शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

प्रसाधनगृहांची देखभाल वाऱ्यावर

By admin | Updated: October 9, 2016 03:28 IST

स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु दुसरीकडे शहरात नागरिकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेच नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवत असल्याचा दिखावा करू लागली आहे. शहरात विविध विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याबरोबर विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. हागणदारीमुक्त शहर बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी पुरेशी शौचालये उभारण्यापूर्वीच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रोज एक ते दोन विभागांत जाऊन महापालिकेचे अधिकारी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडून महापालिकेच्या कार्यालयामध्ये घेऊन जात आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येत आहे. रोज किती जणांवर कारवाई केली याचा तपशील प्रसारमाध्यमांकडे पाठविला जात आहे. परंतु दुसरीकडे कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. उपलब्ध प्रसाधनगृहांची साफसफाई ठेवली जात नाही. कारवाई करण्यापूर्वी पुरेशी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मनपाने बांधलेल्या प्रसाधनगृहांची योग्य देखभाल केली जात नाही. एपीएमसीमध्ये मनपाच्या प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. अनेक संस्थांचा देखभालीचा ठेका संपल्यानंतरही नवीन ठेकेदारांची नियुक्ती केलेली नाही. अनेक प्रसाधनगृहे मोडकळीस आली आहेत. पाठपुरावा करूनही दुरुस्ती नाहीराष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ येथील नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेक्टर ६मधील उद्यानाजवळ पालिकेने बांधलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे. गतवर्षी नवरात्रीपासून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रामलीला मैदानाजवळील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. तुटलेले दरवाजेही बसविले जात नसून प्रशासन फक्त शहरात होर्डिंग लावून ‘हागणदारीमुक्त शहरा’ची घोषणा करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.