शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
2
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
3
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
4
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
5
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
6
तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
7
भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ
8
प्रभाग पुनर्रचनेला आव्हान, सुनावणीला सुरुवात; मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी काय सांगितलं? 
9
अमिताभ, शाहरुख आणि हृतिक 'अ‍ॅक्टिंग'शिवाय कमावतायेत कोट्यवधी; 'या' क्षेत्रात कलाकारांची मोठी गुंतवणूक
10
पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला! 
11
घरवापसी! एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतले
12
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार
13
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
14
इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
15
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
16
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
17
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
18
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
19
नौदलाच्या आक्रमणामुळे पाकिस्तानने टाकली नांगी; व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांचे विधान
20
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाधनगृहांची देखभाल वाऱ्यावर

By admin | Updated: October 9, 2016 03:28 IST

स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु दुसरीकडे शहरात नागरिकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेच नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवत असल्याचा दिखावा करू लागली आहे. शहरात विविध विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याबरोबर विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. हागणदारीमुक्त शहर बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी पुरेशी शौचालये उभारण्यापूर्वीच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रोज एक ते दोन विभागांत जाऊन महापालिकेचे अधिकारी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडून महापालिकेच्या कार्यालयामध्ये घेऊन जात आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येत आहे. रोज किती जणांवर कारवाई केली याचा तपशील प्रसारमाध्यमांकडे पाठविला जात आहे. परंतु दुसरीकडे कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. उपलब्ध प्रसाधनगृहांची साफसफाई ठेवली जात नाही. कारवाई करण्यापूर्वी पुरेशी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मनपाने बांधलेल्या प्रसाधनगृहांची योग्य देखभाल केली जात नाही. एपीएमसीमध्ये मनपाच्या प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. अनेक संस्थांचा देखभालीचा ठेका संपल्यानंतरही नवीन ठेकेदारांची नियुक्ती केलेली नाही. अनेक प्रसाधनगृहे मोडकळीस आली आहेत. पाठपुरावा करूनही दुरुस्ती नाहीराष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ येथील नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेक्टर ६मधील उद्यानाजवळ पालिकेने बांधलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे. गतवर्षी नवरात्रीपासून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रामलीला मैदानाजवळील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. तुटलेले दरवाजेही बसविले जात नसून प्रशासन फक्त शहरात होर्डिंग लावून ‘हागणदारीमुक्त शहरा’ची घोषणा करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.