बांग्लादेशचा दणका, भारत ९ बाद ११९

By Admin | Updated: June 19, 2014 18:51 IST2014-06-19T13:40:31+5:302014-06-19T18:51:57+5:30

बांग्लादेशविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करणा-या भारताची अवस्था बिकट झाली आहे.

Bangladesh Danga, India 9 11 after 9 | बांग्लादेशचा दणका, भारत ९ बाद ११९

बांग्लादेशचा दणका, भारत ९ बाद ११९

>ऑनलाइन टीम
ढाका, दि. १९ -  बांग्लादेशविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करणा-या भारताची अवस्था बिकट झाली असून भारताने नऊ विकेटच्या मोबदल्यात अवघ्या ११९ धावा केल्या आहेत. पावसामुळे  सामना थांबवण्यात आला असून सध्या खेळपट्टीवर  स्टुअर्ट बिन्नी (नाबाद २५) आणि उमेश यादव (नाबाद ०) हे दोघे खेळत आहेत. 
सहारा कपमधील शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली. कर्णधार सुरेश रैनाने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यातही भारताची फलंदाजी ढेपाळली.  भारताचे सलामीचे फलंदाज उथप्पा (५), रहाणे (३) आणि रायडु (१) स्वस्तात तंबूत परतले. यानंतर कर्णधार रैनाने पुजाराच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र २५ धावांवर असताना रैनाही बाद झाला. रैनापाठोपाठ पुजारा २७ धावांवर पायचीत झाला. रैना, पुजार व बिन्नीवगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.  
तिस-या सामन्यातही पावसाने व्यत्यस आणल्याने सामना ४० षटकांचा करण्यात आला आहे. दरम्यान, तीन सामन्याच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेत मालिका विजय मिळाला आहे. 

Web Title: Bangladesh Danga, India 9 11 after 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.