शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

भारताचा यूएईवर दणदणीत विजय

By admin | Updated: March 3, 2016 21:45 IST

भारताने नऊ गडी आणि ५९ चेंडू राखून संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजयाची नोंद केली. यूएईचे ८२ धावांचे माफक लक्ष्य भारताने आरामात पार केले.

ऑनलाइन लोकमत

मिरपूर, दि. ३ - सलामीवर रोहित शर्माची २८ चेंडूतील ३९ धावांची खेळी आणि त्यानंतर युवराज सिंगने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर भारताने नऊ गडी आणि ५९ चेंडू राखून संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजयाची नोंद केली. यूएईचे ८२ धावांचे माफक लक्ष्य भारताने आरामात पार केले.
भारताने आशिया कप टी-२० स्पर्धेची आधीच अंतिम फेरी गाठल्याने आजचा सामना फक्त औपचारीकता होता. मात्र या सामन्यातही भारताने प्रतिस्पर्ध्यांना कुठलीही दयामाया दाखवली नाही. भारताने स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी आहे. 
संयुक्त अरब अमिरातीच्या ८२ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली मात्र रोहित शर्माच्या रुपाने भारताला ४३ धावांवर पहिला धक्का बसला. 
रोहित ३९ धावांवर बाद झाला. कादीर अहमदने मोहम्मद नावीदकरवी त्याला झेलबाद केले. आता डावखुरा युवराज सिंग आणि सलामीवर शिखर धवनची जोडी मैदानावर असून, भारताची वेगाने लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भारताच्या आठ षटकात ६२ धावा झाल्या असून, विजयासाठी फक्त २० धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करणा-या संयुक्त अरब अमिरातीने निर्धारीत वीस षटकात ९ बाद ८१ धावा करुन भारताला विजयासाठी माफक ८२ धावांचे लक्ष्य दिले आहे. शाईमन अन्वरचा ४३ धावांचा अपवाद वगळता यूएईचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर तग धरु शकला नाही. 
यूएईकडून सलामीवीर रोहन मुस्तफा आणि शाईमन अन्वरमध्ये तिस-या विकेटसाठी झालेली २३ धावांची भागीदारी सर्वाधिक ठरली. अन्वर खालोखाल मुस्तफाने सर्वाधिक ११ धावा केल्या. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर यूएईचा संघ ढेपाळला. 
यूएईच्या सात षटकात दोन बाद २५ धावा झाल्या होत्या. अवघ्या एका धावेवर सलामीवीर एसपी पाटील बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
पाठोपाठ मोहम्मद शहजाद भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्याला बुमराहने रैनाकरवी झेलबाद केले. रोहन मुस्तफा ११ आणि शाईमन अन्वर ७ धावांवर खेळत आहेत. 
भारत आणि दुबळया संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया कप टी-२० स्पर्धेतील आजचा शेवटचा साखळी सामना होत आहे. यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने आधीच अंतिम फेरी गाठली आहे आणि यूएईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 
त्यामुळे हा सामना फक्त औपचारीकता आहे. बांगलादेश विरुद्ध अंतिम फेरीचा सामना खेळण्याआधी या सामन्यात भारताने संघात काही बदल केले आहेत. 
मागच्या काही सामन्यांपासून राखीव खेळाडूंमध्ये बसलेल्या पवन नेगी, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश केला आहे. या सामन्याव्दारे पवन नेगी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदापर्ण करत आहे. 
 
युएईविरुद्धचा भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, पवन नेगी, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.