शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

भारताने बलाढ्य कतारला रोखले बरोबरीत; फिफा विश्वचषकाच्या आशा अजूनही जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 06:38 IST

गोलरक्षक गुरप्रीत सिंगचा भक्कम बचाव निर्णायक

दोहा : फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत सलामीला ओमानकडून १-२ ने धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारताने मंगळवारी बलाढ्य कतारचे आव्हान गोलशून्य बरोबरीत परतवले. जागतिक क्रमवारीत ६२ व्या क्रमांकावर असलेला आशियाई विजेता कतार तुलनेत कमजोर असलेल्या भारताला मात देईल, अशी शंका व्यक्त केली जात होता. सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानवर ६-० असा विजय मिळवल्यामुळे भारताविरुद्धही कतारचेच पारडे जड मानले जात होते. तथापि १०३ व्या क्रमांकावरील भारताने त्यांचे आव्हान दमदार खेळी करून परतवून लावले.

आक्रमक खेळ करणाऱ्या यजमान संघाला भारताने एकदाही गोल करू दिला नाही. यामुळे भारताच्या विश्वचषकाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने उपस्थित प्रेक्षकांचे हात वर करून आणि टाळ्या वाजवून अभिवादन केले. त्यावेळी भारतीय संघासाठी स्टेडियममध्ये टाळ्यांचा पाऊस पडला. स्टार सुनील छेत्रीच्या अनुपस्थित भारताचे नेतृत्त्व करणाºया गोलरक्षक गुरप्रीत सिंगचे भक्कम संरक्षण या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. गुरप्रीतने जबरदस्त संरक्षण करताना कतारचे आक्रमण अनेकदा रोखून त्यांना गोल करण्यापासून दूर ठेवले.

या आधी चारपैकी तीन अधिकृत लढती कतारने जिंकल्या होत्या, तर एक लढत बरोबरीत सुटली होती. या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत कतारने भारताचा ६-० असा धुव्वा उडवला होता. २०२२ मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाºया कतारने गेल्या काही वर्षांत आपल्या खेळात कमालीची सुधारणा घडवून आणली. यावर्षी संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या आशियाई चषकाचे विजेतेपद त्यांनी पटकावले.

निमंत्रित म्हणून खेळणाºया कतारने कोपा अमेरिका स्पर्धेत दक्षिण आशियाई संघांनाही कडवी झुंज दिली होती. त्यामुळे भारताचा त्यांच्यापुढे निभाव लागेल की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात साशंकता होती. पण भारतानेही गेल्या काही दिवसात आपली कामगिरी उंचावली असून आशियाई स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात आणि बहारिनसारख्या संघांना चांगली लढत दिली. बाद फेरी मात्र थोडक्यात हुकली होती. एक गुण मिळाल्याचा आनंद - प्रशिक्षक स्टिमकआशियाई चॅम्पियन कतारला रोखून एका गुणाची कमाई केल्याचा आनंद असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी व्यक्त केले. मात्र पुढील सामन्यात अतिआत्मविश्वासात न राहण्याचा खेळाडूंना सल्लाही दिला. स्टिमक म्हणाले, ‘आम्ही फार पुढचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून वेळ घालवू इच्छित नाही. काही दिवसांआधी ओमानकडून पराभूत झालो. यानंतर कतारविरुद्ध वरचढ खेळ करत एक गुण मिळू शकलो.’ भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे बोट दाखविणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘आमचा संघ तंदुरुस्त आहे, हे खेळाद्वारे दाखवून दिले.’ भारताला आता १५ आॅक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे सामना खेळायचा आहे.‘फुटबॉलमध्ये काहीही घडू शकते!’‘मला माझ्या संघाच्या कामगिरीवर फारच गर्व वाटतो. सांघिक प्रयत्नात आम्हाला यश आले. अन्य सामन्यांमध्ये या खेळाचा लाभ होईल. आम्ही आतापर्यंत दोनच सामने खेळले आणि दोन्हीवेळा बलाढ्य संघांना सामोरे गेलो. यामुळे आत्मविश्वासात भर पडली असून, फुटबॉलमध्ये काहीही शक्य असल्याचा अनुभव आला. सर्व सहकाºयांनी शंभर टक्के योगदान दिल्यामुळे समाधानाने ड्रेसिंग रुममध्ये परत आलो,’ असे भारताचा हंगामी कर्णधार गुरप्रीत सिंग याने सांगितले.

टॅग्स :Footballफुटबॉल