शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

अखेरच्या चेंडूवर भारताचा पराभव, केदार जाधवची एकाकी झुंज

By admin | Published: January 22, 2017 9:42 PM

मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला ईडन गार्डन्सवर रंगलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने 5 धावांनी पराभव केला आहे

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 22 - मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाचा ईडन गार्डनवर रंगलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने 5 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केदारने 90 धांवांची झुंजार खेळी केली, मात्र शेवटच्या षटकात 3 चेंडूवर सहा धावांची आवशकता असताना मोठा फटका मारण्याच्या नादात केदार बाद झाला आणि भारतावर पराभवचे संकट ओढावले. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1ने पराभव केला. 
 
नाणेफेक जिंकून विराटने इंग्लड संघाला प्रथम फंलदाजीसाठी आंमत्रीत केलं होत. पहिल्या दोन सामन्यांनंतर कोलकाता वनडेत देखील तीनशेहून अधिक धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लड संघाने जेसन रॉय(65), बेअरस्टो (56 ), स्टोक्स नाबाद 57 आणि कर्णधार मॉर्गन (43) यांच्या फलंदाजीच्या बळावर 50 षटकात आठ बाद 321 धावा करत भारताला विजयासाठी 322 धावांचे आव्हान दिले होते.
 
इंग्लंडने दिलेले 322 धावांचे आव्हान पार करताना केदार जाधव(90) कर्णधार विराट कोहली (55), हार्दिक पांड्या (55) आणि युवराज सिंग(45) यांचे प्रयत्न विजयासाठी अपुरे पडले. 
 
त्यापुर्वी, प्रथम  करताना इंग्लंडच्या समामीवीरांनी सावध सुरुवात करताना पहिल्या 10 षटकात नाबाद 43 धावांची भागीदारी केली होती. 10 षटकानंतर जेसन रॉय आणि सॅंम बिलिंग्ज तडफदार फटक्यांनी धावा वसूल करण्यास सुरूवात केली. सलामीजोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजाने जेनिंग्जला बाद केले. त्यानंतर दुसरी विकेट देखील जडेजानेच घेतली. घातक जेसन रॉय(65) याचा जडेजाने त्रिफळा उडवून तंबूत धाडले. त्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि बेअरस्टो यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरला. पण पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मॉर्गन 43 धावांवर झेलबाद झाला. बेअरस्टोने अर्धशतक ठोकले खरे पण तो देखील 56 धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. जोस बटलरला (11) देखील पंड्याने माघारी धाडले. तर बुमराहने मोईन अली याला बाऊन्सवर झेलबाद करून बाद केले. अखेरच्या षटकात वोक्स 19 चेंडूत 34 धावा काडून धावबाद झाला. तर स्टोक्सने नाबाद 57 धावांची खेळी केली. 
 
भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्या अचूक माऱ्यासमोर वेगाने धावा जमवता न आल्याने पहिल्या दहा षटकात इंग्लंडला बिनबाद 43 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 3, जडेजाने 2 तर बुमराहने एका फलंदाजाला बाद केले.