शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 22:17 IST

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले.

ठळक मुद्देपुरुषांमध्ये अक्षय भांगरे तर महिलांमध्ये प्रियंका भोपी सर्वोत्कृष्टमहिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले.पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले.

सांगली : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने  पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने पुण्याचा तर महिलांमध्ये ठाण्याने रत्नागिरीचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले. मुंबई उपनगरच्या अक्षय भांगरेने १:३०,१:३० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला, हर्षद हातणकरने २:०० मि. संरक्षण केले, ऋषीकेश मुर्चावडेने १:००  मि. संरक्षण करत पाच गडी बाद केले व दुर्वेश साळुंखे १:००  मि. संरक्षण करत चार  गडी बाद केले व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला. पुण्याच्या अक्षय गणपुलेने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, त्यांच्याच प्रतिक वाईकरने १:००, १:२० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, सुभाष लेंगरने १:१० मि. संरक्षण करत चार  गडी बाद करत  जोरदार लढत दिली मात्र अखेर ते अपयशी ठरले.

महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले. ठाण्याच्या प्रियंका भोपीने पहिल्या डावात नाबाद ४:१० मि. व दुसर्‍या डावात ४:०० मि. संरक्षण करत रत्नागिरीची हवाच काढून टाकली व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान सुध्दा पटकावला, रूपाली बडेने २:५०, २:५० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:००, १:४० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला व तेजश्री कोंडाळकरने तीन बळी मिळवत ठाण्याचे अजिंक्यपद पक्के केले. तर रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारने २:१० मि. संरक्षण करताना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, ऐश्वर्या सावंतने २:०० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, तन्वी कांबळेने १:३० मि. संरक्षण केले व जोरदार प्रतिकार केला मात्र त्या आपल्या संघाचा डावाने पराभव टाळू शकल्या नाहीत. 

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेthaneठाणे