शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

भारताने पाकला लोळवले

By admin | Updated: February 28, 2016 01:11 IST

भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी

मीरपूर : भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी प्रख्यात असलेल्या विराट कोहलीच्या ४९ धावांमुळे भारताने विजयी जल्लोष केला, तर पाकमध्ये पराभवाची शोककळा पसरली. भारतीय संघाचा स्पर्धेतील हा दुसरा विजय असून, गुणतालिकेत ते ४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत.पंड्याच्या नेतृत्वात गोलंदाजांनी पाकिस्तानचा १७.३ षटकांत ८३ धावांत खुर्दा उडविल्यानंतर लहान धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताचीही सुरुवातीला दमछाक झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमेर याने पहिल्या दोन षटकांत तीन गडी बाद करीत सनसनाटी निर्माण केली होती. भारताने तीन गडी अवघ्या आठ धावांत गमविल्यानंतर कठीण स्थितीत विराटने युवराजसिंगसोबत खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. चौथ्या गड्यासाठी या दोघांनी ११.३ षटकांत ६८ धावांची भागीदारी करीत पाकच्या तोंडचे पाणी पळविले. विराट अर्धशतकापासून एका धावेने वंचित राहिला, पण तोवर भारताने विजयी पथावर मार्गक्रमण केले होते. विराट बाद होताच दुसऱ्याच चेंडूवर हार्दिक पंड्यादेखील खाते न उघडताच बाद झाल्याने पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली. पण लक्ष्य लहान असल्याने भारताने १५.३ षटकांत ५ बाद ८५ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटने दोन वर्षांपृूर्वी विश्वचषकात बांगलादेशात पाकविरुद्ध ३६ धावांची खेळी केली होती. त्या वेळी भारत ७ गड्यांनी जिंकला. आजही त्याने जिगरबाज खेळी केली. युवराज सुरुवातीला अडखळला; पण विराटच्या सोबतीने तो खेळपट्टीवर उभा होता. युवराजने दोन चौकारांसह ३२ चेंडूंत नाबाद १४ धावांचे योगदान दिले. कर्णधार धोनीने विजयी चौकारासह सात धावा केल्या. आमेरची चार षटके संपताच भारतावरील दडपण नाहीसे झाले. त्याने पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना भोपळा न फोडू देताच पायचीत केले. त्यानंतर सुरेश रैनाला (१) वहाब रियाझकडे झेल देण्यास भाग पाडले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर मैदानावर आलेल्या आमेरने पाकच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या; पण विराटच्या पराक्रमी फलंदाजीने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. धोनीने युवराजसोबत भारताचा विजय प्रशस्त केला. धोनीने चौकार मारताच २७ चेंडू आधीच सामना संपला. (वृत्तसंस्था)१२८ पाकिस्तानची भारताविरुद्धची टी-२० मधील नीचांकी धावसंख्या. २०१२ सप्टेंबरमध्ये कोलंबो येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव १२८ धावांत संपुष्टात आला. या सामन्यात कोहलीने नाबाद ७८ धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना १७व्या षटकांतच जिंकला. ८२ एप्रिल २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तान संघाची ८२ ही नीचांकी धावसंख्या होती. ७४ सप्टेंबर २०१२ मध्ये आॅस्ट्रेलिया दुबई येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव ७४ धावांत संपुष्टात आला.धावफलकपाकिस्तान : मोहम्मद हफिज झे. धोनी गो. नेहरा ४, शरजील खान झे. रहाणे गो. बुमराह ७, मंझृूर धावबाद(कोहली) १०, शोएब मलिक झे. धोनी गो. पंड्या ४, उमर अकमल पायचित गो. युवराजसिंग ३, सर्शराज अहमद त्रि. गो. जडेजा २५, शाहीद आफ्रिदी धावबाद(जडेजा/धोनी) २, वहाब रियाझ पायचित गो. जडेजा ४, मोहम्मद सामी झे. रैना गो. पंड्या ८, मोहम्मद आमेर त्रि. गो. पंड्या १, मोहम्मद इरफान नाबाद ००, अवांतर १५, एकूण: १७.३ षटकांत सर्वबाद ८३ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ३-०-२०-१, बुमराह ३-२-८-१, हार्दिक पंड्या ३.३-०-८-३, युवराजसिंग २-०-११-१, रवींद्र जडेजा ३-०-११-२, रवीचंद्रन अश्विन ३-०-२१-०भारत : रोहित शर्मा पायचीत गो. मोहम्मद आमेर ००, अजिंक्य रहाणे पायचीत गो. आमेर ००, विराट कोहली पायचीत गो. मोहम्मद सामी ४९, सुरेश रैना झे. वहाब रियाझ गो. मो. आमेर १, युवराजसिंग नाबाद १४, हार्दिक पंड्या झे. हफिज गो. मोहम्मद सामी ००, धोनी नाबाद ७, अवांतर :१४, एकूण: १५.३ षटकांत ५ बाद ८५; गोलंदाजी : मो. आमेर ४-०-१८-३, मो. सामी ४-०-१६-२, मोहम्मद इरफान ४-०-१६-०, वहाब रियाझ ३.३-०-३१-०.