शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

दबाव नसेल तर मजा येणार नाही, श्रीलंका दौऱ्यामध्ये नव्याने सुरुवात करेन - सूर्यकुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:40 IST

आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

कोलंबो : ‘दिग्गज राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा अनुभव शानदार ठरणार आहे. कायम शांत आणि एकाग्रतेने काम करणाऱ्या द्रविड यांच्याकडून श्रीलंका दौऱ्यात शिकण्यासाठी खूप उत्सुक असून, यावेळी नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेन,’ अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादव याने दिली.आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत आपली क्षमता सिद्ध केली होती. सध्या शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक म्हणून सूर्यकुमारचा समावेश आहे.मुंबईकर सूर्यकुमारने प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधताना म्हटले की, ‘मालिकेत दबाव असणारंच. कारण दबाव नसेल तर मजा येणार नाही. हे एक मोठे आव्हान असेल आणि यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका माझ्यासाठी पूर्णपणे वेगळे आव्हान होते. जेव्हापण तुम्ही मैदानात पाऊल ठेवता, तेव्हा तुम्ही वेगळा खेळ सादर करता. प्रत्येक वेळी नवी सुरुवात होत असते. लंका दौऱ्यातही मला नव्याने सुरुवात करायची आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका वेगळी होती आणि आता ही श्रीलंकेविरुद्धची मालिका वेगळी आहे. मात्र आव्हान तसेच आहे. त्यामुळे मला कामगिरीत सातत्य राखायचे आहे.’द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याबाबत सूर्यकुमार म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडूसाठी ही शानदार संधी आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रवास करणे मोठे आव्हान आहे. मात्र, दौऱ्याची सर्वात चांगली बाब म्हणजे राहुलसर जवळपास राहणार आहेत. मी त्यांच्याविषयी खूप ऐकले आहे. त्यांच्यासोबत हा माझा पहिलाच दौरा आहे. मी अनेक खेळाडूंकडून ऐकले आहे की, ते प्रशिक्षक म्हणून अत्यंत शांत आणि एकाग्र आहेत.’

गोलंदाजीचा निर्णय हार्दिकच घेईल गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने सराव सामन्यात आणि नेट्समध्ये गोलंदाजी केली. याविषयी सूर्यकुमार म्हणाला की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकने गोलंदाजी केली. आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती. यानंतर इंट्रा-स्क्वाड (सराव सामना) लढतीत आणि सराव सत्रामध्येही त्याने गोलंदाजी केली. सामन्यातील गोलंदाजीचा निर्णय त्याच्यावर आणि संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. पण तो गोलंदाजी करतोय, हे मात्र नक्की. ही खूप चांगली बाब आहे.’ 

टॅग्स :Indian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघIndiaभारतSri Lankaश्रीलंका