शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

फक्त उद्घाटनापुरती सुरू केली वॉटर टॅक्सी, २ दिवसांत बंद; सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:46 IST

प्रतिसाद वाढल्यानंतरच सेवेत; २९० रुपयांत जलसफरीचे स्वप्न अधुरे

सुहास शेलारमुंबई :  बहुचर्चित वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे थाटामाटात उद्घाटन झाले असले, तरी २९० रुपयांत जलसफरीचे सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. या मार्गावरील ५६ आसनी बोट पुढील दोन दिवसांनंतर बंद केली जाणार असून, केवळ उद्घाटनापुरतीच ती बेलापूर ते मुंबई जलमार्गावर उतरविण्यात आली होती.

मुंबई ते बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा मार्गावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी कॅटामरान श्रेणीतील ५६ आसनी फेरीबोटीसह १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या आठ बोटी तैनात करण्याची घोषणा करण्यात आली. ५६ आसनी बोटीसाठी २९० रुपये आणि लहान बोटींसाठी ८०० ते १,२१० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले. अन्य बोटींच्या तुलनेत कॅटामरानचे तिकीट परवडणारे असल्याने नव्या मार्गावर किमान एकदातरी जलसफर अनुभवण्याचे नियोजन अनेकांनी केले. मात्र, नेमकी हीच बोट बंद केली जाणार असल्याने त्यांना हौसेला मुरड घालावी लागणार आहे.

मुंबई ते बेलापूर मार्गावर सेवा देणाऱ्या जलवाहतूकदार संस्थेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपोलो-२ ही कॅटामरान श्रेणीतील फेरीबोट केवळ दोन दिवसांकरिता प्रायोगिक तत्त्वावर सेवेत उतरविण्यात आली आहे. प्रवासी वाढल्यानंतरच ती सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, किमान उद्घाटनापुरती तरी बोट सुरू करण्याची सूचना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करण्यात आली. त्यानुसार दोन दिवस पूर्ण झाले की कॅटामरान बोट सेवेबाहेर केली जाईल. 

या बोटीला वाहतुकीचा पूर्णवेळ परवाना मिळालेला असला तरी सद्यस्थितीत इतकी मोठी बोट या मार्गावर चालवणे परवडणारे नाही. कारण एका फेरीमागे १२ हजार रुपयांचे डिझेल खर्च होते. त्यातुलनेत प्रवासी संख्या ५ ते ७ इतकीच नोंदविण्यात येत असल्यामुळे फेरीमागे दीड-दोन हजार रुपयेच मिळत आहेत. तिकिटाच्या २९० रुपयांमधील ३० रुपये शासनाला कर स्वरुपात द्यावे लागतात. त्यामुळे फेरीबोट चालकांच्या हातात केवळ २६० रुपये उरतात, अशीही माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

अडचणी काय?

  • बेलापूरहून लोकल ट्रेनने २० रुपयांत ‘सीएसएमटी’ला पोहोचता येते. त्यासाठी कोणताही प्रवासी ८०० रुपये का मोजेल? 
  • वॉटर टॅक्सीच्या फेऱ्याही मर्यादित स्वरुपात आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणारे तास-दीडतास वाट का पाहतील? 
  • दुसरे म्हणजे जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचा वेगळा खर्च आहे. तो जवळपास १०० रुपयांच्या घरात आहे. इतका अतिरिक्त खर्च करून प्रवासी वॉटर टॅक्सीने प्रवास करण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • बोटचालकांना अनुदान देऊन तिकीट दर कमी केले, तरच ही सेवा यशस्वी होईल, असे मत जलवाहतूक तज्ज्ञ शराफत मुकादम यांनी व्यक्त केले.