाकाराचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन