शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरे

By admin | Updated: October 6, 2016 04:57 IST

रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.

नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरेनवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या खराब कामगिरीसाठी समितीने प्रशिक्षक व संघटना या दोघांनाही जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर यात आमूलाग्र बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.समितीने गगन नारंग, हीना सिद्धू यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबरोबर आयोनिका पालसारख्या नवोदित खेळाडूवरही ताशेरे ओढले आहेत. हीनाने आपला पती रोनक पंडित यांनाच प्रशिक्षक बनविल्याबद्दल टीका झाली होती. हीनाने राष्ट्रीय प्रशिक्षक पावेल स्मिरनोव्ह यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोनिकाने आपल्या आर्थिक फायद्यासाठी थॉमस फारनिक यांना प्रशिक्षक, तर सुमा शिरूर यांना मार्गदर्शकपदी दाखविले. मात्र, सुमाच तिची पूर्णवेळ प्रशिक्षक होती.रिओमध्ये भारताचे १२ नेमबाज सहभागी झाले होते. मात्र, या प्रकारात भारताला एकही पदक मिळविता आले नाही. अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल गटात चौथ्या क्रमांकावर राहिला. ही भारतीयांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. यामुळे नेमबाजीतील कामगिरीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. समितीने नेमबाजीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.समितीने जीतू राय प्रशिक्षक स्मिरनोव्ह यांच्याबरोबर सूर जुळवू शकला नाही, तर प्रकाश नंजप्पा याच्यासाठी स्मिरनोव्ह यांच्याकडे कोणतीही विशेष योजना नसल्याचे स्पष्ट झाले. समितीने गगन नारंग याच्यावरही कडक ताशेरे ओढले आहेत. नारंग स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीसह उतरला होता. तसेच त्याने त्याच्यासाठी बनविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाकडे साफ दुर्लक्ष केले होेते. अपूर्वी चंदेला याला प्रशिक्षकासाठी झगडावे लागले, हे सर्वांत चकीत करणारे असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. नेमबाज बिंद्रा याला नशिबाने साथ दिली नसल्याचे मत व्यक्त करून त्याच्या कारकिर्दीचा शेवट परीकथेसारखा झाला नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)रिओची तयारीच चुकीच्या दिशेने होतीचारसदस्यीय समितीने आपल्या ३६ पानांच्या अहवालात कामगिरीचे कडक समीक्षा करण्यात आली आहे. समितीत म्हटले आहे, की २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकनंतर नेमबाजीतील कामगिरीमुळे सर्वांनाच आत्ममग्न केले होते. सर्वांना वाटले, की या खेळात आता आपोआप प्रगती होईल. त्यामुळे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचेच सर्व जण विसरून गेले. समितीने म्हटले आहे, की रिओ आॅलिम्पिकसाठीची तयारीच चुकीच्या दिशेने होती. भारतीय नेमबाजांना गेल्या काही वर्षांत मिळालेले यश म्हणजे फक्त नशिबाची साथ होती.