शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

जानेवारीत जन्माला आलेले लोक असतात, विलक्षण बुद्धिमान, मेहनती आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 09:00 IST

ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीत जन्माला आलेले लोक आकर्षक आणि व्यवहाराला पक्के असतात. ते आपले भाग्य स्वत: निर्माण करतात. त्यांच्या मेहनतीला नशीबाची उत्तम साथ लाभते. तसे असले, तरीदेखील ते आपल्या व्यक्तीमत्त्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाहीत.

इंग्रजी वर्षाची सुरुवात जानेवारीत होते आणि त्या वर्षातील महिन्यानुसार आपलेही वाढदिवस आपण साजरे करतो. वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारीत ज्यांचे वाढदिवस असतात, त्यांची नवीन वर्षाची तसेच वयाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात वर्षारंभीच होते. या महिन्यात जन्माला आलेले लोक कसे असतात, ते जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीत जन्माला आलेले लोक आकर्षक आणि व्यवहाराला पक्के असतात. ते आपले भाग्य स्वत: निर्माण करतात. त्यांच्या मेहनतीला नशीबाची उत्तम साथ लाभते. तसे असले, तरीदेखील ते आपल्या व्यक्तीमत्त्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाहीत.

कामात चोख आणि कुशाग्र बुद्धी यांचा ताळमेळ त्यांच्याठायी दिसून येतो. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करेपर्यंत थांबत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर संस्कारांचीही समोरच्यावर छाप पडते. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत असतात. खुद्द देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्याने ते अभ्यासात हुशार असतात. 

व्यक्तीमत्त्वाची जमेची बाजू म्हणजे लाघवी आणि मृदू भाषा. याबाबतीत त्यांची संवादावर पकड असल्याने अनेक लोक जोडले जातात. त्यांना पसारा आवडत नाही. आवराआवर करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.

मात्र, हे लोक समोरच्याचे ऐकून घेण्याआधी बोलून मोकळे होतात. कोणावरही चटकन विश्वास ठेवतात. अर्थात हलक्या कानाचे असतात. जर सगळे काही तुमच्या मनासारखे झाले, तरच तुम्ही सौजन्याने वागता, अन्यथा संयम गमावून बसता. दुसऱ्यांच्या वेळेची किंमत करत नाहीत. या गोष्टी स्वभावाचा एक भाग आहेत. परंतु, त्या वगळता तुम्ही कोणाशी फार काळ वैर ठेवत नाही.

जानेवारीत जन्माला आलेली मुले प्रेमाच्या बाबतीत काही प्रमाणात कमनशिबी असतात. चुकीचे निर्णय घेऊन फसतात. तर, मुली प्रेमात नशीब काढतात. मुलींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे जोडीदार भाग्यवान ठरतात.

या महिन्यात जन्माला आलेले लोक इलेक्ट्रॉनिक मीडिया, सैन्यदल, चार्टर्ड अकाऊंट, अध्यापन क्षेत्रात रस घेतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमताही जास्त असते. 

या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी केवळ आपलेच म्हणणे खरे न करता, लोकांचेही ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या दृष्टीकोनातूनही जगाकडे पाहिले पाहिजे. लोकांचा मान ठेवला पाहिजे. तसे केल्यास त्यांना नशीबाची, कतृत्त्वाची आणि समाजाची योग्य साथ लाभेल.