शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

एअर इंडिया संघाची विजयी आगेकूच

By admin | Updated: April 12, 2015 02:15 IST

बलाढ्य एअर इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कसलेल्या एल अ‍ॅण्ड टी संघाला ४ विकेट्सने नमवून इन्शूरन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

मुंबई: बलाढ्य एअर इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कसलेल्या एल अ‍ॅण्ड टी संघाला ४ विकेट्सने नमवून इन्शूरन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. शम्स मुलानीने शानदार अष्टपैलू खेळ करताना एअर इंडियाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. अन्य एका सामन्यात मुंबई महापालिका संघाने बाजी मारताना बँक आॅफ इंडियाचे कडवे आव्हान २९ धावांनी परतावून लावले.एल अ‍ॅण्ड टी संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १४१ धावा उभारल्या. एअर इंडियाच्या अचूक माऱ्यापुढे एल अ‍ॅण्ड टीच्या फलंदाजांना फटकेबाजीची जास्त संधी मिळाली नाही. फैझन अमिन याने एकाकी झुंज देताना सर्वाधिक ५२ धावा फटकावल्या. शम्स मुलानीने अवघ्या १४ धावांत ३ बळी घेत एल अ‍ॅड टीला रोखण्यात मोलाचे योगदान दिले. शिवाय महम्मद अझर (२/२५) आणि गोपेंद्र (२/२१) यांनी देखील चांगला मारा करताना मुलानीला चांगली साथ दिली.यानंतर एअर इंडियाने आक्रमक सुरुवात करुन आपला निर्धार स्पष्ट केला. मात्र फटकेबाजीच्या नादात एअर इंडीयाचे झटपट बळी गेले. यावेळी मुलानीने फलंदाजीतसुध्दा चमक दाखवत नाबाद ४४ धावांचा तडाखा देत संघाला विजयी भरारी मारुन दिली. विराज झगडे (४५) आणि निकेतन आडविलकर (२६) यांनी मोक्याच्यावेळी फटकेबाजी करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अभिमन्यू सिंगने (२/२६) चांगला मारा करताना एअर इंडियाला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)महापालिकेचा विजयप्रथम फलंदाजी करताना मुंबई महापालिकेने निर्धारीत २० षटकंत ९ बाद १३३ अशी मजल मारली. संतोष धांडेने सामन्यात निर्णायक कामगिरी करताना प्रथम फलंदाजीत नाबाद ३९ फटकावून संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. त्यानंतर २० धावांत ३ बळी घेत बँक आॅफ महाराष्ट्राला ९ बाद १०४ असे रोखले.