शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

भारताने पाकला लोळवले

By admin | Updated: February 28, 2016 01:11 IST

भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी

मीरपूर : भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी प्रख्यात असलेल्या विराट कोहलीच्या ४९ धावांमुळे भारताने विजयी जल्लोष केला, तर पाकमध्ये पराभवाची शोककळा पसरली. भारतीय संघाचा स्पर्धेतील हा दुसरा विजय असून, गुणतालिकेत ते ४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत.पंड्याच्या नेतृत्वात गोलंदाजांनी पाकिस्तानचा १७.३ षटकांत ८३ धावांत खुर्दा उडविल्यानंतर लहान धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताचीही सुरुवातीला दमछाक झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमेर याने पहिल्या दोन षटकांत तीन गडी बाद करीत सनसनाटी निर्माण केली होती. भारताने तीन गडी अवघ्या आठ धावांत गमविल्यानंतर कठीण स्थितीत विराटने युवराजसिंगसोबत खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. चौथ्या गड्यासाठी या दोघांनी ११.३ षटकांत ६८ धावांची भागीदारी करीत पाकच्या तोंडचे पाणी पळविले. विराट अर्धशतकापासून एका धावेने वंचित राहिला, पण तोवर भारताने विजयी पथावर मार्गक्रमण केले होते. विराट बाद होताच दुसऱ्याच चेंडूवर हार्दिक पंड्यादेखील खाते न उघडताच बाद झाल्याने पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली. पण लक्ष्य लहान असल्याने भारताने १५.३ षटकांत ५ बाद ८५ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटने दोन वर्षांपृूर्वी विश्वचषकात बांगलादेशात पाकविरुद्ध ३६ धावांची खेळी केली होती. त्या वेळी भारत ७ गड्यांनी जिंकला. आजही त्याने जिगरबाज खेळी केली. युवराज सुरुवातीला अडखळला; पण विराटच्या सोबतीने तो खेळपट्टीवर उभा होता. युवराजने दोन चौकारांसह ३२ चेंडूंत नाबाद १४ धावांचे योगदान दिले. कर्णधार धोनीने विजयी चौकारासह सात धावा केल्या. आमेरची चार षटके संपताच भारतावरील दडपण नाहीसे झाले. त्याने पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना भोपळा न फोडू देताच पायचीत केले. त्यानंतर सुरेश रैनाला (१) वहाब रियाझकडे झेल देण्यास भाग पाडले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर मैदानावर आलेल्या आमेरने पाकच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या; पण विराटच्या पराक्रमी फलंदाजीने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. धोनीने युवराजसोबत भारताचा विजय प्रशस्त केला. धोनीने चौकार मारताच २७ चेंडू आधीच सामना संपला. (वृत्तसंस्था)१२८ पाकिस्तानची भारताविरुद्धची टी-२० मधील नीचांकी धावसंख्या. २०१२ सप्टेंबरमध्ये कोलंबो येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव १२८ धावांत संपुष्टात आला. या सामन्यात कोहलीने नाबाद ७८ धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना १७व्या षटकांतच जिंकला. ८२ एप्रिल २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तान संघाची ८२ ही नीचांकी धावसंख्या होती. ७४ सप्टेंबर २०१२ मध्ये आॅस्ट्रेलिया दुबई येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव ७४ धावांत संपुष्टात आला.धावफलकपाकिस्तान : मोहम्मद हफिज झे. धोनी गो. नेहरा ४, शरजील खान झे. रहाणे गो. बुमराह ७, मंझृूर धावबाद(कोहली) १०, शोएब मलिक झे. धोनी गो. पंड्या ४, उमर अकमल पायचित गो. युवराजसिंग ३, सर्शराज अहमद त्रि. गो. जडेजा २५, शाहीद आफ्रिदी धावबाद(जडेजा/धोनी) २, वहाब रियाझ पायचित गो. जडेजा ४, मोहम्मद सामी झे. रैना गो. पंड्या ८, मोहम्मद आमेर त्रि. गो. पंड्या १, मोहम्मद इरफान नाबाद ००, अवांतर १५, एकूण: १७.३ षटकांत सर्वबाद ८३ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ३-०-२०-१, बुमराह ३-२-८-१, हार्दिक पंड्या ३.३-०-८-३, युवराजसिंग २-०-११-१, रवींद्र जडेजा ३-०-११-२, रवीचंद्रन अश्विन ३-०-२१-०भारत : रोहित शर्मा पायचीत गो. मोहम्मद आमेर ००, अजिंक्य रहाणे पायचीत गो. आमेर ००, विराट कोहली पायचीत गो. मोहम्मद सामी ४९, सुरेश रैना झे. वहाब रियाझ गो. मो. आमेर १, युवराजसिंग नाबाद १४, हार्दिक पंड्या झे. हफिज गो. मोहम्मद सामी ००, धोनी नाबाद ७, अवांतर :१४, एकूण: १५.३ षटकांत ५ बाद ८५; गोलंदाजी : मो. आमेर ४-०-१८-३, मो. सामी ४-०-१६-२, मोहम्मद इरफान ४-०-१६-०, वहाब रियाझ ३.३-०-३१-०.