शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 22:17 IST

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले.

ठळक मुद्देपुरुषांमध्ये अक्षय भांगरे तर महिलांमध्ये प्रियंका भोपी सर्वोत्कृष्टमहिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले.पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले.

सांगली : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने  पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने पुण्याचा तर महिलांमध्ये ठाण्याने रत्नागिरीचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले. मुंबई उपनगरच्या अक्षय भांगरेने १:३०,१:३० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला, हर्षद हातणकरने २:०० मि. संरक्षण केले, ऋषीकेश मुर्चावडेने १:००  मि. संरक्षण करत पाच गडी बाद केले व दुर्वेश साळुंखे १:००  मि. संरक्षण करत चार  गडी बाद केले व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला. पुण्याच्या अक्षय गणपुलेने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, त्यांच्याच प्रतिक वाईकरने १:००, १:२० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, सुभाष लेंगरने १:१० मि. संरक्षण करत चार  गडी बाद करत  जोरदार लढत दिली मात्र अखेर ते अपयशी ठरले.

महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले. ठाण्याच्या प्रियंका भोपीने पहिल्या डावात नाबाद ४:१० मि. व दुसर्‍या डावात ४:०० मि. संरक्षण करत रत्नागिरीची हवाच काढून टाकली व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान सुध्दा पटकावला, रूपाली बडेने २:५०, २:५० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:००, १:४० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला व तेजश्री कोंडाळकरने तीन बळी मिळवत ठाण्याचे अजिंक्यपद पक्के केले. तर रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारने २:१० मि. संरक्षण करताना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, ऐश्वर्या सावंतने २:०० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, तन्वी कांबळेने १:३० मि. संरक्षण केले व जोरदार प्रतिकार केला मात्र त्या आपल्या संघाचा डावाने पराभव टाळू शकल्या नाहीत. 

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेthaneठाणे