शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:42 IST

पावसाची दडी : मोरबे धरणातील पातळी खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.मुंबईनंतर राज्यात स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर एवढी असून, धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. धरण पूर्ण भरण्यासाठी तीन हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची गरज आहे. २६ जुलैपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ १0८१.८0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची सध्याची पातळी ७६.७0 मीटर इतकी आहे. पुढे पावसाने दडी मारल्यास शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. ९८ वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठी शिल्लक राहिला. मे, २0२0 पर्यंत धरणातील पाण्याची पातळी ७४ मीटर इतकी होती. जून आणि जुलै महिन्यात यात केवळ २.७0 मीटर इतकी वाढ झाली आहे, तर या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त १0८१.८0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण धरण्यासाठी आणखी २000 ते २५00 मिमी पावसाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा नवीन अभियंत्यांना अभ्यास करण्यासाठी हे धरण दाखविले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती. नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. या धरणातून शहराला चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा केला जातो. २0१८ मध्ये २५ जुलै रोजी धरण पूर्ण भरले होते, तर २0१९ मध्ये ४ आॅगस्टला धरण ओव्हरफ्लो झाले होते. या वर्षी जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत कोसळणाºया पावसावरच नवी मुंबईकरांवरील पाणीकपातीचा निर्णय अवलंबून आहे.धरणातून सातगावांना पाणीपुरवठाच्महापालिका मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास मुबलक पाणीपुरवठा करते. त्यासाठी धरणातून दररोज ४२0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते.च्नवी मुंबईसह सिडकोच्या कामोठे आणि मोरबे धरण परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :Damधरण