शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

नेमबाज पदकांची संख्या वाढवतील: गगन नारंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 7:37 AM

टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे माझ्या स्वत:च्या प्रवासातील अनेक स्मृती ताज्या झाल्या.

टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे माझ्या स्वत:च्या प्रवासातील अनेक स्मृती ताज्या झाल्या. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकला पहिल्यांदा हजेरी लावली त्यावेळी परग्रहावरील मानवासारखे वाटले होते. बीजिंगमध्ये एअर रायफल फायनलमध्ये एका गुणाने माघारलो तेव्हा हृदय द्रवले होते. त्यानंतर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्याने काहीसा दिलासा लाभला. २०१६ च्या स्पर्धेत वेगळी कथा होती. खेळाचा चाहता ते पदक विजेता यादरम्यानचे आव्हान पेलताना खेळाला काही देऊ शकतो. ‘गन फॉर ग्लोरी’ या माझ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून अहमदाबादच्या शाळेतून इलावेनिल वलारिवनसारखी नंबर वन खेळाडू घडली.

नेमबाजी महागडा खेळ असल्याने अनेक चांगले खेळाडू तो सोडून देतात. आमचा प्रयत्न हिरा शोधणे, त्याला पैलू पाडणे आणि नंतर राष्ट्रीय शिबिरात पाठविणे हा आहे. आम्ही सर्वजण उत्तरदायित्व ओळखून काम करतो. उत्कृष्ट खेळाडूच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी खेळाडूंना सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी एक यंत्रणा तयार झाली. खेलो इंडिया गेम्स, क्रीडा शिष्यवृत्ती आणि स्वीकृतीबद्ध प्रशिक्षण हे मार्ग प्रशस्त करण्यात आले आहेत. यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा नंतर टॉप्समध्ये (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम) समावेश करण्यात येतो.

खासगी खेळाडूंचा सहभाग वाढत आहे. क्राऊडफंडिंग या नव्या ट्रेंडच्या सहकार्याने उच्च-कार्यक्षमतेच्या विकासावर लक्ष केंद्रित करून अधिक व्यावसायिक दृष्टिकोन व्यापक होत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा रोमांचक काळ म्हणू शकतो. टोकियो २०२० ने दोन मैलाचे टप्पे गाठले आहेत. भारत ऑलिम्पिकमध्ये आधीपेक्षा मोठे पथक पाठवीत आहे. प्रतिभावान खेळाडू स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी निर्धाराने खेळणार हेच यातून जाणवते. यातून अभूतपूर्व निकालांची अपेक्षा करणे योग्य ठरेल. पदकांची संख्या वाढेल. अनिश्चितता हा खेळाचा एक अत्यावश्यक भाग आहे. क्रीडापटूंना चांगल्याप्रकारे तयार होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत.

(गगन नारंग हे २०१२च्या ऑलिम्पिकचे कांस्य विजेते नेमबाज असून सध्या नेमबाजीत योगदानासाठी ‘गन फॉर ग्लोरी’ हे फाऊंडेशन चालवतात.) 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020