शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एपीएमसीतील अनागोंदी थांबेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:52 IST

Mumbai APMC: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. आमदार, खासदारांपासून वजनदार राजकीय नेत्यांची येथे वर्णी लागलेली आहे.

- नारायण जाधव(उपवृत्तसंपादक) 

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. आमदार, खासदारांपासून वजनदार राजकीय नेत्यांची येथे वर्णी लागलेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही बाजार समिती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहे. अनेक प्रकरणांत किशोर तोष्णीवालपासून शौचालय, एफएसआय घोटाळ्यापर्यंत अनेक चौकशी समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले. कारवाई मात्र शून्य. या पार्श्वभूमीवर नवे पणनमंत्री जयकुमार रावल येथील अनागोंदी थांबवतील काय, असा प्रश्न आहे.

सध्या बाजार आवारात ६० टक्के अनधिकृत व्यापार सुरू आहे. फुटपाथवर अनधिकृत स्टॉल, तर बाजार आवारातच अनधिकृतपणे शेतमालाची विक्री सुरू आहे. भाजीपाला व फळ मार्केटमध्ये अनधिकृत बांधकाम करून तेथे वास्तव्य करणाऱ्यांना संचालकांचे अभय आहे. काही ठिकाणी तर बांगलादेशींचा भरणा असून, शेतकऱ्यांसाठीच्या लिलावगृहांवर काहींनी कब्जा केला आहे.

मसाला मार्केटमध्ये अनधिकृत बदाम कारखाना सुरू आहे. त्यातून कोट्यवधींचा व्यापार होत असूनही बाजार समितीला सेस मिळत नाही. या कारखान्याविषयी नवी मुंबई महापालिका, कारखाना इन्स्पेक्टर्सना थांगपत्ता नाही. येथे येणाऱ्या सुक्यामेव्याच्या हजारो कंटेनर्सनी सीमा शुल्कासह जीएसटी भरला आहे किंवा नाही, कामगारांची कामगार खात्यासह भविष्य निर्वाह आणि कामगार विमाकडे नोंदणी आहे की नाही? याच्या चौकशीची गरज आहे.  संचालकांच्या आशीर्वादाने बाजार समितीच्या तिजोरीतील शिलकीपेक्षा जास्त किमतीची कामे काढली आहेत. धान्य मार्केटच्या एका विंगमध्ये १ ते ८२ गाळे असून, त्यांचे क्षेत्रफळ एकूण २८ हजार ७०० चौरस फूट आहे. 

या कार्यालयांना बाजार समितीने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी नकाशाप्रमाणे दुरुस्तीची परवानगी दिली. ती करताना स्लॅबसह भिंती तोडल्यामुळे खालच्या गाळ्यांना क्रॅक गेल्याने महापालिकेने काम बंद पाडले. संचालक मंडळाने मूळ मालकाऐवजी या अनधिकृत बांधकामाला अधिकृत करण्यासाठी दुसऱ्याच नावाने मंजुरी दिल्याची चर्चा आहे. समितीचे २३ पैकी १५ संचालक अपात्र असून, त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. या सर्वांच्या बरखास्तीशिवाय ही अनागोंदी थांबणार नाही; परंतु हे धाडस रावल दाखवतील का? हा  प्रश्न आहे.

 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई