शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Asian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी!

By स्वदेश घाणेकर | Published: August 18, 2018 1:30 PM

Asian Game 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती.

मुंबई - आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती. 1982 नंतर दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंनी 57 पदकांचा आकडा गाठला. 2010च्या तुलनेत हा आकडा 8 पदकांनी कमी झाला असला तरी सुवर्णपदकात भारताने 2010च्या तुलनेत दोन पदकं अधिकची जिंकली होती. 1958 ते 2014 या कालावधीत भारताने एकूण 616 पदके जिंकली, परंतु त्यात एकही पदक हे टेबल टेनिसपटूंना पटकावता आलेले नाही. पण, यंदा ही उणीव भरून निघण्याची चिन्हे आहेत.

मनिका बत्रा, अचंता शरथ कमल, साथियन ग्यानसेकरन, मौमा दास यांच्याकडून यंदा पदकांच्या अपेक्षा आहेत. या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली आहे आणि म्हणूनच सुवर्ण नाही, निदान कांस्यपदक तरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. 1958 सालापासून आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन स्पर्धा वगळता चीननेच या क्रीडा प्रकारात हुकुमत गाजवली आहे आणि यंदाही त्यांचाच दबदबा राहणार आहे. 

भारताला केवळ एखादे पदक पटकावून पदकाचा दुष्काळ संपवायचा आहे. भारतीय खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे, परंतु त्याचे रूपांतर आशियाई पदकांमध्ये करणे, थोडेसे अवघडच आहे. पण, राष्ट्रकुलमधील पदकांनी भारतीय खेळाडूंचे मनोबल प्रचंड उंचावलेले आहे आणि त्याच जोशात त्यांच्याकडून एखाद्या पदकाची लॉटरी लागू शकते. 23 वर्षीय मनिका बत्राने आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे आणि सा-यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. गोल्ड कोस्टमध्ये सर्वाधिक चार पदकं जिंकणारी ती एकमेव भारतीय होती. तिने महिला सांघिक व एकेरीत सुवर्ण, महिला दुहेरीत रौप्य आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूकडून अशी कामगिरी झाली नव्हती. 

टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शरथ कमल हाही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे 36 वर्षीय कमल शेवटच्या आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारतीय पुरूष टेबल टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून तो आघाडीवर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील चार सुवर्ण, दोन कांस्य व एक सुवर्ण अशी एकूण सात पदकं जिंकली आहेत. पण, तीन आशियाई स्पर्धांमध्ये त्याला एकही पदकं न जिंकल्याची खंत असेलच आणि जकार्ता येथे भरून काढण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. 

याआधीच्या तुलनेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा हा चमू अधिक प्रभावी आहे. पण म्हणून त्यांच्याकडून थेट सुवर्णपदकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. पण, या संघातील युवा खेळाडूंचा भरणा पाहता त्यांच्यासाठी जकार्तातील अनुभव पुढील वाटचालीसाठी फायद्याचा ठरणारा आहे. कमलचा अनुभव आणि अन्य खेळाडूंचा युवा जोश याची योग्य सांगड घालून भारतीय संघ यंदा करिष्मा दाखवतील, हा भाबडा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. 

 

 

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Table Tennisटेबल टेनिस