शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

रायगडाला जाग येणार तरी कधी?

By admin | Updated: January 15, 2017 05:40 IST

पुरातत्त्व विभागाने राज्यातील ३२६ ठिकाणे संरक्षित स्मारके म्हणून घोषित केली असून, त्यामधील सर्वाधिक ६५ स्मारके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत; पण हा देदीप्यमान ऐतिहासिक

- नामदेव मोरे, नवी मुंबई पुरातत्त्व विभागाने राज्यातील ३२६ ठिकाणे संरक्षित स्मारके म्हणून घोषित केली असून, त्यामधील सर्वाधिक ६५ स्मारके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत; पण हा देदीप्यमान ऐतिहासिक वारसा जपण्यास शासन व पुरातत्त्व विभागाला अपयश येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी फक्त नावालाच संरक्षित स्मारके असून, त्यांची देखभाल करण्याची यंत्रणाच नाही. खंडरात रूपांतर झालेल्या स्मारकांना पाहून इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून, रायगडाला (शासकीय यंत्रणा) व शासनाला जाग कधी येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देशाच्या व राज्याच्या इतिहासामध्ये रायगडचे नाव सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले. मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला आजही दिमाखाने उभा आहे. जगातील शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सहा वर्षे सुरू असलेला चरीकोपरचा संप याच जिल्ह्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदाळ तळ्याचा सत्यागृह केलेले महाड येथेच. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे, चिरनेरच्या जंगल सत्यागृहापासून अजिंक्य जंजिरा किल्ला याच भूमीत दिमाखाने उभा आहे. येथील ऐतिहासिक स्थळांची दखल पुरातत्त्व विभागानेही घेतली आहे. राज्यात ३२६ ठिकाणे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली असून, त्यामध्ये सर्वाधिक ६५ स्मारके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. पर्यटकांची पहिली पसंतीही या परिसराला मिळत आहे; पण पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात व स्मारकांची देखभाल करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या पाचाड येथील वाड्याची कोसळलेली भिंत दुरुस्त केली जात नाही. समाधीस्थळाजवळील उद्यानातील तुटलेली खेळणीही बदलण्यात येत नाहीत. कुलाबा किल्ल्यावर १६ संरक्षित स्मारके आहेत; पण या सर्वांची योग्य माहिती तेथे जाणाऱ्यांना मिळत नाही. ६५ स्मारकांची एकत्रित माहितीही उपलब्ध नाही.राजमाता जिजाऊ समाधी व वाड्याप्रमाणेच जंजिरा किल्ल्याचीही बिकट अवस्था झाली आहे. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्याची देखभाल केली जात नाही. जंजिरा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर तासनतास ताटकळत थांबावे लागते. किल्ल्यावर वाढलेले गवत व झुडपे हटविली जात नाहीत. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये वसलेल्या या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचे झरे आहेत. येथील विहिरी व तलावांमुळेच किल्ला अजिंक्य राहिला. या तलावांमध्ये सद्याच्या स्थितीमध्येही भरपूर पाणी आहे; पण तलावांची साफसफाई कधीच केलेली नाही. यामुळे या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही. रायगड किल्ला वगळता इतर सर्वच ऐतिहासिक स्थळांची अवस्था बिकट आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी योग्य यंत्रणाच नाही. वारसास्थळांची ही अवस्था पाहून इतिहासप्रेमी नागरिक व पर्यटकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून, शासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.स्वतंत्र संकेतस्थळ हवे महाराष्ट्रात पर्यटकांची सर्वाधिक पसंती असणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे; पण येथील ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गस्थळाची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणारे एकही संकेतस्थळ नाही. जिल्हा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालयाने काही पर्यटनस्थळांचा उल्लेख केला आहे; पण त्यावरून येथील वारसास्थळांचे महत्त्व लक्षात येत नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांची माहिती व छायाचित्र असणारे संकेतस्थळ तयार करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. प्रत्येक ठिकाणी माहिती फलक असावेरायगड जिल्ह्यातील सर्व संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी त्या स्मारकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला शीलालेख तयार करण्यात यावा. गाईडच्या मदतीशिवाय प्रत्येक पर्यटकाला त्या ठिकाणांची माहिती उपलब्ध झाली पाहिजे. स्मारकांची डागडुजी व साफसफाई वेळोवेळी करणे आवश्यक असून त्यासाठी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक आहे. व्हिएतनामकडून घ्यावा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातून प्रेरणा घेऊन व्हिएतनाम सारख्या छोट्याशा देशाने अमेरिकेला हरविले. या युद्धासाठी त्यांनी तयार केलेले भुयारी मार्ग त्यांनी जपले आहेत. देशात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ते दाखविले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्याची देखभाल केली जाते; पण शिवरायांच्या महाराष्ट्रात व विशेषत: राजधानी रायगड जिल्ह्यातील स्मारकांची देखभाल करण्यासही शासनाला अपयश आले आहे. ऐतिहासिक स्थळांची देखभाल करण्यासाठी त्यांच्याकडून आदर्श घेण्याची वेळ आली आहे. रायगड जिल्ह्यातील संरक्षित स्मारकेठिकाणस्मारकआचलोली०१कुलाबा किल्ला१६बिरवाडी किल्ला ०१चौल०७पनवेल०१सुरगड०१घोसाळगड०१कडासरी कांगोरी०२कोंडाने०१कोर्लाली जुना किल्ला०१अवचितगड०१कासा किल्ला०१नागोठणा पूल०१पाचाड०२पेठ०२रायगड किल्ला१२जंजिरा किल्ला ०१राजापुरी येथील स्तंभ०१तळा किल्ला०१