शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष- भारतीय क्रीडा विकासात क्रिकेटचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 09:36 IST

भारतात क्रिकेटची वाढती लोकप्रियता नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. विशेषत: अन्य खेळांचे पाठीराखे आणि पदाधिकारी नेहमीच क्रिकेटच्या तुलनेत भेदभाव होत असल्याचा आरोप करतात.

भारतात क्रिकेटची वाढती लोकप्रियता नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. विशेषत: अन्य खेळांचे पाठीराखे आणि पदाधिकारी नेहमीच क्रिकेटच्या तुलनेत भेदभाव होत असल्याचा आरोप करतात. तरीही सभ्य माणसाच्या या खेळाने देशाच्या क्रीडा विकासात मोठी भूमिका बजावली, ही बाब मान्य करावीच लागेल. १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघ चॅम्पियन बनल्यापासून खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काळानुसार  अन्य खेळाडूंनाही  ‘स्टारडम’ मिळू लागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल बीसीसीआयने नीरज चोप्राला एक कोटीचा पुरस्कार दिला. भारताच्या क्रीडाविश्वात हे वगळे उदाहरण ठरावे. क्रिकेटची वाढती लोकप्रियता अन्य खेळाच्या विकासास कशी पूरक ठरली, हे जाणून घेऊ या...

विदेशी कोचेस

क्रिकेटसारख्या अन्य खेळामध्ये आता विदेशी कोचेसची सेवा घेण्याची वृत्ती वाढली. याचे चांगले निकाल पुढे आले आहेत. गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात भारताने २०११ चा वन डे विश्वचषक जिंकला, त्याचप्रमाणे ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने जर्मनीचे कोच क्लॉज बार्टिनेत्झ यांच्या मार्गदर्शनात टोकियोत सुवर्ण जिंकले. पी. व्ही. सिंधूने द. कोरियाचे कोच ताई सॅंग यांच्या मार्गदर्शनात कांस्य पदक जिंकून सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्याची किमया साधली. पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांनंतर कांस्यपदक विजेती कामगिरी केली ती देखील ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रीड यांच्याच मार्गदर्शनात.

प्रायोजकांचीही रुची वाढली

क्रिकेटशिवाय अन्य खेळांमध्ये आता प्रायोजक रुची दाखवू लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण प्रो लीग कबड्डीचे देता येईल. कबड्डी टीव्हीवरून घरोघरी पोहोचली.

व्यावसायिक दृष्टिकोन

क्रिकेटसारखाच बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल, मुष्टियुद्ध आदी खेळात आता व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्यात येत आहे. हा वेग मंद असला तरी उशिरा का होईना मात्र अन्य खेळावर याचा सकारात्मक परिणाम जाणवतो.

क्रीडाशक्तीच्या उंबरठ्यावर

आंतरराष्ट्रीय पटलावर खेळांना मिळणारे यश हे देशाच्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते. मागच्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताला क्रीडाशक्तीच्या रूपाने ओळख लाभत आहे.

लहान शहरातील मोठे खेळाडू

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला. धोनी हा रांचीसारख्या लहान शहरातून उदयास आला. धोनीला आदर्श मानून लहान लहान शहरातून खेळाडू पुढे येऊ लागले. भारतीय महिला हॉकी संघ याचे मोठे उदाहरण आहे. ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीच्या बळावर हॉकी विश्वाला चकित करणाऱ्या महिला हॉकी संघातील अनेक खेळाडू, लहान शहरातील आणि गरीब-मागासलेल्या कुटुंबातून पुढे आल्या आहेत.

आर्थिक स्थिती सुधारली

क्रिकेटपटूंच्या तुलनेत अन्य खेळातील खेळाडूंच्या आर्थिक स्थितीत हवी तशी सुधारणा अद्याप झालेली नाही, ही सत्यता आहे. तथापि, मागील दशकापासून यात उल्लेखनीय सुधारणा घडून आली. आयपीएलच्या धर्तीवर आयोजित आयएसएल फुटबॉल, पीबीएल बॅडमिंटन, कुस्तीची प्रो रेसलिंग लीग आणि प्रो कबड्डी लीग यापासून खेळाडूंना फार मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Indiaभारत