शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

फक्त उद्घाटनापुरती सुरू केली वॉटर टॅक्सी, २ दिवसांत बंद; सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:46 IST

प्रतिसाद वाढल्यानंतरच सेवेत; २९० रुपयांत जलसफरीचे स्वप्न अधुरे

सुहास शेलारमुंबई :  बहुचर्चित वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे थाटामाटात उद्घाटन झाले असले, तरी २९० रुपयांत जलसफरीचे सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. या मार्गावरील ५६ आसनी बोट पुढील दोन दिवसांनंतर बंद केली जाणार असून, केवळ उद्घाटनापुरतीच ती बेलापूर ते मुंबई जलमार्गावर उतरविण्यात आली होती.

मुंबई ते बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा मार्गावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी कॅटामरान श्रेणीतील ५६ आसनी फेरीबोटीसह १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या आठ बोटी तैनात करण्याची घोषणा करण्यात आली. ५६ आसनी बोटीसाठी २९० रुपये आणि लहान बोटींसाठी ८०० ते १,२१० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले. अन्य बोटींच्या तुलनेत कॅटामरानचे तिकीट परवडणारे असल्याने नव्या मार्गावर किमान एकदातरी जलसफर अनुभवण्याचे नियोजन अनेकांनी केले. मात्र, नेमकी हीच बोट बंद केली जाणार असल्याने त्यांना हौसेला मुरड घालावी लागणार आहे.

मुंबई ते बेलापूर मार्गावर सेवा देणाऱ्या जलवाहतूकदार संस्थेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपोलो-२ ही कॅटामरान श्रेणीतील फेरीबोट केवळ दोन दिवसांकरिता प्रायोगिक तत्त्वावर सेवेत उतरविण्यात आली आहे. प्रवासी वाढल्यानंतरच ती सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, किमान उद्घाटनापुरती तरी बोट सुरू करण्याची सूचना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करण्यात आली. त्यानुसार दोन दिवस पूर्ण झाले की कॅटामरान बोट सेवेबाहेर केली जाईल. 

या बोटीला वाहतुकीचा पूर्णवेळ परवाना मिळालेला असला तरी सद्यस्थितीत इतकी मोठी बोट या मार्गावर चालवणे परवडणारे नाही. कारण एका फेरीमागे १२ हजार रुपयांचे डिझेल खर्च होते. त्यातुलनेत प्रवासी संख्या ५ ते ७ इतकीच नोंदविण्यात येत असल्यामुळे फेरीमागे दीड-दोन हजार रुपयेच मिळत आहेत. तिकिटाच्या २९० रुपयांमधील ३० रुपये शासनाला कर स्वरुपात द्यावे लागतात. त्यामुळे फेरीबोट चालकांच्या हातात केवळ २६० रुपये उरतात, अशीही माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

अडचणी काय?

  • बेलापूरहून लोकल ट्रेनने २० रुपयांत ‘सीएसएमटी’ला पोहोचता येते. त्यासाठी कोणताही प्रवासी ८०० रुपये का मोजेल? 
  • वॉटर टॅक्सीच्या फेऱ्याही मर्यादित स्वरुपात आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणारे तास-दीडतास वाट का पाहतील? 
  • दुसरे म्हणजे जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचा वेगळा खर्च आहे. तो जवळपास १०० रुपयांच्या घरात आहे. इतका अतिरिक्त खर्च करून प्रवासी वॉटर टॅक्सीने प्रवास करण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • बोटचालकांना अनुदान देऊन तिकीट दर कमी केले, तरच ही सेवा यशस्वी होईल, असे मत जलवाहतूक तज्ज्ञ शराफत मुकादम यांनी व्यक्त केले.