शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

By admin | Updated: February 7, 2016 03:17 IST

भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) पहिल्या दिवशी चमकदार कामगिरी करताना कुस्ती, जलतरण आणि भारोत्तोलन या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवताना सुवर्णपदकांचा

गुवाहाटी : भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) पहिल्या दिवशी चमकदार कामगिरी करताना कुस्ती, जलतरण आणि भारोत्तोलन या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवताना सुवर्णपदकांचा जवजवळ ‘क्लीन स्वीप’ केला. भारताने पहिल्या दिवशी १४ सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह एकूण १९ पदके पटकावली. पदक तालिकेत भारत अव्वल स्थानी आहे. श्रीलंकेने एकूण २१ पदकांची कमाई केली. दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेने चार सुवर्णपदक पटकावले. भारतीय मल्लांनी चार सुवर्ण पटकावले तर जलतरणपटूंनी चार सुवर्ण व तीन रौप्य पदकांची कमाई केली. सकाळच्या सत्रात सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई केली होती. सायकलिंगमध्ये सुसाटभारताने शनिवारी सॅग स्पर्धेच्या सायकलिंगमध्ये दोन्ही सुवर्णपदके आणि दोन रौप्यपदके आपल्या नावावर केली. महिलांच्या ३0 कि.मी. व्यक्तिगत टाईम ट्रायलमध्ये तोरांगम विद्यालक्ष्मीने ४९ मिनिटे २४.५७३ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. मणिपूरची इलांगबाम चाओबादेवी दुसऱ्या स्थानावर राहिली. पाकिस्तानची साहिबा बीबीने कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ४0 किलोमीटर व्यक्तिगत टाईम ट्रायलमध्ये अरविंद पवार याने ५२ मिनिटे २८.८00 सेकंदांचा वेळ नोंदवून सुवर्णपदकावर कब्जा केला. मनजितसिंगला रौप्यपदक मिळाले. श्रीलंकेच्या जनाका हेमंता कुमारा याला कांस्यपदक मिळाले.तिरंदाजी :चार सुवर्ण, चार रौप्यपदके निश्चितयेथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत व्यक्तिगत रिकर्व आणि कम्पाउंड प्रकारात भारतीय खेळाडूंनी चार सुवर्ण आणि चार रौप्यपदके निश्चित केली.‘सॅग’चा गत चॅम्पियन तरुणदीप रॉय आणि गुरुचरण बेसरा यांनी सकाळच्या सत्रात जागतिक अव्वल दर्जाची तिरंदाज दीपिकाकुमारी आणि बोम्बाल्यादेवी लॅशराम यांच्यासोबत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात रिकर्वच्या फायनलमध्ये स्थान मिळविले. दुपारच्या सत्रात अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी कम्पाउंड प्रकारात पुरुष गटात, तर पूर्वाशा शेंडे आणि ज्योती सुरेखा यांनी महिला गटातून अंतिम फेरी गाठली.व्यक्तिगत कम्पाउंड आणि रिकर्व फायनलमध्ये भारतीय खेळाडूंमध्येच स्पर्धा होणार असल्याने भारताची चार सुवर्ण आणि चार रौप्यपदके निश्चित झाली आहेत. ८ व ९ फेब्रुवारीला अंतिम फेरी होईल. त्यानतंर पदकांची संख्या निश्चित होईल.जलतरण : एकूण सात पदके, नोंदवले तीन स्पर्धा विक्रमभारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत जलतरणामध्ये पहिल्या दिवशी श्रीलंकेचे कडवे आव्हान मोडून काढताना तीन नव्या विक्रमासह चार सुवर्ण व तीन रौप्य पदकांची कमाई केली.संदीप सेजवाल (२०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) आणि शिवानी कटारिया (महिला २०० मीटर फ्रीस्टाईल) यांच्या व्यतिरिक्त महिला १०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघाने नवा स्पर्धा विक्रम नोंदवला. दामिनी गौडाने महिलांच्या १०० मीटर बटरफ्लायमध्ये भारताला दिवसातील चौथे सुवर्णपदक पटाकवून दिले.