शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी कट रचला जातोयं - ICC अध्यक्ष

By admin | Updated: March 20, 2015 11:07 IST

वर्ल्ड कप भारताने जिंकावा यासाठी कट रचला जात असून एकाच सामन्यात पंच डझनभऱ चुकीचे निर्णय देऊ शकत नाही असे आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २० - क्वार्टर फायनलमध्ये भारताने बांग्लादेशवर मात करत दिमाखात प्रवेश केला असला या सामन्यातील पंचाच्या चुकीच्या निर्णयावर आयसीसीचे अध्यक्ष व बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष मुस्तफा कमाल भलतेच नाराज झाले आहेत. वर्ल्ड कप भारताने जिंकावा यासाठीच हा कट रचला जात असून एकाच सामन्यात पंच डझनभऱ चुकीचे निर्णय देऊ शकत नाही असे मुस्तफा यांनी म्हटले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही पंचांच्या निर्णयाविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 
गुरुवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताला विजय मिळाला असला तरी या सामन्यात पंचांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले. रोहित शर्मा ९० धावांवर असताना फुलटॉस चेंडू टोलवण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला होता.मात्र पंचांनी तो नो बॉल ठरवले व रोहितला जीवदान मिळाले. यानंतर रोहितने आणखी ४७ धावा काढून भारताच्या डावाला आकार दिला. याशिवाय महमदुल्लाहचा शिखर धवनने सीमारेषेजवळ टिपलेला झेल वादग्रस्त ठरला होता.  या दोन्ही प्रकरणांमध्ये पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याने बांग्लादेश पराभूत झाल्याची बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींना वाटते. ढाकामध्ये सामन्यातील पंचांविरोधात निदर्शनंही करण्यात आली. 
आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीदेखील बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींच्या आरोपांशी सहमती दर्शवत आयसीसीवरच टीकास्त्र सोडले. मुस्तफा हे स्वतः गेल्या काही वर्षांपासून बांग्लादेश क्रिकेट बोर्डात सक्रीय आहेत. 'भारताने वर्ल्डकप जिंकावे यासाठी कट रचला जात आहे. क्रिकेटमध्ये पंचांकडूनही चुका होतात हे गृहीत धरले तरी एकाच सामन्यात पंचांनी १२ चुकीचे निर्णय देणे हे संशयास्पद वाटते' असे सूचक विधान मुस्तफा कमाल यांनी केले आहे. सामन्या दरम्यान स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा असा संदेश झळकत होता. सामना सुरु असताना स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर असे संदेश झळकणे हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरते असे मुस्तफा कमाल यांनी म्हटले आहे. मी हा प्रकार आयसीसीच्या सीईओंच्या निदर्शनास आणून दिला, पण त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच भारत जिंकणार हे बहुधा ठरले होते असे खोचक विधानही त्यांनी केले. 
आयसीसीचे अध्यक्षपद हे केवळ मानाचे असून आयसीसीचे सर्वाधिकार चेअरमनकडे असतात. मुस्तफा कमाल हे अध्यक्ष असून एन. श्रीनिवासन हे आयसीसीचे चेअरमन आहेत. श्रीनिवासन यांची कोंडी करण्यासाठी कमाल यांनी हा आरोप केल्याची चर्चा आहे.