शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने ऑलिम्पिक संघटनेची भारतावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 10:36 AM

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे ऑलिम्पिक चार्टरचा भंग झाल्याने आयओसीने भारतावर कारवाई केली आहे.

 पुणे - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तान विरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विविध स्तरांवर पाकिस्तानचा निषेध होत असताना नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारताला 14 कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत भारतावर बंदी घातली आहे. आयओसीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत झालेल्या चर्चेनंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याविरोधात नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली होती. आयओसीकडून यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ''भारतीय एनओसी, आयओसी आणि आयएसएसएफने अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र तरीही पाकिस्तान संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही मार्ग निघू शकला नाही. ही परिस्थिती कुठल्याही प्रकराचा भेदभाव न करण्याच्या आयओसीच्या मूळ चार्टरच्या विरोधात जाणारी आहे. कुठल्याही स्पर्धेच्या यजमान देशात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना  निपक्षपातीपणे आणि समानतेच्या वातावरणात खेळण्याची संधी मिळावी यासाठी, आयओए कटिबद्ध आहे."असे या पत्रकात म्हटले आहे.  

''आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारतात यापुढे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला स्थगिती देत आहे. जोपर्यंत भारत सरकारकडून ऑलिम्पिक चार्टरचे पालन होण्याबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील,'' असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.   

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान