शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

महामुंबईसाठी घेतलेल्या जमिनी परत कधी देणार? शेतकरी संतप्त; १५ वर्षांपासून प्रकल्प रखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:38 IST

खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचे प्रकरण अंतिम निर्णयासाठी महसूल मंत्रालयाकडे पाठविले आहे; मात्र पाच महिन्यांनंतरही महसूल मंत्र्यांनी त्यावर कोणताही  निर्णय घेतला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

मधुकर ठाकूर -

उरण : उरण, पनवेल, पेण येथील १० हजार हेक्टरवर महामुंबई सेझसाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनींवर १५ वर्षांत प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे  खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचे प्रकरण अंतिम निर्णयासाठी महसूल मंत्रालयाकडे पाठविले आहे; मात्र पाच महिन्यांनंतरही महसूल मंत्र्यांनी त्यावर कोणताही  निर्णय घेतला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

२००५ मध्ये १० हजार हेक्टर क्षेत्रावर महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यासाठी मे. मुंबई इंटिग्रेट एसईझेड लि. कंपनीला खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. महामुंबई सेझसाठी उरण, पेण व पनवेल तालुक्यांतील ४५ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनीही कंपनीकडून खरेदी करण्यात आल्या आहेत; परंतु जमिनी  खरेदी केल्यानंतर १५ वर्षे उलटूनही प्रकल्प उभारण्यात कंपनी असमर्थ ठरली आहे. त्यामुळे ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे कंपनीने खरेदी केलेल्या जमीन मिळकती शेतकऱ्यांना परत करण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केला होता; मात्र सुनावणीनंतर अंतिम निर्णयासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी महामुंबई सेझसाठी खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित प्रकरण महसूल मंत्रालयाकडे पाठविले आहे. पाच महिन्यांत शेतकऱ्यांच्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर तीन-चार बैठका झाल्या; मात्र त्यातून काहीही निर्णय झालेला नाही.

पाच महिन्यांनंतरही कोणता निर्णय नाहीॲड. दत्तात्रेय नवाळे, सेझग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, रामदास भोईर, प्रदीप मोकल, आनंद ठाकूर, मुरलीधर म्हात्रे, रमेश कदम, लक्ष्मण घरत, रघुनाथ भोईर आदी शेतकऱ्यांनी आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली होती. पाटील यांनीही महामुंबई सेझबाधित शेतकऱ्यांचा प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये मांडून राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे; मात्र, पाच महिन्यांनंतरही महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईState Governmentराज्य सरकार