शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

फक्त उद्घाटनापुरती सुरू केली वॉटर टॅक्सी, २ दिवसांत बंद; सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:46 IST

प्रतिसाद वाढल्यानंतरच सेवेत; २९० रुपयांत जलसफरीचे स्वप्न अधुरे

सुहास शेलारमुंबई :  बहुचर्चित वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे थाटामाटात उद्घाटन झाले असले, तरी २९० रुपयांत जलसफरीचे सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. या मार्गावरील ५६ आसनी बोट पुढील दोन दिवसांनंतर बंद केली जाणार असून, केवळ उद्घाटनापुरतीच ती बेलापूर ते मुंबई जलमार्गावर उतरविण्यात आली होती.

मुंबई ते बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा मार्गावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी कॅटामरान श्रेणीतील ५६ आसनी फेरीबोटीसह १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या आठ बोटी तैनात करण्याची घोषणा करण्यात आली. ५६ आसनी बोटीसाठी २९० रुपये आणि लहान बोटींसाठी ८०० ते १,२१० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले. अन्य बोटींच्या तुलनेत कॅटामरानचे तिकीट परवडणारे असल्याने नव्या मार्गावर किमान एकदातरी जलसफर अनुभवण्याचे नियोजन अनेकांनी केले. मात्र, नेमकी हीच बोट बंद केली जाणार असल्याने त्यांना हौसेला मुरड घालावी लागणार आहे.

मुंबई ते बेलापूर मार्गावर सेवा देणाऱ्या जलवाहतूकदार संस्थेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपोलो-२ ही कॅटामरान श्रेणीतील फेरीबोट केवळ दोन दिवसांकरिता प्रायोगिक तत्त्वावर सेवेत उतरविण्यात आली आहे. प्रवासी वाढल्यानंतरच ती सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, किमान उद्घाटनापुरती तरी बोट सुरू करण्याची सूचना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करण्यात आली. त्यानुसार दोन दिवस पूर्ण झाले की कॅटामरान बोट सेवेबाहेर केली जाईल. 

या बोटीला वाहतुकीचा पूर्णवेळ परवाना मिळालेला असला तरी सद्यस्थितीत इतकी मोठी बोट या मार्गावर चालवणे परवडणारे नाही. कारण एका फेरीमागे १२ हजार रुपयांचे डिझेल खर्च होते. त्यातुलनेत प्रवासी संख्या ५ ते ७ इतकीच नोंदविण्यात येत असल्यामुळे फेरीमागे दीड-दोन हजार रुपयेच मिळत आहेत. तिकिटाच्या २९० रुपयांमधील ३० रुपये शासनाला कर स्वरुपात द्यावे लागतात. त्यामुळे फेरीबोट चालकांच्या हातात केवळ २६० रुपये उरतात, अशीही माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

अडचणी काय?

  • बेलापूरहून लोकल ट्रेनने २० रुपयांत ‘सीएसएमटी’ला पोहोचता येते. त्यासाठी कोणताही प्रवासी ८०० रुपये का मोजेल? 
  • वॉटर टॅक्सीच्या फेऱ्याही मर्यादित स्वरुपात आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणारे तास-दीडतास वाट का पाहतील? 
  • दुसरे म्हणजे जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचा वेगळा खर्च आहे. तो जवळपास १०० रुपयांच्या घरात आहे. इतका अतिरिक्त खर्च करून प्रवासी वॉटर टॅक्सीने प्रवास करण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • बोटचालकांना अनुदान देऊन तिकीट दर कमी केले, तरच ही सेवा यशस्वी होईल, असे मत जलवाहतूक तज्ज्ञ शराफत मुकादम यांनी व्यक्त केले.