सातत्य, सरावाशिवाय यश मुश्किल: अभिजित कुंटे
By Admin | Updated: May 5, 2014 14:36 IST2014-05-05T13:13:34+5:302014-05-05T14:36:16+5:30
येत्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंना यश संपादन करण्यासाठी कामगिरीमध्ये सातत्य आणि सराव अत्यंत आवश्यक आहे

सातत्य, सरावाशिवाय यश मुश्किल: अभिजित कुंटे
नाशिक : येत्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंना यश संपादन करण्यासाठी कामगिरीमध्ये सातत्य आणि सराव अत्यंत आवश्यक आहे. तामिळनाडू, केरळच्या बुद्धिबळपटूंकडून अत्यंत कडवे आव्हान महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी असणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी शारीरिक क्षमता आणि नियमित सराव गरजेचे असल्याचे पुण्याचा ग्रॅँडमास्टर अभिजित कुंटे याने केले.
सिटी सेंटर मॉल येथे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अभिजित कुंटे बोलत होते. सदर स्पर्धेच्या मुलांच्या गटातून नगरचा संकर्ष शेळके व ठाण्याचा शार्दूल वाकाडे तर मुलींच्या गटातून नागपूरची दिव्या देशमुख व श्रीया ठाकरे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याशिवाय मुलींच्या अंडर ११ गटात मंुबईची पिया सक्सेना, नागपूरची इशा सारडा, मंुबईची अवरिल डेव्हीड, नागपूरची नारायणी आज्ञे, मंुबईची आरोही दाभोळकर, आदिती कृष्णन्, इशा शाह, अनन्य गुप्ता यांनी यश नोंदविले.
मुलांच्या गटात नागपूरचा संकल्प गुप्ता, सारांश जेसवाणी, पुण्याचा ओजस कर्नावट, नागपूरची रौनक सादवाणी, मुंबईचा वेदांत पानेसर, आदित गुवाघरकर, शौर्य जैन, रिसब शाह यांनी यश नोंदविले.
नाशिक बेस्टच्या किताबात मुलींमध्ये जान्हवी कौशिक, श्रीया कुलकर्णी, श्रृती राका, वृंदा राठी, कंुचिता कुंटे तर मुलांमध्ये जयंत शिरोरे, सिद्धांत देवरे, आविष्कार वानखडे, वरुण वाघ, सोहम दुसाने यांनी यश नोंदविले.
पारितोषिक प्रदान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे, सुमित नहार, सिटी सेंटर मॉलचे राजपूत उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून राजेंद्र शिरोदे यांनी काम पाहिले तर प्रवीण ठाकरे, मंगेश गंभीरे, मिलिंद नाईक यांनी पंच म्हणून काम पाहिले.