शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:42 IST

पावसाची दडी : मोरबे धरणातील पातळी खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.मुंबईनंतर राज्यात स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर एवढी असून, धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. धरण पूर्ण भरण्यासाठी तीन हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची गरज आहे. २६ जुलैपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ १0८१.८0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची सध्याची पातळी ७६.७0 मीटर इतकी आहे. पुढे पावसाने दडी मारल्यास शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. ९८ वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठी शिल्लक राहिला. मे, २0२0 पर्यंत धरणातील पाण्याची पातळी ७४ मीटर इतकी होती. जून आणि जुलै महिन्यात यात केवळ २.७0 मीटर इतकी वाढ झाली आहे, तर या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त १0८१.८0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण धरण्यासाठी आणखी २000 ते २५00 मिमी पावसाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा नवीन अभियंत्यांना अभ्यास करण्यासाठी हे धरण दाखविले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती. नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. या धरणातून शहराला चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा केला जातो. २0१८ मध्ये २५ जुलै रोजी धरण पूर्ण भरले होते, तर २0१९ मध्ये ४ आॅगस्टला धरण ओव्हरफ्लो झाले होते. या वर्षी जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत कोसळणाºया पावसावरच नवी मुंबईकरांवरील पाणीकपातीचा निर्णय अवलंबून आहे.धरणातून सातगावांना पाणीपुरवठाच्महापालिका मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास मुबलक पाणीपुरवठा करते. त्यासाठी धरणातून दररोज ४२0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते.च्नवी मुंबईसह सिडकोच्या कामोठे आणि मोरबे धरण परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :Damधरण