शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

एशियन बीच गेम्सचे यजमानपद नाकारले, गोवा सरकारचा ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:55 AM

जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या असलेल्या आकर्षणामुळे २०२०मध्ये होणा-या ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले होते. गोव्यानेही त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ‘आयओए’नी ही संधी मिळवून दिली होती.

- सचिन कोरडेपणजी : जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या असलेल्या आकर्षणामुळे २०२०मध्ये होणा-या ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले होते. गोव्यानेही त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ‘आयओए’नी ही संधी मिळवून दिली होती. मात्र, आता सरकारी अनास्थेपोटी ही स्पर्धा गोव्याने गमावली असून काही कारणास्तव आम्ही ही स्पर्धा आयोजित करू शकत नसल्याचे कारण पुढे करीत गोवा सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) पत्र पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनीदिली. त्यामुळे आता ही स्पर्धागोव्यात होणार नाही, हे निश्चित झाले आहे.गोवा सरकारने ‘आयओए’ला पत्र पाठवून ही स्पर्धा दुसरीकडे खेळविण्याची विनंती केली आहे. स्पर्धेसाठी आयओएकडे मुंबई, चेन्नई आणि केरळचे पर्याय होते. मात्र, गोवा सरकारच्या उत्साहामुळे आयओएचा गोव्यावर भर होता. आयओएच्या बैठकीत त्यास मंजुरी दिली गेली होती. त्यानंतर गोवा सरकारही सकारात्मक होते. स्पर्धेची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चाही सुरू झाली असताना गोवा सरकारने अचानक यू टर्न घेतला आणि आपण हीस्पर्धा आयोजित करू शकतनसल्याचे पत्र आयओएलापाठवले.बत्रांनी केले होते शिक्कामोर्तबगोव्याने यजमानपदासाठी आयओएकडे पत्र पाठविले होते. आयओएचे अध्यक्ष नरींदर बत्रा आणि नवनियुक्त सचिव राजीव मेहता यांनी कार्यभार स्वीकारताच पहिली बैठक दिल्लीत घेतली. त्या बैठकीत २०२०मध्ये होणाºया एशियन बीच गेम्स आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांवर चर्चा झाली होती. आशियाई बीच गेम्स गोव्यात व्हाव्यात, अशी प्राथमिकता आयओएची होती. यापूर्वी स्पर्धा स्थळांवर चर्चासुद्धा झाली होती. त्यात मुंबईनंतर गोव्याचे नाव आघाडीवर होते. देश-विदेशातील खेळाडू गोव्यात येण्यास उत्सुक आहेत. गोव्यात बीच गेम्ससाठी साधनसुविधा आणि पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्याला मंजुरी देण्यात आली होती, असे एका पदाधिकाºयाने सांगितले.क्रीडा आणि पर्यटनालाही होता वाव...ही स्पर्धा ‘आॅलिम्पिक काउंसिल आॅफ एशिया’ आयोजित करते. याआधी, ही स्पर्धा व्हिएतनामने आयोजित केली होती. त्यात ४१ आशियाई संघांच्या एकूण २ हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. पहिली स्पर्धा बाली येथे २००८मध्ये झाली होती. एवढ्या मोठ्या स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याची संधी गोव्याला प्रथमच मिळणार होती. या स्पर्धेमुळे गोव्याला क्रीडा क्षेत्रासह पर्यटनातही मोठा वाव होता. जगभरातील खेळाडू यानिमित्त गोव्यात आले असते. विशेष म्हणजे, सध्या क्रीडा आणि पर्यटन ही दोन्ही खाती मनोहर आजगावकर यांच्याकडेच आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा