शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Asian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी!

By स्वदेश घाणेकर | Updated: August 18, 2018 14:54 IST

Asian Game 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती.

मुंबई - आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती. 1982 नंतर दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंनी 57 पदकांचा आकडा गाठला. 2010च्या तुलनेत हा आकडा 8 पदकांनी कमी झाला असला तरी सुवर्णपदकात भारताने 2010च्या तुलनेत दोन पदकं अधिकची जिंकली होती. 1958 ते 2014 या कालावधीत भारताने एकूण 616 पदके जिंकली, परंतु त्यात एकही पदक हे टेबल टेनिसपटूंना पटकावता आलेले नाही. पण, यंदा ही उणीव भरून निघण्याची चिन्हे आहेत.

मनिका बत्रा, अचंता शरथ कमल, साथियन ग्यानसेकरन, मौमा दास यांच्याकडून यंदा पदकांच्या अपेक्षा आहेत. या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली आहे आणि म्हणूनच सुवर्ण नाही, निदान कांस्यपदक तरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. 1958 सालापासून आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन स्पर्धा वगळता चीननेच या क्रीडा प्रकारात हुकुमत गाजवली आहे आणि यंदाही त्यांचाच दबदबा राहणार आहे. 

भारताला केवळ एखादे पदक पटकावून पदकाचा दुष्काळ संपवायचा आहे. भारतीय खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे, परंतु त्याचे रूपांतर आशियाई पदकांमध्ये करणे, थोडेसे अवघडच आहे. पण, राष्ट्रकुलमधील पदकांनी भारतीय खेळाडूंचे मनोबल प्रचंड उंचावलेले आहे आणि त्याच जोशात त्यांच्याकडून एखाद्या पदकाची लॉटरी लागू शकते. 23 वर्षीय मनिका बत्राने आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे आणि सा-यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. गोल्ड कोस्टमध्ये सर्वाधिक चार पदकं जिंकणारी ती एकमेव भारतीय होती. तिने महिला सांघिक व एकेरीत सुवर्ण, महिला दुहेरीत रौप्य आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूकडून अशी कामगिरी झाली नव्हती. 

टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शरथ कमल हाही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे 36 वर्षीय कमल शेवटच्या आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारतीय पुरूष टेबल टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून तो आघाडीवर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील चार सुवर्ण, दोन कांस्य व एक सुवर्ण अशी एकूण सात पदकं जिंकली आहेत. पण, तीन आशियाई स्पर्धांमध्ये त्याला एकही पदकं न जिंकल्याची खंत असेलच आणि जकार्ता येथे भरून काढण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. 

याआधीच्या तुलनेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा हा चमू अधिक प्रभावी आहे. पण म्हणून त्यांच्याकडून थेट सुवर्णपदकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. पण, या संघातील युवा खेळाडूंचा भरणा पाहता त्यांच्यासाठी जकार्तातील अनुभव पुढील वाटचालीसाठी फायद्याचा ठरणारा आहे. कमलचा अनुभव आणि अन्य खेळाडूंचा युवा जोश याची योग्य सांगड घालून भारतीय संघ यंदा करिष्मा दाखवतील, हा भाबडा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. 

 

 

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Table Tennisटेबल टेनिस