शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
3
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
4
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
5
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
6
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
7
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
8
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
9
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
10
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
11
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
12
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
13
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
14
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
15
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
16
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
17
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
18
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
19
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
20
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबईसाठी घेतलेल्या जमिनी परत कधी देणार? शेतकरी संतप्त; १५ वर्षांपासून प्रकल्प रखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:38 IST

खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचे प्रकरण अंतिम निर्णयासाठी महसूल मंत्रालयाकडे पाठविले आहे; मात्र पाच महिन्यांनंतरही महसूल मंत्र्यांनी त्यावर कोणताही  निर्णय घेतला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

मधुकर ठाकूर -

उरण : उरण, पनवेल, पेण येथील १० हजार हेक्टरवर महामुंबई सेझसाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनींवर १५ वर्षांत प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे  खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचे प्रकरण अंतिम निर्णयासाठी महसूल मंत्रालयाकडे पाठविले आहे; मात्र पाच महिन्यांनंतरही महसूल मंत्र्यांनी त्यावर कोणताही  निर्णय घेतला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

२००५ मध्ये १० हजार हेक्टर क्षेत्रावर महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यासाठी मे. मुंबई इंटिग्रेट एसईझेड लि. कंपनीला खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. महामुंबई सेझसाठी उरण, पेण व पनवेल तालुक्यांतील ४५ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनीही कंपनीकडून खरेदी करण्यात आल्या आहेत; परंतु जमिनी  खरेदी केल्यानंतर १५ वर्षे उलटूनही प्रकल्प उभारण्यात कंपनी असमर्थ ठरली आहे. त्यामुळे ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे कंपनीने खरेदी केलेल्या जमीन मिळकती शेतकऱ्यांना परत करण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केला होता; मात्र सुनावणीनंतर अंतिम निर्णयासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी महामुंबई सेझसाठी खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित प्रकरण महसूल मंत्रालयाकडे पाठविले आहे. पाच महिन्यांत शेतकऱ्यांच्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर तीन-चार बैठका झाल्या; मात्र त्यातून काहीही निर्णय झालेला नाही.

पाच महिन्यांनंतरही कोणता निर्णय नाहीॲड. दत्तात्रेय नवाळे, सेझग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, रामदास भोईर, प्रदीप मोकल, आनंद ठाकूर, मुरलीधर म्हात्रे, रमेश कदम, लक्ष्मण घरत, रघुनाथ भोईर आदी शेतकऱ्यांनी आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली होती. पाटील यांनीही महामुंबई सेझबाधित शेतकऱ्यांचा प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये मांडून राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे; मात्र, पाच महिन्यांनंतरही महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईState Governmentराज्य सरकार