शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 15:25 IST

भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे.

बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मुळे खेळमय वातावरण झाले आहे. भारतीय खेळाडूंनी शनिवारी विक्रमी कामगिरी करून एकाच दिवसात १४ पदकं जिंकली आहेत. आज स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कांस्य पदकासाठी लढत पार पडली. भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian Hockey Team) उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. भारतीय महिलांनी शूट आऊट सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विक्रमी कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. शूट-आऊट सामन्यात भारताची गोलरक्षक सविताने तीन गोल वाचवले आणि तब्बल १६ वर्षांनंतर भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक मिळवून दिले. 

भारताला पेनल्टी पडली महागातखरं तर सामन्यात सुरूवातीला भारतीय संघाचे एकतर्फी वर्चस्व राहिले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. सामना सुरू झाल्याच्या ८ मिनिटांनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा धारण करून चेंडू सतत फिरवत ठेवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या सलीमा तेटे हिने गोल केल्याने भारताने १-० अशी आघाडी घेतली. दुसरा क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने सावध खेळी केली आणि पहिल्या हाफपर्यंत १-० अशी आघाडी कायम ठेवली. तिसरा क्लार्टर संपायला ६ मिनिटांहून कमी कालावधी असताना सलिमाला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. क्वार्टर तीनच्या अखेरपर्यंत भारताने न्यूझीलंडविरुद्ध १-० अशी आघाडी कायम ठेवली. मात्र क्वार्टर ४ मध्ये न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याचाच फायदा घेत न्यूझीलंडने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. गोंधळलेल्या नवनीतने चेंडू पायाने मारला म्हणून ही पेनल्टी देण्यात आली होती. सामना बरोबरीत संपल्याने शूट-आऊट सामना खेळवावा लागला. 

ऑस्ट्रेलियाने शूट आऊट सामन्यामध्येच भारतीय संघाचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारत आणि न्यूझीलंडचा संघ याआधी ३४ वेळा आमनेसामने आला होता, ज्यामधील २३ सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता तर भारताने १० सामने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.  

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड भारत ०-३ न्यूझीलंड, १९९८ कांस्यपदक सामनाभारत १-३ न्यूझीलंड, २००२ ग्रुप स्टेजभारत २-१ न्यूझीलंड, २००२ उपांत्य फेरीभारत १-० न्यूझीलंड, २००६ उपांत्य फेरीभारत ०-३ न्यूझीलंड, २०१४ ग्रुप स्टेज

शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवला होता विजय ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील उपांत्येफेरीचा सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वाघिणींना पराभव पत्करावा लागला होता. यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली होती. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती.

सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पर्धेतील चारपैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये वादग्रस्त पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ पिछाडीवर होता मात्र वंदना कटारियाने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली होती. मात्र त्यानंतर शूट-आऊट सामन्यात भारताच्या खात्यात कांस्य पदक आले आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -सविता पुनिया (कर्णधार), दिप ग्रेस एक्का, गुरजित कौर, उदिता, सुशिला चानू पुक्रंबम, ज्योती, सालिमा तेटे, शर्मिला देवी, नेहा, नवनीत कौर, वंदना कटारिया. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाHockeyहॉकीIndiaभारतNew Zealandन्यूझीलंड