शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Asian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी!

By स्वदेश घाणेकर | Updated: August 18, 2018 14:54 IST

Asian Game 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती.

मुंबई - आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती. 1982 नंतर दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंनी 57 पदकांचा आकडा गाठला. 2010च्या तुलनेत हा आकडा 8 पदकांनी कमी झाला असला तरी सुवर्णपदकात भारताने 2010च्या तुलनेत दोन पदकं अधिकची जिंकली होती. 1958 ते 2014 या कालावधीत भारताने एकूण 616 पदके जिंकली, परंतु त्यात एकही पदक हे टेबल टेनिसपटूंना पटकावता आलेले नाही. पण, यंदा ही उणीव भरून निघण्याची चिन्हे आहेत.

मनिका बत्रा, अचंता शरथ कमल, साथियन ग्यानसेकरन, मौमा दास यांच्याकडून यंदा पदकांच्या अपेक्षा आहेत. या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली आहे आणि म्हणूनच सुवर्ण नाही, निदान कांस्यपदक तरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. 1958 सालापासून आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन स्पर्धा वगळता चीननेच या क्रीडा प्रकारात हुकुमत गाजवली आहे आणि यंदाही त्यांचाच दबदबा राहणार आहे. 

भारताला केवळ एखादे पदक पटकावून पदकाचा दुष्काळ संपवायचा आहे. भारतीय खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे, परंतु त्याचे रूपांतर आशियाई पदकांमध्ये करणे, थोडेसे अवघडच आहे. पण, राष्ट्रकुलमधील पदकांनी भारतीय खेळाडूंचे मनोबल प्रचंड उंचावलेले आहे आणि त्याच जोशात त्यांच्याकडून एखाद्या पदकाची लॉटरी लागू शकते. 23 वर्षीय मनिका बत्राने आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे आणि सा-यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. गोल्ड कोस्टमध्ये सर्वाधिक चार पदकं जिंकणारी ती एकमेव भारतीय होती. तिने महिला सांघिक व एकेरीत सुवर्ण, महिला दुहेरीत रौप्य आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूकडून अशी कामगिरी झाली नव्हती. 

टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शरथ कमल हाही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे 36 वर्षीय कमल शेवटच्या आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारतीय पुरूष टेबल टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून तो आघाडीवर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील चार सुवर्ण, दोन कांस्य व एक सुवर्ण अशी एकूण सात पदकं जिंकली आहेत. पण, तीन आशियाई स्पर्धांमध्ये त्याला एकही पदकं न जिंकल्याची खंत असेलच आणि जकार्ता येथे भरून काढण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. 

याआधीच्या तुलनेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा हा चमू अधिक प्रभावी आहे. पण म्हणून त्यांच्याकडून थेट सुवर्णपदकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. पण, या संघातील युवा खेळाडूंचा भरणा पाहता त्यांच्यासाठी जकार्तातील अनुभव पुढील वाटचालीसाठी फायद्याचा ठरणारा आहे. कमलचा अनुभव आणि अन्य खेळाडूंचा युवा जोश याची योग्य सांगड घालून भारतीय संघ यंदा करिष्मा दाखवतील, हा भाबडा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. 

 

 

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Table Tennisटेबल टेनिस