शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: July 24, 2015 03:01 IST

: मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत

नवी मुंबई : मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत असल्याचे उघड झाले आहे. स्थायी समितीमध्ये याविषयी लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासनास धारेवर धरले आहे. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मोरबे धरणामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. उन्हाळ्यात सर्व महापालिकांना पाणीकपात करावी लागत असताना नवी मुंबईकरांना मात्र मुबलक पाणी मिळते. परंतु साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाण्याची उधळपट्टी वाढू लागली आहे. पिण्याचे पाणी उद्यान व इतर कामांसाठीही वापरले जात आहे. शहरात होणारा पाणीपुरवठा व पाणीगळतीविषयी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘शहरात सद्यस्थितीत ४२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत आहे. एकूण पाण्यापैकी तब्बल ८० दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. हे प्रमाण कोपरखैरणे व दिघा परिसरातील एकूण रहिवाशांना जेवढे पाणी लागते तेवढे आहे. याविषयी नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. पाणीगळतीची चौकशी झाली पाहिजे. नक्की पाणी कुठे मुरत आहे हे पाहून ठोस उपाययोजना करण्याची मागणी शिवराम पाटील यांनी केली. ऐरोली व दिघा परिसरांतील नागरिकांना वारंवार शट्डाऊनला सामोरे जावे लागत असल्याचे एम. के. मढवी यांनी निदर्शनास आणून दिले. झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना नळजोडणी वेळेवर मिळत नसल्याची खंत अपर्णा गवते व जगदीश गवते यांनी व्यक्त केली. सीआरझेडमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेने स्काडा तंत्राचा वापर केला होता, त्याचा काय उपयोग झाला, अशी विचारणा रवींद्र इथापे यांनी केली. झोपडपट्टीमध्ये अनेकांना पाणी दिले जात नसून त्यांचा नैसर्गिक हक्क डावलला जात असल्याचे रामचंद्र घरत यांनी स्पष्ट केले आणि नळजोडणीची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली. सभागृहनेते जयवंत सुतार यांनीही चोरीच्या नळजोडणी तपासाव्यात. पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली. शहरात पाणी मुबलक असले तरी त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, अन्यथा भविष्यात गंभीर परिणाम होतील, असेही निदर्शनास आणून दिले.