शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी कट रचला जातोयं - ICC अध्यक्ष

By admin | Updated: March 20, 2015 11:07 IST

वर्ल्ड कप भारताने जिंकावा यासाठी कट रचला जात असून एकाच सामन्यात पंच डझनभऱ चुकीचे निर्णय देऊ शकत नाही असे आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २० - क्वार्टर फायनलमध्ये भारताने बांग्लादेशवर मात करत दिमाखात प्रवेश केला असला या सामन्यातील पंचाच्या चुकीच्या निर्णयावर आयसीसीचे अध्यक्ष व बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष मुस्तफा कमाल भलतेच नाराज झाले आहेत. वर्ल्ड कप भारताने जिंकावा यासाठीच हा कट रचला जात असून एकाच सामन्यात पंच डझनभऱ चुकीचे निर्णय देऊ शकत नाही असे मुस्तफा यांनी म्हटले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही पंचांच्या निर्णयाविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 
गुरुवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताला विजय मिळाला असला तरी या सामन्यात पंचांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले. रोहित शर्मा ९० धावांवर असताना फुलटॉस चेंडू टोलवण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला होता.मात्र पंचांनी तो नो बॉल ठरवले व रोहितला जीवदान मिळाले. यानंतर रोहितने आणखी ४७ धावा काढून भारताच्या डावाला आकार दिला. याशिवाय महमदुल्लाहचा शिखर धवनने सीमारेषेजवळ टिपलेला झेल वादग्रस्त ठरला होता.  या दोन्ही प्रकरणांमध्ये पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याने बांग्लादेश पराभूत झाल्याची बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींना वाटते. ढाकामध्ये सामन्यातील पंचांविरोधात निदर्शनंही करण्यात आली. 
आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीदेखील बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींच्या आरोपांशी सहमती दर्शवत आयसीसीवरच टीकास्त्र सोडले. मुस्तफा हे स्वतः गेल्या काही वर्षांपासून बांग्लादेश क्रिकेट बोर्डात सक्रीय आहेत. 'भारताने वर्ल्डकप जिंकावे यासाठी कट रचला जात आहे. क्रिकेटमध्ये पंचांकडूनही चुका होतात हे गृहीत धरले तरी एकाच सामन्यात पंचांनी १२ चुकीचे निर्णय देणे हे संशयास्पद वाटते' असे सूचक विधान मुस्तफा कमाल यांनी केले आहे. सामन्या दरम्यान स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा असा संदेश झळकत होता. सामना सुरु असताना स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर असे संदेश झळकणे हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरते असे मुस्तफा कमाल यांनी म्हटले आहे. मी हा प्रकार आयसीसीच्या सीईओंच्या निदर्शनास आणून दिला, पण त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच भारत जिंकणार हे बहुधा ठरले होते असे खोचक विधानही त्यांनी केले. 
आयसीसीचे अध्यक्षपद हे केवळ मानाचे असून आयसीसीचे सर्वाधिकार चेअरमनकडे असतात. मुस्तफा कमाल हे अध्यक्ष असून एन. श्रीनिवासन हे आयसीसीचे चेअरमन आहेत. श्रीनिवासन यांची कोंडी करण्यासाठी कमाल यांनी हा आरोप केल्याची चर्चा आहे.