शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त गोलंदाजांना पसंती

By admin | Updated: June 16, 2015 02:10 IST

टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार व सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचा भर संघामध्ये एका अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यावर असतो.

फातुल्ला : टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार व सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचा भर संघामध्ये एका अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यावर असतो. संघातील हा बदल त्याला अधिक आवडतो.महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराटने संघात अतिरिक्त गोलंदाजाला खेळविण्यास प्राधान्य दिले आहे. धोनी सामन्यात ४ गोलंदाजांसह खेळण्याची रणनीती वापरत होता, तर विराट ५ गोलंदाजांसह खेळण्यास प्राधान्य देतो. विराटच्या रणनीतीबाबत आताच भाष्य करणे घाईचे ठरेल; पण बांगलादेशाविरुद्धच्या लढतीत त्याची ही रणनीती यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसले.भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान फातुल्लामध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत पावसाने वर्चस्व गाजवले. अखेर ही लढत ‘ड्रॉ’ झाली; पण २६ वर्षीय कर्णधार विराटची रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसून आले. टीम इंडियाला बांगलादेशाचा पहिला डाव गुंडाळण्यात यश आले. यापूर्वी भारतीय संघातर्फे आघाडीच्या ६ फलंदाजांना संधी मिळत होती; पण बांगलादेशाविरुद्ध रविचंद्रन आश्विन व हरभजनसिंग या दोन्ही फिरकीपटूंना संधी देण्यात आली. या दोन्ही गोलंदाजांनी एकूण ८ बळी घेतले. विराट म्हणाला, ‘‘पाच गोलंदाजांसह खेळण्यास माझी पसंती आहे. मला आश्विनसारख्या खेळाडूंची गरज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो ४०च्या सरासरीने फलंदाजी करण्यास सक्षम असून, गोलंदाजीमध्येही छाप पाडू शकतो. तुम्ही अष्टपैलू खेळाडूकडून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करू शकता?’’विराट पुढे म्हणाला, ‘‘हरभजन अनुभवी खेळाडू असून, गरज भासल्यास तो फलंदाजीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा चांगला खेळाडू आहे. या तीन खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली, तर संघात ८ फलंदाज होतील. यापेक्षा एका कर्णधाराला अधिक काय हवे? काही जबाबदारी आघाडीच्या ६ खेळाडूंना घ्यावी लागते आणि आम्ही ती स्वीकारण्यास सक्षम आहोत, यावर माझा विश्वास आहे.’’ भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशाचा डाव ६६ षटकांत गुंडाळला. आश्विनने ५, तर हरभजनने ३ बळी घेतले. आश्विनने कारकिर्दीत दहाव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली, तर स्टार आॅफ स्पिनर हरभजनने जवळजवळ दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हरभजनने यापूर्वी आयपीएल टी-२०मध्ये सर्वांत वेगवान अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे.विराट म्हणाला, ‘‘गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले खेळाडू संघात असल्यामुळे आनंद झाला. आश्विन व हरभजन या दोन्ही खेळाडूंत सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. कर्णधार म्हणून या दोन्ही खेळाडूंना एकत्र गोलंदाजी करताना बघताना आनंद झाला.’’धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपदी नियुक्ती झालेल्या विराटने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की प्रदीर्घ कालावधीपासून संघाचा सदस्य असलेल्या खेळाडूविना खेळताना चुकल्यासारखे वाटते. सचिन तेंडुलकर सर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली त्याही वेळी अशीच भावना होती. एकाच्या अनुपस्थितीमुळेही ड्रेसिंग रूमचा माहोल बदलतो. एक क्रिकेटर म्हणून नेहमी त्याचा सल्ला घेणे, त्याच्यासोबत चर्चा करणे, हे सगळे बदलून जाते. ज्या आवाजाची ड्रेसिंग रूमला सवय जडलेली असते, तो आवाज नसला म्हणजे वेगळेच भासते. (वृत्तसंस्था)