शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

खारजमीन संशोधन केंद्रात सांडपाणी, पनवेल महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:39 AM

पनवेल शहराचे वैभव असलेल्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये एक महिन्यापासून महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीमधील पाणी शिरू लागले आहे

नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल शहराचे वैभव असलेल्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये एक महिन्यापासून महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीमधील पाणी शिरू लागले आहे. यामुळे भात संशोधनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पिकामध्ये दूषित पाणी जावून भात शेतीचे प्रचंड नुकसान होवू लागले असून त्याचा परिणाम बियाणांच्या निर्मितीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महापालिकेची निर्मिती होवून एक वर्ष झाले असले तरी प्रत्यक्षात पनवेल शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पनवेल शहराचे वैभव वाढविणा-या प्रकल्पांमध्ये खार संशोधन केंद्राचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत असलेले हे केंद्र १९४३ मध्ये सुरू झाले आहे. तब्बल ७४ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या या केंद्राने भात संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खारजमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे भात पीक घेतले जाईल याविषयी अभ्यास केला जात आहे. केंद्राने पनवेल १, २ व ३ या नावाने भाताचे प्रकार विकसित केले आहेत. १२ हेक्टर जमिनीवर संशोधन व बियाणांची निर्मिती केली जात आहे. या बियाणांना शेतकºयांकडून प्रचंड मागणी आहे. पनवेल महापालिकेने त्यांची मलनि:सारण वाहिनी संशोधन केंद्र परिसरातून नेली आहे. आॅक्टोबरमध्ये अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्यांचे चेंबर फुटले आहेत. चेंबरमधील पाणी शेतामध्ये साचू लागले आहे. यामुळे जवळपास एक महिन्यापासून शेतामध्ये काम करणे अशक्य होवू लागले आहे. याठिकाणी बियाणांची निर्मिती केली जाते. बियाणे दर्जेदार असावे यासाठी भाताची लागवड करण्यापासून ते पिकाची कापणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट वेळेत व व्यवस्थित होणे आवश्यक असते. परंतु मलनि:सारण वाहिनी फुटल्यामुळे संशोधन केंद्रातील वेळापत्रक कोलमडले आहे.साईनगर परिसरामध्ये असलेल्या केंद्राच्या पुढील बाजूला महापालिकेचे मलनि:सारण केंद्र आहे. मलनि:सारण वाहिनीमधील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. यामुळे अनेक ठिकाणी चेंबर फुटू लागले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत आहेत. भात संशोधन केंद्राच्या जमिनीच्या उंचवट्याकडील भागातून मलनि:सारण वाहिनी गेली आहे. यामुळे फुटलेल्या चेंबरमधील पाणी पूर्ण शेतामध्ये घुसले आहे. संशोधन केंद्रातील कृषीशास्त्रज्ञांनी व कर्मचाºयांनी प्रचंड परिश्रम करून विकसित केलेले भाताच्या बियाणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनाने विलंब न करता दुरूस्तीचे काम सुरू करावे व पुन्हा अशाप्रकारे मलनि:सारण वाहिनी फुटणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील कृषी शास्त्रज्ञांनी मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेतली असून योग्य दखल घ्यावी व बियाणे निर्मितीच्या प्रक्रियेमधील अडथळा दूर करावा, अशी मागणी केली आहे.