शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

बीजिंग आॅलिम्पिकनंतर मला निवृत्तीचा सल्ला मिळाला होता

By admin | Updated: June 27, 2016 04:05 IST

सन २००८ साली झालेल्या बीजिंग आॅलिम्पिकनंतर यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना मला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता

नवी दिल्ली : सन २००८ साली झालेल्या बीजिंग आॅलिम्पिकनंतर यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना मला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा सलग दोन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू सुशील कुमार याने केला आहे. ‘माय आॅलिम्पिक जर्नी’नामक पुस्तकामध्ये सुशीलने सांगितले की, त्याने बीजिंंग आॅलिम्पिकनंतर मिळालेल्या निवृत्तीच्या सल्ल्यानंतरही खेळण्याचे ठरवले होते. कारण त्याच्या मते हा शेवट नसून ही खरी सुरुवात होती. यानंतर त्याने चार वर्षांनी २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये कामगिरीत सुधारणा करताना रौप्यपदक पटकावून सलग दोन आॅलिम्पिकमध्ये देशासाठी वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला. सुशीलने या पुस्तकामध्ये खुलासा केला आहे की, ‘‘मी बीजिंग आॅलिम्पिकनंतर भारतात आल्यावर माझ्या शुभचिंतकांनी सर्वोच्च स्थानी असताना निवृत्ती घेण्याबाबत सुचवले. मी द्विधा मनस्थितीमध्ये पडलो. इतक्या वर्षांनी अखेर मला कळले की, आॅलिम्पिक पदक विजेता होणे म्हणजे काय असते आणि ते लक्ष्य साधण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते. आॅलिम्पिक कांस्यपदक पटकावल्यानंतरच मी कुस्तीकडे अधिक बारीकपणे लक्ष दिले. विविध प्रयोग केले. त्यामुळे हा शेवट नव्हता, तर नवीन सुरुवात होती.’’ (वृत्तसंस्था)याआधी मी आॅलिम्पिक पदक विजयाकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हतो. मात्र जेव्हा बीजिंग आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकलो तेव्हा मला याचे महत्त्व कळाले. यानंतर मी माझ्या खेळात अधिक सुधारणा करण्यास सुरुवात केली. मी अधिक मेहनतीने सराव केल्याचे फळ पुढील आॅलिम्पिकमध्ये मिळाले. याआधी १९५२ साली खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये पहिले पदक जिंकले होते, याची मला काहीच कल्पना नव्हती. घरी आल्यानंतर मला माझ्या पदकाचे महत्त्व कळाले होते. - सुशील कुमार