शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

प्रसाधनगृहांची देखभाल वाऱ्यावर

By admin | Updated: October 9, 2016 03:28 IST

स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु दुसरीकडे शहरात नागरिकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेच नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवत असल्याचा दिखावा करू लागली आहे. शहरात विविध विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याबरोबर विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. हागणदारीमुक्त शहर बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी पुरेशी शौचालये उभारण्यापूर्वीच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रोज एक ते दोन विभागांत जाऊन महापालिकेचे अधिकारी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडून महापालिकेच्या कार्यालयामध्ये घेऊन जात आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येत आहे. रोज किती जणांवर कारवाई केली याचा तपशील प्रसारमाध्यमांकडे पाठविला जात आहे. परंतु दुसरीकडे कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. उपलब्ध प्रसाधनगृहांची साफसफाई ठेवली जात नाही. कारवाई करण्यापूर्वी पुरेशी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मनपाने बांधलेल्या प्रसाधनगृहांची योग्य देखभाल केली जात नाही. एपीएमसीमध्ये मनपाच्या प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. अनेक संस्थांचा देखभालीचा ठेका संपल्यानंतरही नवीन ठेकेदारांची नियुक्ती केलेली नाही. अनेक प्रसाधनगृहे मोडकळीस आली आहेत. पाठपुरावा करूनही दुरुस्ती नाहीराष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ येथील नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेक्टर ६मधील उद्यानाजवळ पालिकेने बांधलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे. गतवर्षी नवरात्रीपासून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रामलीला मैदानाजवळील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. तुटलेले दरवाजेही बसविले जात नसून प्रशासन फक्त शहरात होर्डिंग लावून ‘हागणदारीमुक्त शहरा’ची घोषणा करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.