शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 22:17 IST

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले.

ठळक मुद्देपुरुषांमध्ये अक्षय भांगरे तर महिलांमध्ये प्रियंका भोपी सर्वोत्कृष्टमहिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले.पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले.

सांगली : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने  पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने पुण्याचा तर महिलांमध्ये ठाण्याने रत्नागिरीचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले. मुंबई उपनगरच्या अक्षय भांगरेने १:३०,१:३० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला, हर्षद हातणकरने २:०० मि. संरक्षण केले, ऋषीकेश मुर्चावडेने १:००  मि. संरक्षण करत पाच गडी बाद केले व दुर्वेश साळुंखे १:००  मि. संरक्षण करत चार  गडी बाद केले व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला. पुण्याच्या अक्षय गणपुलेने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, त्यांच्याच प्रतिक वाईकरने १:००, १:२० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, सुभाष लेंगरने १:१० मि. संरक्षण करत चार  गडी बाद करत  जोरदार लढत दिली मात्र अखेर ते अपयशी ठरले.

महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले. ठाण्याच्या प्रियंका भोपीने पहिल्या डावात नाबाद ४:१० मि. व दुसर्‍या डावात ४:०० मि. संरक्षण करत रत्नागिरीची हवाच काढून टाकली व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान सुध्दा पटकावला, रूपाली बडेने २:५०, २:५० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:००, १:४० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला व तेजश्री कोंडाळकरने तीन बळी मिळवत ठाण्याचे अजिंक्यपद पक्के केले. तर रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारने २:१० मि. संरक्षण करताना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, ऐश्वर्या सावंतने २:०० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, तन्वी कांबळेने १:३० मि. संरक्षण केले व जोरदार प्रतिकार केला मात्र त्या आपल्या संघाचा डावाने पराभव टाळू शकल्या नाहीत. 

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेthaneठाणे