शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : स्थगितीमुळे तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ, भारतीय प्रशिक्षकांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:38 IST

coronavirus : जगभरामध्ये कोरोना विषाणूचे सावट पसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) जपान सरकारसोबत चर्चा करुन अखेर आॅलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा जगभरामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर २४ जुलैपासून सुरु होणारी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. यामुळे आता खेळाडूंना एक वर्ष या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेसाठी प्रतीक्षा करावी लागणार असून प्रत्येक खेळाच्या प्रशिक्षकांनी आतापासूनच योजना आखण्यास सुरु केले आहे.जगभरामध्ये कोरोना विषाणूचे सावट पसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) जपान सरकारसोबत चर्चा करुन अखेर आॅलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर जगभरातील खेळाडूंनी या निर्णयाचे स्वागतही केले. भारतीय नेमबाजीचे राष्ट्रीय प्रशिक्षक जसपाल राणा म्हणाले की, ‘या निर्णयामुळे नेमबाजांवर मोठा परिणाम होईल, खास करुन पहिल्यांदाच आॅलिम्पिक खेळणाऱ्या युवा खेळाडूंवर परिणाम होईल. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेसाठी तयारी करत असून आता कोणत्याही तक्रारीविना आम्हाला या निर्णयाचे पालन करावे लागेल.’ आतापर्यंत सुमारे ८० भारतीय अ‍ॅथलिट आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले असून आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा सुरु झाल्यानंतर यामध्ये आणखी संख्या वाढण्याची खात्रीही आहे.आॅलिम्पिकमध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा नेमबाजांकडून असून टोकियो २०२० आॅलिम्पिकसाठी विक्रमी १५ भारतीय नेमबाजांनी कोटा मिळवला. यामध्ये ८ पुरुष व ७ महिला नेमबाजांचा समावेश आहे. राणा पुढे म्हणाले की, ‘आयुष्य अमूल्य असून जे काही केले जात आहे, ते खेळाडूंच्या सर्वोत्तम हित गृहीत धरुनच केले जात आहे. तसेच हा निर्णय केवळ खेळाडूंसाठीच नसून संपूर्ण जगासाठी आहे.’याशिवाय ९ मुष्टियोध्यांनी आणि ९ धावपटूंनीही आॅलिम्पिक पात्रता गाठली आहे. मुष्टियुद्ध संघाचे प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी सांगितले की, ‘२०२१ साली होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच मी माझ्या योजनांवर पुन्हा काम करेन. पुढील पात्रता फेरी स्पर्धा कधी आहेत, याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. स्पर्धेसाठी १३ पैकी ९ वजनी गटातून आॅलिम्पिक तिकीट मिळवले असल्याने आम्हाला फारशी चिंता नाही.’दरम्यान अजूनही भारताकडे आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची संधी असून याबाबत नीवा म्हणाले की, ‘नक्कीच ही अविश्वसनीय वेळ आहे. पात्रता स्पर्धेऐवजी मिळवलेला फॉर्म कायम राखण्यावर आमचा भर असेल आणि हीच आमची मुख्य योजना आहे.’त्याचवेळी, अ‍ॅथलेटिक्सचे राष्ट्रीय प्रशिक्षक पी. राधाकृष्णन नायर यांनी निराशा व्यक्त करताना, ‘आॅलिम्पिक स्पर्धा २०२२ पर्यंत स्थगित करायला पाहिजे होते,’ असे सांगितले. ते म्हणाले की, ‘प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या योजनांकडे पाहता आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर माझ्यामते अ‍ॅथलेटिक्ससाठी यंदाचे सत्र जवळपास संपुष्टात आल्यासारखे आहे. सप्टेंबर किंवा आॅक्टोबरच्या आधी आपल्या काही सुरु करता येईल, असे वाटत नाही. त्यामुळे २०२१ सालच्या आॅलिम्पिकसाठी तयार होण्यास ७-८ महिन्यांचा वेळ पुरेसा ठरणार नाही.’ (वृत्तसंस्था)माझ्यामते एक वर्षाची मिळालेला वेळ चांगला कालावधी आहे. यामुळे फॉर्म मिळवण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीवर कोणताही नकारात्मक परिणाम होईल, असे मला वाटत नाही.- पुलेल्ला गोपीचंद,बॅडमिंटन प्रशिक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020