शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

भारताची हाराकिरी, इंग्लंडचा २६६ धावांनी विजय

By admin | Updated: July 31, 2014 17:45 IST

कसोटीच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर मिळवलेली पकड अजिबात ढिली न सोडता भारताला तिस-या कसोटीत २६६ धावांनी धूळ चारली.

ऑनलाइन टीम
साऊदम्प्टन, दि. ३१ - कसोटीच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर मिळवलेली पकड अजिबात ढिली न सोडता भारताला तिस-या कसोटीत २६६ धावांनी धूळ चारली. इंग्लंडच्या ४४५ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या १७८ धावांमध्ये संपुष्टात आला आणि इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १ -१ अशी बरोबरी केली. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावाप्रमाणेच दुस-या डावातही चांगला खेळ करत (५२) भारताचा  डाव सावरायचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने भारताचा डाव गडगडला. इंग्लंडतर्फे मोईन अलीने तब्बल ६ बळी टिपले तर अँडरसनने २ व रूटने १ गडी बाद केला. 
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणा-या इंग्लंडतर्फे कप्तान (९५), बॅलन्स ( १५६) आणि बेल (१६७) यांनी दमदार फलंदाजी करत भारतापुढे ५६९ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रहाणे (५४) व धोनीशिवाय (५०) भारताचा कोणीही फलंदाज जास्त टिकू शकला नाही आणि परिणामी भारताचा डाव ३३० धावांवरच संपुष्टात आला. इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता दुस-या डावाचीही चांगली सुरूवात केली. कूकच्या ७० धावांच्या नाबाद खेळीमुळे इंग्लंडने २०५ धावांचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर डाव घोषित करत भारतापुढे जिंकण्यासाठी ४४५ धावांचे आव्हान ठेवले.
मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाज खास खेळ करू शकले नाहीत व भारताचा डाव अवघ्या १७८ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने तब्बल २६६ धावांनी तिसरी कसोटी जिंकली.