शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

लक्ष्मणची ५0 वर्षांतील सर्वोत्तम खेळी

By admin | Updated: January 4, 2016 23:55 IST

भारताचा संकटमोचक राहिलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणची आॅस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवली गेलेली २८१ धावांची खेळी ही गेल्या ५0 वर्षांच्या

मुंबई : भारताचा संकटमोचक राहिलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणची आॅस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवली गेलेली २८१ धावांची खेळी ही गेल्या ५0 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी म्हणून गणली गेली आहे.हैदराबादच्या या शैलीदार फलंदाजाने भारत पहिल्या डावात २७४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर ही खेळी केली होती. खेळाडू, समालोचक आणि पत्रकारांनी केलेल्या मतदानात लक्ष्मणची ही खेळी गेल्या ५0 वर्षांतील सर्वोत्तम खेळी असल्याचे स्पष्ट झाले. ईएसपीएनच्या डिजिटल पत्रिका क्रिकेट मंथलीच्या जानेवारी अंकात या मतगणनेच्या आधारावर ५0 वर्षांतील कामगिरींचा उल्लेख करण्यात आला आहे.लक्ष्मणने भारताच्या पहिल्या डावाच्या १७१ धावसंख्येत सर्वाधिक ५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या जादुई कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींनी मंत्रमुग्ध केले होते. त्याने राहुल द्रविड (१८0) याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ३७६ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली होती. आॅस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने या डावाचे स्मरण करताना म्हटले की, ‘मी पायाने झालेल्या निशाण्यावर गोलंदाजी करीत होतो आणि लक्ष्मण तो चेंडू कव्हर अथवा मिडविकेटवर खेळत होता. त्या वेळेस गोलंदाजी करणे कठीण होते.’रिकी पाँटिंग या खेळीविषयी म्हटला की, ‘त्याने लेगसाईडवर मारलेल्या फटक्याने आम्ही सर्व आश्चर्यचकित होतो. आम्ही त्याच्यासाठी जवळपास दोन दिवस गोलंदाजी केली आणि तोपर्यंत त्याला आम्ही बाद करू शकत नाही, असे वाटत होते.’(वृत्तसंस्था)बॉर्डर-गावसकर चषक कसोटी क्रमांक १५३५भारत दुसरा डाव : व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ६३१ मिनिट, ४५२ चेंडू, ४४ चौकार, २८१ धावा.या कसोटीत भारताचा पहिला डाव १७१ धावांत संपुष्टात आल्यानंतर आॅस्ट्रेलियाकडून फॉलोआॅन मिळाला होता. (आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या २४५ धावा झाल्या होत्या.) दुसऱ्या डावांत भारताने ७ बाद ६५७ धावा केल्या होत्या. राहुल द्रविडने या डावात १८० धावांची खेळी केली होती.