शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

भारत ‘ब’चा भारत ‘अ’वर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 02:39 IST

कर्णधार उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर भारत ब संघाने देवधर चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाला पाच गडी राखून हरविले.

कानपूर : कर्णधार उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर भारत ब संघाने देवधर चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाला पाच गडी राखून हरविले. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारत अ संघाने ४४.२ षटकांत १६१ धावांवर नांगी टाकली. या संघाची धावसंख्या एकवेळेस ५ बाद २९ अशी होती. त्यानंतर अष्टपैलू परवेझ रसूल (६६) आणि कर्णधार अंबाती रायुडू (५८) यांनी सहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी केल्यामुळे संघाला थोडीफार सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.याच्या प्रत्युत्तरात उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांमुळे भारत ब संघाने २९.२ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. चंदने ८२ चेंडू खेळताना ९ चौकार आणि एक षटकार ठोकला. उन्मुक्त चंदने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा पर्याय निवडल्यानंतर त्याच्या गोलंदाजांनी ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर आपले काम चोखपणे पार पाडले. धवल कुलकर्णी (९ धावांत २ बळी) आणि नत्थूसिंग (२३ धावांत ३ बळी) यांनी आघाडीचा फडशा पाडला. कसोटीपटू मुरली विजयला २२ चेंडू खेळूनही आपले खाते उघडता आले नाही. (वृत्तसंस्था)