शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 17, 2025 06:21 IST

खड्ड्यांमुळे वाढतेय प्राणहानी, नवी मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण देणारी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये दाखल गुन्ह्यात रस्त्यांवरील परिस्थिती दुर्लक्षित होताना दिसत आहे. बहुतांश अपघातांमध्ये केवळ रस्त्यांवरील परिस्थितीमुळे वाहनचालकांना प्राण गमवावे लागले आहेत. ही परिस्थिती पोलिसांच्या नोंदीवर येत नसल्याने मृत दुचाकीस्वार अथवा पाठीमागून धडक देणाऱ्या वाहनचालकावरच गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे अशा अपघातांच्या मुळाशी पोहोचून अपघाताला कारणीभूत परिस्थितीवरून संबंधितांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

मूळ कारणाची पोलिसांकडून नोंद नाहीशहरात असे अनेक अपघात गतकाळात घडले आहेत, ज्यामध्ये दुचाकीस्वार पडण्याचे मूळ कारण पोलिसांच्या नोंदीवर आलेच नाही. त्यामुळे मृत दुचाकीस्वार किंवा पडल्यानंतर त्यांना पाठीमागून धडक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अर्ध्यात तपास गुंडाळले गेले आहेत. यामुळेच रस्त्यांवर अपघाताला कारणीभूत परिस्थिती निर्माण करूनही रस्त्यांच्या ठेकेदारांना कारवाईत अभय मिळताना दिसत आहे.

अनेक रस्ते सदोष

नवी मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण देणारी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अचानक समोर येणारे खड्डे, सांडलेली वाळू यांसोबतच डांबरामुळे झालेले चढउतारही अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. परंतु, पोलिसांकडून केवळ मृत दुचाकीस्वारांना किंवा पाठीमागून धडक देणाऱ्या वाहनचालकांना दोषी धरले जाते.  रस्त्यावरील परिस्थिती पोलिसांच्या नजरेतून का सुटते? त्यामागे ठेकेदार, प्रशासन व पोलिस यांचे साटेलोटे आहे का ? अशीही शंका उपस्थित होत आहे.

ठेकेदार, अधिकारी येणार कचाट्यातनवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात प्रतिवर्षी २५० ते ३०० व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये प्राण गमावत असून अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. बहुतांश अपघातांमध्ये अपघाताचे मूळ कारण पडद्याआड राहून इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अशा प्राणांतिक अपघातांचा गंभीर गुन्ह्यांप्रमाणे तपास झाल्यास रस्त्यांचे ठेकेदार व संबंधित अधिकारी कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतात. 

खड्ड्याने घेतले प्राणगतवर्षी नांदगाव पुलावरील खड्ड्यात दुचाकीचा अपघात झाला होता. त्यात भायखळा येथील तरुणीचा मृत्यू झाला, तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. खड्ड्यात दुचाकी आदळून दोघेही पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने तरुणीला चिरडले होते. या गुन्ह्यातही पोलिसांनी खड्डा दुर्लक्षित करून ट्रेलरचालकावर गुन्हा दाखल केला होता.

खड्डा चुकवताना अपघातखड्डा चुकवण्यासाठी विद्यार्थ्याने दुचाकीचा ब्रेक दाबला आणि दुचाकी घसरून तो पडला. पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्याला चिरडले. नेरूळ येथील पुलावर २०२३ मध्ये ही दुर्घटना घडली होती. या प्रकरणी पाठीमागून धडक देणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला. मात्र खड्डा दुर्लक्षित झाला.

पूर्ण आढावा न घेताच गुन्हा दाखलगतमहिन्यात महापालिकेचे एक कर्मचारी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर लटकणाऱ्या वायरमध्ये पाय अडकून पडले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र, दुचाकीस्वार पडण्यास कारणीभूत ठरलेली परिस्थिती पाहायला हवी होती. याही घटनेत अपघाताचे मूळ पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले? अपघाताचा पूर्ण आढावा न घेताच गुन्हा दाखल केला का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघात