शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 15:25 IST

भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे.

बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मुळे खेळमय वातावरण झाले आहे. भारतीय खेळाडूंनी शनिवारी विक्रमी कामगिरी करून एकाच दिवसात १४ पदकं जिंकली आहेत. आज स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कांस्य पदकासाठी लढत पार पडली. भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian Hockey Team) उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. भारतीय महिलांनी शूट आऊट सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विक्रमी कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. शूट-आऊट सामन्यात भारताची गोलरक्षक सविताने तीन गोल वाचवले आणि तब्बल १६ वर्षांनंतर भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक मिळवून दिले. 

भारताला पेनल्टी पडली महागातखरं तर सामन्यात सुरूवातीला भारतीय संघाचे एकतर्फी वर्चस्व राहिले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. सामना सुरू झाल्याच्या ८ मिनिटांनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा धारण करून चेंडू सतत फिरवत ठेवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या सलीमा तेटे हिने गोल केल्याने भारताने १-० अशी आघाडी घेतली. दुसरा क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने सावध खेळी केली आणि पहिल्या हाफपर्यंत १-० अशी आघाडी कायम ठेवली. तिसरा क्लार्टर संपायला ६ मिनिटांहून कमी कालावधी असताना सलिमाला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. क्वार्टर तीनच्या अखेरपर्यंत भारताने न्यूझीलंडविरुद्ध १-० अशी आघाडी कायम ठेवली. मात्र क्वार्टर ४ मध्ये न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याचाच फायदा घेत न्यूझीलंडने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. गोंधळलेल्या नवनीतने चेंडू पायाने मारला म्हणून ही पेनल्टी देण्यात आली होती. सामना बरोबरीत संपल्याने शूट-आऊट सामना खेळवावा लागला. 

ऑस्ट्रेलियाने शूट आऊट सामन्यामध्येच भारतीय संघाचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारत आणि न्यूझीलंडचा संघ याआधी ३४ वेळा आमनेसामने आला होता, ज्यामधील २३ सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता तर भारताने १० सामने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.  

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड भारत ०-३ न्यूझीलंड, १९९८ कांस्यपदक सामनाभारत १-३ न्यूझीलंड, २००२ ग्रुप स्टेजभारत २-१ न्यूझीलंड, २००२ उपांत्य फेरीभारत १-० न्यूझीलंड, २००६ उपांत्य फेरीभारत ०-३ न्यूझीलंड, २०१४ ग्रुप स्टेज

शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवला होता विजय ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील उपांत्येफेरीचा सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वाघिणींना पराभव पत्करावा लागला होता. यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली होती. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती.

सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पर्धेतील चारपैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये वादग्रस्त पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ पिछाडीवर होता मात्र वंदना कटारियाने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली होती. मात्र त्यानंतर शूट-आऊट सामन्यात भारताच्या खात्यात कांस्य पदक आले आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -सविता पुनिया (कर्णधार), दिप ग्रेस एक्का, गुरजित कौर, उदिता, सुशिला चानू पुक्रंबम, ज्योती, सालिमा तेटे, शर्मिला देवी, नेहा, नवनीत कौर, वंदना कटारिया. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाHockeyहॉकीIndiaभारतNew Zealandन्यूझीलंड