शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

एपीएमसीतील अनागोंदी थांबेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:52 IST

Mumbai APMC: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. आमदार, खासदारांपासून वजनदार राजकीय नेत्यांची येथे वर्णी लागलेली आहे.

- नारायण जाधव(उपवृत्तसंपादक) 

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. आमदार, खासदारांपासून वजनदार राजकीय नेत्यांची येथे वर्णी लागलेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही बाजार समिती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहे. अनेक प्रकरणांत किशोर तोष्णीवालपासून शौचालय, एफएसआय घोटाळ्यापर्यंत अनेक चौकशी समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले. कारवाई मात्र शून्य. या पार्श्वभूमीवर नवे पणनमंत्री जयकुमार रावल येथील अनागोंदी थांबवतील काय, असा प्रश्न आहे.

सध्या बाजार आवारात ६० टक्के अनधिकृत व्यापार सुरू आहे. फुटपाथवर अनधिकृत स्टॉल, तर बाजार आवारातच अनधिकृतपणे शेतमालाची विक्री सुरू आहे. भाजीपाला व फळ मार्केटमध्ये अनधिकृत बांधकाम करून तेथे वास्तव्य करणाऱ्यांना संचालकांचे अभय आहे. काही ठिकाणी तर बांगलादेशींचा भरणा असून, शेतकऱ्यांसाठीच्या लिलावगृहांवर काहींनी कब्जा केला आहे.

मसाला मार्केटमध्ये अनधिकृत बदाम कारखाना सुरू आहे. त्यातून कोट्यवधींचा व्यापार होत असूनही बाजार समितीला सेस मिळत नाही. या कारखान्याविषयी नवी मुंबई महापालिका, कारखाना इन्स्पेक्टर्सना थांगपत्ता नाही. येथे येणाऱ्या सुक्यामेव्याच्या हजारो कंटेनर्सनी सीमा शुल्कासह जीएसटी भरला आहे किंवा नाही, कामगारांची कामगार खात्यासह भविष्य निर्वाह आणि कामगार विमाकडे नोंदणी आहे की नाही? याच्या चौकशीची गरज आहे.  संचालकांच्या आशीर्वादाने बाजार समितीच्या तिजोरीतील शिलकीपेक्षा जास्त किमतीची कामे काढली आहेत. धान्य मार्केटच्या एका विंगमध्ये १ ते ८२ गाळे असून, त्यांचे क्षेत्रफळ एकूण २८ हजार ७०० चौरस फूट आहे. 

या कार्यालयांना बाजार समितीने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी नकाशाप्रमाणे दुरुस्तीची परवानगी दिली. ती करताना स्लॅबसह भिंती तोडल्यामुळे खालच्या गाळ्यांना क्रॅक गेल्याने महापालिकेने काम बंद पाडले. संचालक मंडळाने मूळ मालकाऐवजी या अनधिकृत बांधकामाला अधिकृत करण्यासाठी दुसऱ्याच नावाने मंजुरी दिल्याची चर्चा आहे. समितीचे २३ पैकी १५ संचालक अपात्र असून, त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. या सर्वांच्या बरखास्तीशिवाय ही अनागोंदी थांबणार नाही; परंतु हे धाडस रावल दाखवतील का? हा  प्रश्न आहे.

 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई